कार्यक्रमाला अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई, राजाराम उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे, पाेलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, गणेश कड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीला क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून गावातील २० नागरिकांना जात प्रमाणपत्र व २० आधारकार्ड वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या साेडविण्यासाठी पाेलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. ज्या नागरिकांना जात प्रमाणपत्रांची आवश्यकता अशा नागरिकांनी पाेलीस ठाण्यात कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन उपविभागीय पाेलीस अधिकारी बजरंग देसाई यांनी केले. याप्रसंगी ग्रामसचिव एस.एस. सडमेक, ग्रा. पं. सदस्य वंदना अलोने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी अधिकारी भोरे, संचालन पाेलीस शिपाई सचिन वनकर तर आभार पीएसआय काेल्हे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पाेलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.