शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जि. प.मध्ये २५ कोटींच्या कामांचे नियोजन नियमबाह्य

By admin | Updated: January 1, 2016 02:23 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने केलेले २५ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन नियमबाह्य असून अनेक जिल्हा

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने केलेले २५ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन नियमबाह्य असून अनेक जिल्हा परिषद सदस्यांवर काम वाटपात अन्याय झाला असल्याचा आरोप करुन कामाचे फेरनियोजन करण्यासाठी जि.प.ची विशेष सभा घेण्यात यावी व या सभेमध्ये कामाचे नियोजन करावे, अशी मागणी ज्येष्ठ जि.प.सदस्य जगन्नाथ बोरकुटे, यशवंत धुळसे, होमराज आलाम, पूनम गुरनुले, लैजा चालूरकर, ग्यानकुमारी कौशी, कविता सिडाम यांनी पत्रकार परिषदेत गुरूवारी केली आहे. पत्रकार परिषदेत जगन्नाथ बोरकुटे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या विकास निधीपैकी ६० टक्के निधी नक्षलग्रस्त भागासाठी, तर ४० टक्के निधी उर्वरित क्षेत्राच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. कामांचे नियोजन करताना संबंधित क्षेत्रात कामाची निकड व त्या क्षेत्राच्या जि.प.सदस्याचे मत लक्षात घेतले जात नाही. अलिकडेच ‘३०-५४’ व ‘१३-वने’ शिर्षकांतर्गत २५ कोटींच्या कामांचे नियोजन केले. परंतु बहुतांश जि.प. सदस्यांच्या क्षेत्रांना विकासकामातून वगळण्यात आले, असा आरोप बोरकुटे यांनी केला. गेल्या सात-आठ महिन्यांपासून बांधकाम समितीने कामांची यादी स्थायी समितीपुढे ठेवली नाही. सध्याच्या नियोजनात कंत्राटदारांच्या मर्जीप्रमाणे कामे दिली आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी किमान २५ ते ३० लाखांचा निधी हवा, अशी मागणीही त्यांनी केली. २५ कोटींच्या कामांसाठी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी करणारे पत्र १९ सदस्यांच्या स्वाक्षरीने जि.प. अध्यक्षांना दिले आहे. नियमानुसार सात दिवसांच्या आत विशेष सभा बोलवावी लागते. मात्र अद्याप अशी सभा बोलविली नाही. विशेष सभा आयोजित केली नाही, तर १९ सदस्य उपोषणाला बसतील, असा इशाराही बोरकुटे यांनी दिला. (नगर प्रतिनिधी)कामाचे नियोजन नियमबाह्य नाही- गण्यारपवारगडचिरोली जिल्ह्यात पाच तालुक्यांसाठी ५१ टक्के निधीचे नियोजन ठेवावे लागते. या तालुक्यातून १५ जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर उर्वरित सात तालुक्यांसाठी ४९ टक्के निधीचे नियोजन ठेवावे लागते. या तालुक्यातून ३५ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने ४९, ५१ व २२ या फार्म्युल्याच्या आधारे कामाचे नियोजन केलेले आहे. २७ एप्रिल २००२ च्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्रालयाच्या शासन निर्णयानुसार जि. प. व पं. स. सदस्यनिहाय कामाचे वाटप करण्यात येऊ नये असे सूचविण्यात आले आहे. संबंधित नियोजन हे यापूर्वीच करण्यात आले आहे. ज्या १९ सदस्यांनी विशेष सभा बोलाविण्याचे पत्र जि.प. प्रशासनाला दिले आहे. या पत्रावर किमान सात सदस्यांच्या सह्या या बोगस (नातलगांनी स्वत: केलेल्या) आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी लोकमतला दिली.