शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

कृषी कर्जवाटपात जिल्हा बँकेची आघाडी

By admin | Updated: June 24, 2017 01:16 IST

खरीप हंगामाला सुरूवात होऊन शेतकऱ्यांची बियाणे खरेदी जोरात सुरू आहे. यासोबत शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे कामही जोमाने सुरू आहे.

२४.११ कोटींचे वाटप : इतर बँकांची १० टक्केही लक्ष्यपूर्ती नाही लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : खरीप हंगामाला सुरूवात होऊन शेतकऱ्यांची बियाणे खरेदी जोरात सुरू आहे. यासोबत शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे कामही जोमाने सुरू आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत २४ कोटी ११ लाख ५२ हजार रुपयांचे कर्जवाटप करून आपले खरीप कर्जवाटपाचे उद्दिष्ट ४५.५० टक्के पूर्ण केले आहे. त्या तुलनेत ग्रामीण व राष्ट्रीयकृत बँका मात्र बऱ्याच मागे आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी व्यापारी बँकांना ११२ कोटी २३ लाखांचा लक्ष्यांक, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला २९ कोटी ३९ लाखांचा लक्ष्यांक तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५३ कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्यात व्यापारी बँकांनी १५२२ शेतकऱ्यांना अवघे ८ कोटी ९ लाख रुपयांचे कर्जवाटप करून ६ टक्के लक्ष्यांक गाठला आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने २०० शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ३ कोटी ३३ लाखांचे कर्जवाटप करून १० टक्के लक्ष्यांक गाठला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. त्यांनी ६८७६ शेतकऱ्यांना २४ कोटी १२ लाख रुपयांचे कर्जवाटप करून कर्जवाटपाचा लक्ष्यांक ४५.५० टक्के गाठला आहे. जिल्हा बँकेने सर्वाधिक कर्जवाटप चामोर्शी तालुक्यात केले आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कर्जमाफीसाठी सुरू असलेले आंदोलन पेटल्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी थकित कर्जाची रक्कम बँकेत भरून ‘नो ड्यू’ प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे यावर्षी खरीपाचे कर्जवाटप प्रत्यक्षात उशिरा सुरू झाले. ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वीच कर्ज भरले होते त्यांनी नवीन कर्जवाटप उचलून शेतीची कामे मार्गी लावली. आता नवीन कर्ज घेण्यासाठी अनेक शेतकरी प्रतीक्षेत असले तरी शासनाच्या निकषानुसार कोण कर्जमाफीत बसणार याची छाननी करण्यात वेळ लागत आहे. व्यापारी बँकांवर नियंत्रणाची गरज शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरूवातीच्या काळातच पैशाची जास्त गरज असते. पण नेमके याचवेळी व्यापारी बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जवाटपात हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. ऐन हंगामात शेतीच्या कामासाठी द्यावा लागणारा वेळ बँकांच्या पायऱ्या झिजविण्यात खर्च होत आहे. त्यामुळे शासनाने या बँकांना कर्जवाटपाच्या बाबतीत कडक निर्देश द्यावेत अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शासन हमीतील १० हजारांचे कर्ज अजूनही अधांतरी शासनाच्या हमीनुसार ज्या शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये कर्जवाटप करायचे होते त्यांच्या यादीचा घोळ अजूनही दूर झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी काढलेल्या नवीन जीआरमध्ये आधीच्या जीआरमधील काही निकषांमध्ये शिथिलता दिल्यामुळे आणखी याद्यांमध्ये बदल करावा लागत आहे. या भानगडींमुळे अद्याप एकाही शेतकऱ्याला हे तातडीचे १० हजारांचे कर्ज मिळाले नसल्याची माहिती लीड बँकेकडून प्राप्त झाली आहे.