शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:44 IST

गडचिराेली : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यातच काेराेना व डेंग्यू आजाराचे सावट दिसून येत असल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ...

गडचिराेली : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यातच काेराेना व डेंग्यू आजाराचे सावट दिसून येत असल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आजारांपासून दूर कशी राहील याबाबत विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

दूषित पाण्यापासून जवळपास पाच ते सहा प्रकारचे आजार हाेतात. यामध्ये गॅस्ट्राे हा पहिला आजार. गॅस्ट्राेच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब हाेत असतात. दूषित पाणी पिल्यानंतर पाच ते सहा तासामध्ये ही लक्षणे दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणे साथीच्या आजाराप्रमाणे पसरत असतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी हाेते. दूषित पाण्याने गॅस्ट्राे हाेताे. प्रसंगी सलाईन लावण्याची वेळ येते.

बाॅक्स ....

दूषित पाण्यामुळे हाेणारे आजार...

- दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूचा प्रवेश हाेत असताे. जलजन्य आजारांमुळे पाेटाचे विकार बळावतात.

- दूषित पाणी पिल्यानंतर एक ते दाेन दिवसात जुलाब माेठ्या प्रमाणात सुरू हाेतात.

- पाेटात प्रचंड दुखते, कळा येतात. तीन ते चार दिवसात ताप येताे. यावर ॲन्टिबायॉटिक औषध घेऊन बरे करण्याचा प्रयत्न असताे.

बाॅक्स .....

आजाराची लक्षणे...

- दूषित पाणी पिल्यानंतर सहा ते सात दिवसांनंतर उलट्या, ताप, लघवी पिवळी हाेणे, तसेच भूक मंदावणे आदी लक्षणे दिसून येतात. याशिवाय चार ते पाच दिवसांनी डाेळे पिवळे दिसायला लागतात. जवळपास महिना ते दीड महिन्याच्या कालावधीपर्यंत या आजाराची लक्षणे कायम असतात. दूषित पाण्यापासून टायफाॅईड हा आजार हाेताे. चार ते पाच दिवस माेठ्या प्रमाणावर ताप येताे. पाेटात प्रचंड दुखते.

बाॅक्स .....

लक्षणे दिसताच ही घ्या खबरदारी - डाॅ. काेटरंगे

पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे खाणे टाळावे. पाणीपुरी, भेळ व इतर पदार्थ खाणे टाळले पाहिजे. उलट्या व जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी हाेते. त्यावेळी मीठ, साखर, पाणी सतत पित राहावे. यामुळे शरीराला आराम मिळताे. याशिवाय काेणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास डाॅक्टरांकडे जाऊन औषधाेपचार करावा, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सारंग काेटरंगे यांनी सांगितले.

बाॅक्स .....

आजार टाळण्यासाठी हे करा...

पावसाळ्यात शुद्ध पाणी, तेही उकळून प्यावे. मेडिक्लाेर ड्राॅप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे. यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ तळाशी जाऊन स्वच्छ पाणी मिळते.