शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. मध्ये मोर्चेबांधणीला वेग

By admin | Updated: September 3, 2014 23:23 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोलीसह राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये येत्या २१ सप्टेंबर रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यानंतर लगेच विषय समितीच्या सभापती पदाची

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोलीसह राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये येत्या २१ सप्टेंबर रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यानंतर लगेच विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक होऊ घातली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यामध्ये असलेली अभद्र युती संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, भाजपचे ८, युवाशक्ती आघाडीचे ७, शिवसेनेचे २, नाग विदर्भ आंदोलन समितीचे ४, अपक्ष आमदार दीपक आत्राम यांच्या गटाचे ३ सदस्य आहेत. ३ अपक्ष सदस्य आहेत. १ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य आहे. २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ९ सदस्याच्या भरवशावर भाजप व युवाशक्तीशी हातमिळवणी करीत सत्ता स्थापन केली. या समिकरणात राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद, भाजपला उपाध्यक्षपद, युवाशक्ती आघाडीला दोन सभापतीपद तर राकाँ व भाजपला प्रत्येकी एक सभापतीपद मिळाले. मात्र गेल्या अडीच वर्षाच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले आहे. विविध राजकीय पक्षात फुट पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युवाशक्ती आघाडीही भाजपमध्ये विलिन झाल्याने सत्तेचे राजकीय समिकरण पूर्णपणे बदलले आहे. नाग विदर्भ आंदोलन समितीही भाजपच्या खेम्यात दाखल असल्याने अध्यक्षपदासाठी यावेळी जोरदार मोर्चेबांधणी होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे ७ दावेदार या पदासाठी कामाला लागले आहे. राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष दुभंगला असून १० पैकी ४ सदस्य एका खेम्यात दाखल आहेत. या खेम्याचे नेतृत्व विद्यमान कृषी सभापती अतुल गण्यारपवार करीत आहे. युवाशक्ती आघाडीचेही दोन सदस्य भाजपमध्ये विलिन झाले आहेत. नाग विदर्भ आंदोलन समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला साथ देण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडे १३ सदस्य असले तरी त्यांचे तोंड तीन गटात विभागलेले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले बहुतांश सदस्य हे अरविंद सावकार पोरेड्डीवार गटाशी निगडीत आहे. या गटाकडे ५ सदस्य आहेत. त्यामुळे काँगे्रस पक्षाचे राजकारण एकखांबी नाही, दुसरीकडे राज्यात शिवसेना, भाजप एकत्रित लढण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेतही नव्या सत्ता समिकरणात भाजपला शिवसेना साथ देण्याची शक्यता आहे. अतुल गण्यारपवार यांनी दीपक आत्राम गटाचे तीन व भाकपचा एक असा एक स्वतंत्र गट निर्माण केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी होणार आहे. विविध गटाच्या फुटीवरच अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)