शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

जिल्हा बँकेत नोटबंदीने ग्रामीण भाग अडचणीत

By admin | Updated: November 16, 2016 01:59 IST

चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० च्या नोटा स्वीकारण्यास देशभरातील जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने

५० टक्के शाखांत व्यवहार ठप्प : सहकारी बँकेत नोटा स्वीकारण्यास मनाईच्या निर्णयाचा फटकागडचिरोली : चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० च्या नोटा स्वीकारण्यास देशभरातील जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने अचानक मनाई केली असून सोमवारी दुपारनंतर आलेल्या या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची मोठी अडचण झाली आहे.गडचिरोली हा राज्यातील दुर्गम जिल्हा आहे. या राज्यात अत्यंत दुर्गम गावापर्यंत गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्याच शाखा आहेत. राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांचे जाळे केवळ तालुका मुख्यालय व काही ठराविक मोठ्या गावातच आहे. जिल्ह्यात ११९ बँक शाखा असून त्यापैकी ५५ शाखा एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत. तसेच जिल्हा सहकारी बँकेचे एटीएम सुध्दा दुर्गम गावांमध्ये आहे. ८ नोव्हेंबरला नोटा बंदीचा निर्णय आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक शेतकरी, नागरिक व बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यावर जुन्या नोटा जमा करून नव्या नोटा वितरणाचे काम सुरू केले होते. परंतु अचानक सोमवारी जुन्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय आल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणावर याचा मोठा प्रभाव पडणार आहे. भामरागड तालुक्यात जवळजवळ ५० टक्के नागरिकांची खाती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे. तर कोरची तालुक्यातही ५०० रूपयांची नोट बदलविण्यासाठी नागरिकांना ५० किमीचे अंतर चालून येऊन यासाठी ३०० रूपये खर्च करावे लागत आहे. ही परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, कोरची, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा आदी दुर्गम तालुक्यातील सर्वच गावांची आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी अनेक नागरिक व ग्राहक जुळलेले आहेत. त्यामुळे या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मंगळवारी कोणतीही गर्दी दिसून आली नाही. ग्रामीण भागातील नागरिक तालुका मुख्यालयाच्या शाखांमध्ये गेले. मात्र तेथे त्यांच्या नोटा स्वीकारण्यात आल्या नाही. त्यामुळे त्यांची मोठी निराशा झाली. त्यामुळे शासनाने गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला विशेष बाब म्हणून लोकांच्या सोयीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या दृष्टीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला माहिती द्यावी. (प्रतिनिधी)रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयाची माहिती सोमवारी मिळाली. हा निर्णय देशव्यापी असून या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बँक खातेदार, शेतकरी यांची मोठी अडचण होणार आहे. आमच्या सर्वच शाखा रिमोट एरियात आहेत. या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावरून काही हालचाली होऊ शकतात. - सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककोरची तालुक्यात जिल्हा को-आॅपरेटीव्ह बँकेच्या कोटगूल, बेतकाठी व कोरचीत तीन शाखा आहेत. तर राष्ट्रीयकृत बँकेची केवळ कोरचीतच एक शाखा सुरू आहे. सहकारी बँकेच्या कोरचीतील शाखेत ३४ हजार बँक खाते आहेत. बेतकाठी व कोटगूल शाखेत प्रत्येकी सात हजार बँक खाते आहेत. त्यामुळे सहकारी बँकेत पैसे बदलून द्यावे.- नंदकिशोर वैरागडे, सामाजिक कार्यकर्ते, कोरची