शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

कृषी कर्जवाटपात जिल्हा बँकेची आघाडी

By admin | Updated: June 24, 2017 01:16 IST

खरीप हंगामाला सुरूवात होऊन शेतकऱ्यांची बियाणे खरेदी जोरात सुरू आहे. यासोबत शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे कामही जोमाने सुरू आहे.

२४.११ कोटींचे वाटप : इतर बँकांची १० टक्केही लक्ष्यपूर्ती नाही लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : खरीप हंगामाला सुरूवात होऊन शेतकऱ्यांची बियाणे खरेदी जोरात सुरू आहे. यासोबत शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे कामही जोमाने सुरू आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत २४ कोटी ११ लाख ५२ हजार रुपयांचे कर्जवाटप करून आपले खरीप कर्जवाटपाचे उद्दिष्ट ४५.५० टक्के पूर्ण केले आहे. त्या तुलनेत ग्रामीण व राष्ट्रीयकृत बँका मात्र बऱ्याच मागे आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी व्यापारी बँकांना ११२ कोटी २३ लाखांचा लक्ष्यांक, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला २९ कोटी ३९ लाखांचा लक्ष्यांक तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५३ कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्यात व्यापारी बँकांनी १५२२ शेतकऱ्यांना अवघे ८ कोटी ९ लाख रुपयांचे कर्जवाटप करून ६ टक्के लक्ष्यांक गाठला आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने २०० शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ३ कोटी ३३ लाखांचे कर्जवाटप करून १० टक्के लक्ष्यांक गाठला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. त्यांनी ६८७६ शेतकऱ्यांना २४ कोटी १२ लाख रुपयांचे कर्जवाटप करून कर्जवाटपाचा लक्ष्यांक ४५.५० टक्के गाठला आहे. जिल्हा बँकेने सर्वाधिक कर्जवाटप चामोर्शी तालुक्यात केले आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कर्जमाफीसाठी सुरू असलेले आंदोलन पेटल्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी थकित कर्जाची रक्कम बँकेत भरून ‘नो ड्यू’ प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे यावर्षी खरीपाचे कर्जवाटप प्रत्यक्षात उशिरा सुरू झाले. ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वीच कर्ज भरले होते त्यांनी नवीन कर्जवाटप उचलून शेतीची कामे मार्गी लावली. आता नवीन कर्ज घेण्यासाठी अनेक शेतकरी प्रतीक्षेत असले तरी शासनाच्या निकषानुसार कोण कर्जमाफीत बसणार याची छाननी करण्यात वेळ लागत आहे. व्यापारी बँकांवर नियंत्रणाची गरज शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरूवातीच्या काळातच पैशाची जास्त गरज असते. पण नेमके याचवेळी व्यापारी बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जवाटपात हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. ऐन हंगामात शेतीच्या कामासाठी द्यावा लागणारा वेळ बँकांच्या पायऱ्या झिजविण्यात खर्च होत आहे. त्यामुळे शासनाने या बँकांना कर्जवाटपाच्या बाबतीत कडक निर्देश द्यावेत अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शासन हमीतील १० हजारांचे कर्ज अजूनही अधांतरी शासनाच्या हमीनुसार ज्या शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये कर्जवाटप करायचे होते त्यांच्या यादीचा घोळ अजूनही दूर झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी काढलेल्या नवीन जीआरमध्ये आधीच्या जीआरमधील काही निकषांमध्ये शिथिलता दिल्यामुळे आणखी याद्यांमध्ये बदल करावा लागत आहे. या भानगडींमुळे अद्याप एकाही शेतकऱ्याला हे तातडीचे १० हजारांचे कर्ज मिळाले नसल्याची माहिती लीड बँकेकडून प्राप्त झाली आहे.