शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग हे विशेष व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 22:29 IST

दिव्यांग व्यक्तींमध्ये सर्वसामान्य व्यक्तीच्या तुलनेत विशेष गुण असतात. त्यामुळे त्यांना अपंग न समजता दिव्यांग म्हणण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ज्या व्यक्तीच्या मनाची उंची अधिक आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय दिव्यांग कर्मचारी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिव्यांग व्यक्तींमध्ये सर्वसामान्य व्यक्तीच्या तुलनेत विशेष गुण असतात. त्यामुळे त्यांना अपंग न समजता दिव्यांग म्हणण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ज्या व्यक्तीच्या मनाची उंची अधिक आहे. त्या व्यक्तीला शारीरिक अडचण कधीच निर्माण होत नाही. त्यामुळे दिव्यांगांनी स्वत:मधील न्यूनगंड दूर करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.महाराष्टÑ राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी मार्गावरील कमल केशव सभागृहात जिल्हास्तरीय दिव्यांग कर्मचारी मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. सहउद्घाटक म्हणून आमदार देवराव होळी, कृष्णा गजबे, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्टÑ राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुमरे, संघटनेचे पदाधिकारी अतुल मेश्राम, लालाजी पिपरे, पुरंदर इंदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव म्हणाले, समाजातील सर्वसामान्य व्यक्तीचा विकास व्हावा, यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, गडचिरोली शहरात जागा उपलब्ध करून द्यावी, त्या जागेवर दिव्यांगांसाठी भवन बांधून दिले जाईल. दिव्यांग प्रमाणपत्र गुरूवार व शुक्रवारी देण्यासंदर्भात पाठपुरावा करू, असे मार्गदर्शन केले.खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना अपंगांनी आजपर्यंत अनेक क्षेत्र गाजविले आहेत. अपंग हा समाजाचा अभिन्न अंग आहे. अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. आमदार गजबे यांनी दिव्यांगांचा समाजाने आदर केला पाहिजे. शारीरिक व्यंग असले तरी सदर व्यक्ती मनाने सुदृढ आहे. दिव्यांग व्यक्तीने आत्मविश्वासाने अडचणींचा सामना करून स्वत:चा ठसा समाजात निर्माण करावा, असे मार्गदर्शन केले.आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन करताना गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या रिक्त पदांकडे लक्ष वेधले. सरकार दिव्यांग व्यक्तींना केवळ चार टक्के आरक्षण देत आहे. सदर आरक्षण वाढविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, त्याचबरोबर रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सुध्दा प्रयत्न करू, असे मार्गदर्शन केले.संचालन अतुल मेश्राम तर आभार लक्ष्मण वाढई यांनी मानले.