शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

दहशतवादाची झळ सोसलेला जिल्हा

By admin | Updated: May 21, 2015 01:49 IST

भारताचे माजी पंतप्रधान व या देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे घेऊन जाणारे एक तरूण नेतृत्व दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो.

गडचिरोली : भारताचे माजी पंतप्रधान व या देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे घेऊन जाणारे एक तरूण नेतृत्व दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. देशात गेल्या अनेक वर्षांपासून विविध भागाला दहशतवादाने व्यापलेले आहे. आता ही समस्या आंतरराष्ट्रीय झाली असली, तरी महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाने ग्रासले आहे. नक्षली दहशतवादामुळे या जिल्ह्याच्या विकासावर परिणाम झाला आहे. अनेक कुटुंब या दहशतवादाने पीडित झाले आहेत. यावर तोडगा निघावा याकरिता आता सरकारने कायम उपाययोजन करायला हवी, अशी भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे दहशतवादविरोधी दिवसाच्या निमित्ताने सर्वांनी नक्षलमुक्त व दहशतमुक्त गाव, जिल्हा, देश अशी प्रतिज्ञा करायला हवी.स्वातंत्र्यानंतर देशात अनेक दहशतवादी हल्ले झालेत. या हल्ल्यात देशातील दोन पंतप्रधानही मारले गेले. दहशतवाद, नक्षलवाद यांचा मुकाबला करतांना अनेक जवानांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. देशातील दहशतवाद कायम निपटून काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र अजूनही काही आंतरबाह्य शक्ती या देशाला अस्थिर करण्यासाठी दहशतवादी हल्ले करून आपला अस्तीत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही वर्षात देशातील सात ते आठ राज्यांमध्ये नक्षलवादाची नवी समस्या निर्माण झाली आहे. नक्षलवाद्यांचा हिंसाचार हा ही दहशतवादाचाच एक भाग आहे. गडचिरोली जिल्हा हा या दहशतवादाने प्रचंड होरपळून निघाला आहे. १९८० च्या दशकात या जिल्ह्यात नक्षली कारवायांना सुरूवात झाली. आंध्रप्रदेश मार्ग गडचिरोली जिल्ह्याच्या अरण्य प्रदेशात नक्षलवाद्यांचे पाळेमुळे रोवले जाऊ लागले. गेल्या ३० - ४० वर्षात जिल्ह्यातील नक्षली दहशतवादाने उग्ररूप धारण केले आहे. आतापर्यंत १५० वर अधिक पोलीस जवान या नक्षली हल्ल्यात शहीद झाले. तर ४५२ वर अधिक नागरिक नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात बळी पडले. अनेक कुटुंबांना या हिंसाचाराच्या झळा पोहोचल्या. कुणाचा बाप, भाऊ, कुणाचा मुलगा तर कुणाची मुलगी, आई, पत्नी या हिंसाचारात मारल्या गेले. मात्र या सर्व हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस दल सक्षमतेने काम करीत आहे. हा जिल्हा नक्षली दहशतवादातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा २१ मे रोजी सर्व जिल्हावासीयांनी करण्याची गरज आहे. अनेक गावांनी नक्षलवाद्यांना गाव बंदी करून याची सुरूवात केली आहे. हिंसाचार हा कुठल्याही स्वरूपाचा असो त्याचा विरोध प्रखरपणे झाला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने दहशतवाद विरोधी दिन साजरा करण्यामागचा उद्देश यशस्वी होईल, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. (जिल्हा प्रतिनिधी)