शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

जि. प., पं. स. गणांची होणार पुनर्रचना

By admin | Updated: July 29, 2015 01:40 IST

एप्रिल महिन्यात राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात १० नवीन नगर पंचायती निर्माण केल्या आहेत.

गडचिरोली : एप्रिल महिन्यात राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात १० नवीन नगर पंचायती निर्माण केल्या आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येची आता पुनर्ररचना होणार आहे. २०१७ च्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने यासाठी नवीन गण गठित करावे लागणार आहे. अनेक जि. प. क्षेत्राचे नावही बदलतील, अशी चिन्ह आहेत. गडचिरोली जिल्ह्यात स्थापनेपासून देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका होत्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यातील तालुका मुख्यालयाच्या ग्राम पंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात १० नगर पंचायती स्थापण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर राज्यात सत्तांतरण झाल्यावर नव्या भाजप-शिवसेना सरकारने एप्रिल २०१५ मध्ये ग्राम पंचायत निवडणुका स्थगीत करून कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, आरमोरी या दहा ग्राम पंचायतींना नगर पंचायती करण्याबाबतची अधिसूचना जारी केली व येथे तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त केले. नव्या नगर पंचायती झाल्यामुळे आरमोरी येथील जिल्हा परिषद क्षेत्र कमी झाले आहे. तसेच आरमोरी येथील दोन पंचायत समिती गण, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली येथील प्रत्येकी एक पंचायत समिती क्षेत्र आता कमी झाले आहे. त्यामुळे २०१६ मध्ये होणाऱ्या जि. प. व पं. स. च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राची पुनर्ररचना करावी लागणार आहे. यात अनेक पंचायत समिती व जिल्हा परिषद क्षेत्राचे नावही बदलतील. विद्यमान स्थितीत चामोर्शी-फराडा जिल्हा परिषद क्षेत्र होते. त्यातून आता चामोर्शीचे नाव वगळावे लागेल व नवीन दुसऱ्या गावाचे नाव या क्षेत्राला जोडावे लागेल. असाच प्रकार एटापल्ली-गुरूपल्ली या जि.प. क्षेत्राबाबतही होईल. यातून एटापल्लीचे नाव वगळावे लागेल व नवीन गावाचे नाव जोडावे लागेल. कोरची-बिहिटेकला या जि.प. गणाचे नावे बिहिटेकलासोबत दुसऱ्या गावाच्या नावाने करावे लागणार आहे. १३ हजार मतदाराचे एक क्षेत्र होते. ते आता ११ हजारापर्यंत येईल व जिल्हा परिषद सदस्याचा आकडाही ५१ वरून ५० तर पं. स. सदस्याचे संख्याबळ १०२ वर ९७ वर येईल. पंचायत समिती गणाचेही नाव या नव्या पुनर्ररचनेत बदलविले जाण्याची शक्यता आहे. प्रशासन सप्टेंबर आॅक्टोबरच्या पूर्वी नगर पंचायतीच्या निवडणुका घेणार आहे. त्यामुळे त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्कल व गणांची फेररचना करण्यास प्रशासनाकडून सुरुवात होईल, अशी चिन्ह आहे. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५१ वरून ५० वर येणार असून नव्या फेर रचनेत जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदार संख्याही कमी होईल. साधारणत: एक ते दीड हजाराने एका जि.प. सर्कलमध्ये मतदारांच्या संख्येत घट येण्याची शक्यता आहे. वाढीव लोकसंख्येच्या आधारावर नवी फेररचना केली जाईल. (जिल्हा प्रतिनिधी)