शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

पाच शेतकरी गटांना कृषी साहित्य वाटप

By admin | Updated: June 12, 2017 00:56 IST

आदिवासी विकास विभागामार्फत अहेरी व एटापल्ली या दोन तालुक्यातील २० गावांमध्ये सुरू असलेल्या हवामान सुसंगत

सुसंगत गाव प्रकल्पाची अंमलबजावणी : आदिवासी विकास विभागाचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासी विकास विभागामार्फत अहेरी व एटापल्ली या दोन तालुक्यातील २० गावांमध्ये सुरू असलेल्या हवामान सुसंगत गाव प्रकल्पाच्या माध्यमातून पाच शेतकरी गटांना भात लावणी यंत्र, स्प्रेपंप व ब्रश कटर आदी कृषी साहित्य वाटप करण्यात आले. आलापल्ली येथे आयोजित कृषी औजारे वाटप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी लाटकर, मोरे, पडघम, मट्टाजी, शर्मा, अहेरीचे तहसीलदार घोरडे, बिसा संस्थेचे अधिकारी डॉ. प्रकाश नाईक, डॉ. प्रसून, प्रफुल राऊत, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे आशिष नाफडे, मिलिंद कांबळे, सागर मंचलवार, अंकूर जोतीशी आदी मान्यवर उपस्थित होते.पारंपारिक शेतीवरून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे, जेणेकरून शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल या हेतूने अहेरी व एटापल्ली तालुक्याच्या २० गावातील पाच शेतकरी गटांना कृषी औजारे संच वितरित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला २० गावातील जवळपास ३०० आदिवासी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश नाईक, संचालक मिलिंद कांबळे यांनी केले तर आभार आशिष नाफडे यांनी मानले. याप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सुसंगत गाव प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रबी हंगामात गहू व चना पिकाचे बियाणे वितरित केली जातात.