शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

जि. प., पं. स. गणांची होणार पुनर्रचना

By admin | Updated: July 29, 2015 01:40 IST

एप्रिल महिन्यात राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात १० नवीन नगर पंचायती निर्माण केल्या आहेत.

गडचिरोली : एप्रिल महिन्यात राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात १० नवीन नगर पंचायती निर्माण केल्या आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येची आता पुनर्ररचना होणार आहे. २०१७ च्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने यासाठी नवीन गण गठित करावे लागणार आहे. अनेक जि. प. क्षेत्राचे नावही बदलतील, अशी चिन्ह आहेत. गडचिरोली जिल्ह्यात स्थापनेपासून देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका होत्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यातील तालुका मुख्यालयाच्या ग्राम पंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात १० नगर पंचायती स्थापण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर राज्यात सत्तांतरण झाल्यावर नव्या भाजप-शिवसेना सरकारने एप्रिल २०१५ मध्ये ग्राम पंचायत निवडणुका स्थगीत करून कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, आरमोरी या दहा ग्राम पंचायतींना नगर पंचायती करण्याबाबतची अधिसूचना जारी केली व येथे तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त केले. नव्या नगर पंचायती झाल्यामुळे आरमोरी येथील जिल्हा परिषद क्षेत्र कमी झाले आहे. तसेच आरमोरी येथील दोन पंचायत समिती गण, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली येथील प्रत्येकी एक पंचायत समिती क्षेत्र आता कमी झाले आहे. त्यामुळे २०१६ मध्ये होणाऱ्या जि. प. व पं. स. च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राची पुनर्ररचना करावी लागणार आहे. यात अनेक पंचायत समिती व जिल्हा परिषद क्षेत्राचे नावही बदलतील. विद्यमान स्थितीत चामोर्शी-फराडा जिल्हा परिषद क्षेत्र होते. त्यातून आता चामोर्शीचे नाव वगळावे लागेल व नवीन दुसऱ्या गावाचे नाव या क्षेत्राला जोडावे लागेल. असाच प्रकार एटापल्ली-गुरूपल्ली या जि.प. क्षेत्राबाबतही होईल. यातून एटापल्लीचे नाव वगळावे लागेल व नवीन गावाचे नाव जोडावे लागेल. कोरची-बिहिटेकला या जि.प. गणाचे नावे बिहिटेकलासोबत दुसऱ्या गावाच्या नावाने करावे लागणार आहे. १३ हजार मतदाराचे एक क्षेत्र होते. ते आता ११ हजारापर्यंत येईल व जिल्हा परिषद सदस्याचा आकडाही ५१ वरून ५० तर पं. स. सदस्याचे संख्याबळ १०२ वर ९७ वर येईल. पंचायत समिती गणाचेही नाव या नव्या पुनर्ररचनेत बदलविले जाण्याची शक्यता आहे. प्रशासन सप्टेंबर आॅक्टोबरच्या पूर्वी नगर पंचायतीच्या निवडणुका घेणार आहे. त्यामुळे त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्कल व गणांची फेररचना करण्यास प्रशासनाकडून सुरुवात होईल, अशी चिन्ह आहे. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५१ वरून ५० वर येणार असून नव्या फेर रचनेत जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदार संख्याही कमी होईल. साधारणत: एक ते दीड हजाराने एका जि.प. सर्कलमध्ये मतदारांच्या संख्येत घट येण्याची शक्यता आहे. वाढीव लोकसंख्येच्या आधारावर नवी फेररचना केली जाईल. (जिल्हा प्रतिनिधी)