शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

तळोधी सिंचन योजना रद्द करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने व विविध उद्योगांसाठी वनकायदा आडवा येत असल्याने अनेक योजना व प्रकल्प निर्मितीस अडचणी आहेत. त्यात वैनगंगा नदीवर पूर्ण झालेल्या चिचडोह बॅरेजच्या पाणी साठ्यातून तळोधी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पासाठी लागणारी वन जमीन संपादित करण्यात आली आहे. सर्व प्रकारची संविधानिक मान्यता व आराखडा मंजूर आहे.

ठळक मुद्देयोजना शेतकऱ्यांच्या फायद्याची : राज्यपाल, मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील दर्शनी गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे. मार्च २०२० पर्यंत ७.२७ कोटी रूपयांचा खर्च योजनेवर करण्यात आला. या सिंचन योजनेमुळे ६ हजार ६३ हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे हा सिंचन प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये, अशी मागणी आ.डॉ. देवराव होळी यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने व विविध उद्योगांसाठी वनकायदा आडवा येत असल्याने अनेक योजना व प्रकल्प निर्मितीस अडचणी आहेत. त्यात वैनगंगा नदीवर पूर्ण झालेल्या चिचडोह बॅरेजच्या पाणी साठ्यातून तळोधी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पासाठी लागणारी वन जमीन संपादित करण्यात आली आहे. सर्व प्रकारची संविधानिक मान्यता व आराखडा मंजूर आहे. गोदावरी तंटा लवादानुसार राज्याच्या वाटल्याला आलेले पाणी जिल्ह्यात सिंचन प्रकल्प नसल्याने उपयोगात येत नाही. याशिवाय अधिकच्या वन क्षेत्रामुळे पारंपरिक सिंचन प्रकल्प होऊ शकत नाही. यासाठी वैनगंगा नदीवर बॅरेजचे साखळी बंधारे बांधून त्यावर उपसा सिंचन प्रकल्पाद्वारे सिंचन योजना प्रस्तावित आहेत.तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण झाल्यास तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. शेतकºयांचे जीवनमान उंचावू शकते. परंतु ही सिंचन योजना रद्द केल्यास वैनगंगा नदीवर असलेला ६२.५३ द.ल.घ.मी. पाणीसाठा असणाºया चिचडोह बॅरेजला काहीच अर्थ राहणार नाही. त्याचबरोबर दोन मोठ्या उपसा सिंचन योजनांवरही त्याचा विपरित परिणाम होईल.शेतकºयांच्या हितासाठी तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेतील अडथळे दूर करून ती मार्गी लावावी, अशी मागणी आ.डॉ.होळी यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प