शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दहशतवादाची झळ सोसलेला जिल्हा

By admin | Updated: May 21, 2015 01:49 IST

भारताचे माजी पंतप्रधान व या देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे घेऊन जाणारे एक तरूण नेतृत्व दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो.

गडचिरोली : भारताचे माजी पंतप्रधान व या देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे घेऊन जाणारे एक तरूण नेतृत्व दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. देशात गेल्या अनेक वर्षांपासून विविध भागाला दहशतवादाने व्यापलेले आहे. आता ही समस्या आंतरराष्ट्रीय झाली असली, तरी महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाने ग्रासले आहे. नक्षली दहशतवादामुळे या जिल्ह्याच्या विकासावर परिणाम झाला आहे. अनेक कुटुंब या दहशतवादाने पीडित झाले आहेत. यावर तोडगा निघावा याकरिता आता सरकारने कायम उपाययोजन करायला हवी, अशी भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे दहशतवादविरोधी दिवसाच्या निमित्ताने सर्वांनी नक्षलमुक्त व दहशतमुक्त गाव, जिल्हा, देश अशी प्रतिज्ञा करायला हवी.स्वातंत्र्यानंतर देशात अनेक दहशतवादी हल्ले झालेत. या हल्ल्यात देशातील दोन पंतप्रधानही मारले गेले. दहशतवाद, नक्षलवाद यांचा मुकाबला करतांना अनेक जवानांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. देशातील दहशतवाद कायम निपटून काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र अजूनही काही आंतरबाह्य शक्ती या देशाला अस्थिर करण्यासाठी दहशतवादी हल्ले करून आपला अस्तीत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही वर्षात देशातील सात ते आठ राज्यांमध्ये नक्षलवादाची नवी समस्या निर्माण झाली आहे. नक्षलवाद्यांचा हिंसाचार हा ही दहशतवादाचाच एक भाग आहे. गडचिरोली जिल्हा हा या दहशतवादाने प्रचंड होरपळून निघाला आहे. १९८० च्या दशकात या जिल्ह्यात नक्षली कारवायांना सुरूवात झाली. आंध्रप्रदेश मार्ग गडचिरोली जिल्ह्याच्या अरण्य प्रदेशात नक्षलवाद्यांचे पाळेमुळे रोवले जाऊ लागले. गेल्या ३० - ४० वर्षात जिल्ह्यातील नक्षली दहशतवादाने उग्ररूप धारण केले आहे. आतापर्यंत १५० वर अधिक पोलीस जवान या नक्षली हल्ल्यात शहीद झाले. तर ४५२ वर अधिक नागरिक नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात बळी पडले. अनेक कुटुंबांना या हिंसाचाराच्या झळा पोहोचल्या. कुणाचा बाप, भाऊ, कुणाचा मुलगा तर कुणाची मुलगी, आई, पत्नी या हिंसाचारात मारल्या गेले. मात्र या सर्व हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस दल सक्षमतेने काम करीत आहे. हा जिल्हा नक्षली दहशतवादातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा २१ मे रोजी सर्व जिल्हावासीयांनी करण्याची गरज आहे. अनेक गावांनी नक्षलवाद्यांना गाव बंदी करून याची सुरूवात केली आहे. हिंसाचार हा कुठल्याही स्वरूपाचा असो त्याचा विरोध प्रखरपणे झाला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने दहशतवाद विरोधी दिन साजरा करण्यामागचा उद्देश यशस्वी होईल, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. (जिल्हा प्रतिनिधी)