शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमीच्या कामात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:38 IST

- वर्षभरात ७५ कोटी ९४ लाखांची दिली मजुरी गडचिरोली : गेल्या आर्थिक वर्षात संपूर्ण देशात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन होते. ...

- वर्षभरात ७५ कोटी ९४ लाखांची दिली मजुरी

गडचिरोली : गेल्या आर्थिक वर्षात संपूर्ण देशात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन होते. अशावेळी कित्येक मजुरांच्या हाताला काम नव्हते. मनरेगातून (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त, म्हणजे १४१ टक्के उद्दिष्ट गाठत मजुरांना मोठा दिलासा देण्यात आला. यामुळे गडचिरोली जिल्हा मनरेगातील कार्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

मनरेगाचे मूलभूत उद्दिष्ट अकुशल हातांना काम उपलब्ध करून देणे आहे. सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात प्रत्यक्ष कार्यरत २ लाख ९३ हजार १०१ सक्रिय मजुरांपैकी १ लाख ९२ हजार ३४४ इतक्या मजुरांच्या हातांना काम देण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अन्य रोजगार बंद असताना मनरेगा मजुरांच्या मदतीला धावून गेली. जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त अकुशल कामांचे नियोजन करून प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला. मनरेगामध्ये ६० : ४० असे अकुशल व कुशल कामांचे प्रमाण असताना ७५ कोटी ९४ लाख रुपये अकुशल स्वरूपाच्या कामांवर खर्च करण्यात आले असून, १५ कोटी २४ लाख रुपये कुशल स्वरूपाच्या कामांवर खर्च करण्यात आले. त्यानुसार हे प्रमाण (८४ : १६) असे येते.

मनरेगामधून घेण्यात आलेल्या कामांमध्ये जलसंधारण, कृषिविषयक कामांचे प्रमाण जास्त आहे. त्याचा परिणाम जलसाठा होण्यास व पर्यायाने कृषिविषयक उत्पन्नवाढीत होणार आहे.

नवीन वर्षात ४५७ ग्रामपंचायतींमध्ये काम

सन २०२१-२२ या वर्षाकरिता मनरेगातून रोजगार निर्मिती करण्यासाठी एकूण ४५७ ग्रामपंचायतींमध्ये ६२ हजार ७०७ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्या कामांमधून २९०.४ लक्ष मनुष्यदिन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव यांनी दिली. याकरिता जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे मार्गदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण यांनीदेखील योगदान दिले आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक काम

- सन २०२०-२०२१करिता गडचिरोली जिल्ह्यात २४.५१ लक्ष मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च २०२१ अखेरीस जिल्ह्याने ३४.५७ लक्ष मनुष्यदिन निर्मिती केली आहे. लक्ष्यांकाच्या तुलनेत १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. मागील पाच वर्षांत उद्दिष्टाच्या तुलनेत प्रत्यक्ष गाठलेले हे सर्वाधिक मोठे यश आहे.

- २०२०-२१ या वर्षात १ लाख ९२ हजार ३४४ मजुरांना रोजगार देण्यात आला. यातून ३४ लाख १९ हजार ३६६ मनुष्यदिवस रोजगार निर्माण झाला. यात गडचिरोली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षात अकुशल मजुरांना ७५ कोटी ९४ लाखांची मजुरी देण्यात आली.

नियोजन विभागाच्या २ सप्टेंबर २०२०च्या शासन परिपत्रकानुसार ग्रामसमृद्ध ही नवीन संकल्पना पुढे आणण्यात आली. त्यानुसार मनरेगातून ग्रामविकास साधावा व जॉबकार्डधारक मजूर लखपती व्हावा ही संकल्पना आहे. त्याआनुषंगाने पायलट स्वरूपात १२९ गावांचे नियोजन करण्यात आले आहे. यातून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल.

- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी