शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी सिंचन योजना रद्द करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने व विविध उद्योगांसाठी वनकायदा आडवा येत असल्याने अनेक योजना व प्रकल्प निर्मितीस अडचणी आहेत. त्यात वैनगंगा नदीवर पूर्ण झालेल्या चिचडोह बॅरेजच्या पाणी साठ्यातून तळोधी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पासाठी लागणारी वन जमीन संपादित करण्यात आली आहे. सर्व प्रकारची संविधानिक मान्यता व आराखडा मंजूर आहे.

ठळक मुद्देयोजना शेतकऱ्यांच्या फायद्याची : राज्यपाल, मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील दर्शनी गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे. मार्च २०२० पर्यंत ७.२७ कोटी रूपयांचा खर्च योजनेवर करण्यात आला. या सिंचन योजनेमुळे ६ हजार ६३ हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे हा सिंचन प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये, अशी मागणी आ.डॉ. देवराव होळी यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने व विविध उद्योगांसाठी वनकायदा आडवा येत असल्याने अनेक योजना व प्रकल्प निर्मितीस अडचणी आहेत. त्यात वैनगंगा नदीवर पूर्ण झालेल्या चिचडोह बॅरेजच्या पाणी साठ्यातून तळोधी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पासाठी लागणारी वन जमीन संपादित करण्यात आली आहे. सर्व प्रकारची संविधानिक मान्यता व आराखडा मंजूर आहे. गोदावरी तंटा लवादानुसार राज्याच्या वाटल्याला आलेले पाणी जिल्ह्यात सिंचन प्रकल्प नसल्याने उपयोगात येत नाही. याशिवाय अधिकच्या वन क्षेत्रामुळे पारंपरिक सिंचन प्रकल्प होऊ शकत नाही. यासाठी वैनगंगा नदीवर बॅरेजचे साखळी बंधारे बांधून त्यावर उपसा सिंचन प्रकल्पाद्वारे सिंचन योजना प्रस्तावित आहेत.तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण झाल्यास तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. शेतकºयांचे जीवनमान उंचावू शकते. परंतु ही सिंचन योजना रद्द केल्यास वैनगंगा नदीवर असलेला ६२.५३ द.ल.घ.मी. पाणीसाठा असणाºया चिचडोह बॅरेजला काहीच अर्थ राहणार नाही. त्याचबरोबर दोन मोठ्या उपसा सिंचन योजनांवरही त्याचा विपरित परिणाम होईल.शेतकºयांच्या हितासाठी तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेतील अडथळे दूर करून ती मार्गी लावावी, अशी मागणी आ.डॉ.होळी यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प