शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जिल्हाधिकाऱ्यांनी तेलंगणा शासनाकडे स्थानिकांची भूमिका मांडावी

By admin | Updated: February 7, 2016 02:23 IST

गोदावरी नदीवर सिरोंचा तालुक्याच्या पोचमपल्ली गावाजवळ मेडिगट्टा-कालेश्वर बॅरेज बांधकामासाठी सर्वेक्षण सुरू आहे.

दीपक आत्राम यांची मागणी : मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाबाबत घेतली भेटगडचिरोली : गोदावरी नदीवर सिरोंचा तालुक्याच्या पोचमपल्ली गावाजवळ मेडिगट्टा-कालेश्वर बॅरेज बांधकामासाठी सर्वेक्षण सुरू आहे. हे बॅरेज बांधकाम कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी गडचिरोली व चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तेलंगणा व महाराष्ट्राच्या आंतरराज्यीय बैठकीत स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका प्रखरपणे मांडावी, अशी मागणी अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपक आत्राम यांनी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे केली आहे. शनिवारी आदिवासी विद्यार्थी संघाच्या शिष्टमंडळाने गडचिरोली येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, ज्येष्ठ नेते मंदा शंकर, आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम, रवी बोगोनी, लक्ष्मण बोल्ले, पेंटीपाकाचे उपसरपंच कुमरी जडवेली आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम यांनी या बॅरेजमुळे सिरोंचा तालुक्यातील २१ गावांचे नुकसान होणार असून या भागातील शेतकऱ्यांची सुपीक शेतजमीन नष्ट होऊन त्यांना गाव सोडून स्थानांतरित व्हावे लागणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रृजला श्रवंती (प्राणहिता-चव्हेला) लिफ्ट एरिगेशन प्रकल्पाचे बांधकामही थांबविण्यात यावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राणहिता-चव्हेला योजना २०११ मध्ये सुरू झाली. त्यावेळी तत्कालीन सरकारने सदर कामाचा करार केला, असे सांगितले. मात्र आता या धरणाची उंची चार मीटरने कमी करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी दीपक आत्राम यांनी तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्याची आंतरराज्यीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेचा मुद्दा प्रखरपणे मांडावा, अशी विनंती त्यांच्याकडे केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत याच प्रश्नावर अनेक बाबींवर सविस्तर चर्चा झाली. (जिल्हा प्रतिनिधी)