शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

खासगी मोबाईल कंपन्यांकडून जिल्हा वाळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:16 IST

शहरात मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात खासगी कंपन्यांमध्ये फार मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक मोठ्या गावात टॉवर उभारले जात आहेत. मात्र या खासगी कंपन्यांनी गडचिरोली जिल्ह्याला वाळीत टाकले आहे. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, अहेरी यासारखे तालुकास्थळ सोडले तर ग्रामीण व दुर्गम भागात खासगी कंपन्यांचे नगण्य टॉवर आहेत.

ठळक मुद्देदुर्गम भागात टॉवरच नाही : बीएसएनएलच्या सेवेवर बहुतांश भागातील दूरसंचार सेवेचा भार

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरात मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात खासगी कंपन्यांमध्ये फार मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक मोठ्या गावात टॉवर उभारले जात आहेत. मात्र या खासगी कंपन्यांनी गडचिरोली जिल्ह्याला वाळीत टाकले आहे. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, अहेरी यासारखे तालुकास्थळ सोडले तर ग्रामीण व दुर्गम भागात खासगी कंपन्यांचे नगण्य टॉवर आहेत. भामरागड, एटापल्ली, धानोरा, सिरोंचा, कोरची या तालुक्यांमध्ये तर खासगी कंपन्यांचे एकही टॉवर नाही. या तालुक्यांमध्ये केवळ बीएसएनएल सेवा पुरवत आहे.मोबाईल व इंटरनेटचे महत्त्व वाढत चालले असल्याने देशातील प्रत्येक गाव मोबाईल क व्हरेज व इंटरनेट कनेक्टिव्हीटीने जोडण्याचे धोरण केंद्र शासनाने सुरू केले आहे. मोबाईलची वाढलेली बाजारपेठ लक्षात घेऊन खासगी कंपन्या सुद्धा ग्रामीण भागात जाऊन मोबाईल सेवा उपलब्ध करून देत आहेत. प्रत्येक मोठ्या गावी टॉवर उभारले जात आहे. विविध योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना भुरळ पाडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गळाकापू स्पर्धेत काही कंपन्यांना ताले सुध्दा ठोकावे लागले आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय भिन्न आहे. या जिल्ह्यातील नागरिकांचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे ते मोबाईलवर जास्त खर्च करू शकत नाही, असा चुकीचा अंदाज या कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडून काढला जात आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोबाईल टॉवर उभारून सेवा देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी या तालुक्यांमध्ये थोडाफार उत्पन्न मिळू शकते. ही बाब लक्षात आल्यानंतर खासगी कंपन्यांनी तालुकास्थळी व ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांमध्ये टॉवर उभारले आहे. मात्र कोरची, धानोरा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमध्ये खासगी कंपनीचा एकही टॉवर नाही. त्यामुळे येथील ग्राहकांना बीएसएनएलच्या सेवेवरच अवलंबून राहावे लागत आहे.बीएसएनएल सुध्दा अतिशय खराब सेवा पुरवत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र बीएसएनएलशिवाय पर्याय नसल्याने बीएसएनएलची मक्तेदारी झाली आहे. बऱ्याचवेळा कव्हरेज राहत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बीएसएनएलच्या टॉवरवर थ्रीजी यंत्रणा बसविली असल्याचे बीएसएनएलचे अधिकारी सांगत असले तरी टू-जीची सेवा सुध्दा उपलब्ध होत नसल्याची ओरड ग्राहकांकडून नेहमीच ऐकायला मिळत आहे. बीएसएनएलच्या सेवेत सुधारणा होणे आवश्यक आहे.सीएसआर निधीतून सेवा सक्तीची करावीप्रत्येक खासगी कंपनीला होणाऱ्या वार्षिक उत्पन्नाच्या काही खर्च सीएसआर (सामाजिक दायित्व निधी) खर्च करावा लागतो. गडचिरोली जिल्हा दूरसंचार सेवेबाबत उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून मोबाईल कंपन्यांना या जिल्ह्यात सीएसआर मोबाईल टॉवर उभारून सेवा देणे सक्तीचे करावे, असे झाल्यास मोबाईल कंपन्या आपोआप टॉवर उभे करतील. टॉवर न लावण्यासाठी नक्षलवादाची समस्या सांगितली जाते. मात्र गडचिरोली चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रभाव नाही. किमान अशा ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यास खासगी कंपन्यांना सक्ती करावी, अशी मागणी आहे.५२५ गावे कव्हरेजच्या बाहेरगडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६७९ गावे आहेत. बीएसएनएलने केलेल्या सर्वेक्षणात केवळ १ हजार १५४ गावांमध्ये मोबाईलचे कव्हरेज असल्याचे दिसून आले आहे. सुमारे ५२५ गावांमध्ये कव्हरेज नाही. नक्षलच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने लेफ्टविंग योजनेंतर्गत टॉवर बांधकामासाठी मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील काही टॉवरचे काम पूर्ण झाले आहे तर काही प्रगतीपथावर आहेत. तरीही जिल्ह्याच्या एकूण भूभागाच्या सुमारे ३१ टक्के भाग कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. संपूर्ण जिल्ह्यात बीएसएनएलचे केवळ १३१ मोबाईल टॉवर आहेत. जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत टॉवरची संख्या अतिशय कमी आहे. त्यातही जंगल भाग असल्याने मोबाईल टॉवर जास्त दूर अंतरावर रेंज पुरवू शकत नाही.

टॅग्स :Mobileमोबाइल