शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

जिल्हाधिकाऱ्यांनी तेलंगणा शासनाकडे स्थानिकांची भूमिका मांडावी

By admin | Updated: February 7, 2016 02:23 IST

गोदावरी नदीवर सिरोंचा तालुक्याच्या पोचमपल्ली गावाजवळ मेडिगट्टा-कालेश्वर बॅरेज बांधकामासाठी सर्वेक्षण सुरू आहे.

दीपक आत्राम यांची मागणी : मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाबाबत घेतली भेटगडचिरोली : गोदावरी नदीवर सिरोंचा तालुक्याच्या पोचमपल्ली गावाजवळ मेडिगट्टा-कालेश्वर बॅरेज बांधकामासाठी सर्वेक्षण सुरू आहे. हे बॅरेज बांधकाम कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी गडचिरोली व चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तेलंगणा व महाराष्ट्राच्या आंतरराज्यीय बैठकीत स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका प्रखरपणे मांडावी, अशी मागणी अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपक आत्राम यांनी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे केली आहे. शनिवारी आदिवासी विद्यार्थी संघाच्या शिष्टमंडळाने गडचिरोली येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, ज्येष्ठ नेते मंदा शंकर, आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम, रवी बोगोनी, लक्ष्मण बोल्ले, पेंटीपाकाचे उपसरपंच कुमरी जडवेली आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम यांनी या बॅरेजमुळे सिरोंचा तालुक्यातील २१ गावांचे नुकसान होणार असून या भागातील शेतकऱ्यांची सुपीक शेतजमीन नष्ट होऊन त्यांना गाव सोडून स्थानांतरित व्हावे लागणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रृजला श्रवंती (प्राणहिता-चव्हेला) लिफ्ट एरिगेशन प्रकल्पाचे बांधकामही थांबविण्यात यावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राणहिता-चव्हेला योजना २०११ मध्ये सुरू झाली. त्यावेळी तत्कालीन सरकारने सदर कामाचा करार केला, असे सांगितले. मात्र आता या धरणाची उंची चार मीटरने कमी करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी दीपक आत्राम यांनी तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्याची आंतरराज्यीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेचा मुद्दा प्रखरपणे मांडावा, अशी विनंती त्यांच्याकडे केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत याच प्रश्नावर अनेक बाबींवर सविस्तर चर्चा झाली. (जिल्हा प्रतिनिधी)