शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

सिरोंचातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी रबी हंगामात प्रामुख्याने मिरची, मका, कोबी, भाजीपाला, उन्हाळी धान आदी नगदी पिके घेतात. या पिकांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ दिवसात संपूर्ण शेत पाण्याने डुबणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या हस्तक्षेपाची गरज : मेडीगड्डा बॅरेजचे पाणी उभ्या पिकांमध्ये शिरण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : मेडीगड्डा बॅरेजचे पाणी उभ्या पिकांमध्ये शिरत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तेलंगणा व महाराष्ट्र शासनाविषयी असंतोष खदखदत आहे. भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी रबी हंगामात प्रामुख्याने मिरची, मका, कोबी, भाजीपाला, उन्हाळी धान आदी नगदी पिके घेतात. या पिकांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ दिवसात संपूर्ण शेत पाण्याने डुबणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. ऐन काढणीदरम्यान शेतामध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे, तेलंगणा सरकारने जमीन अधिग्रहण करून मोबदला न देताच पाणी अडविण्यास सुरूवात केली आहे. वडधम, आयपेठा, पोचमपल्ली, तुमनूर माल, पेंटीपाका, मुंगापूर या गावांमधील जवळपास २३८.९२ हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे. यापैकी काही जमिनीची खरेदी झाली आहे. तर काही जमिनीची खरेदी अजूनपर्यंत झालेली नाही. आणखी १२ गावातील जमिनीचा प्रस्ताव दिला आहे. पण जमिनीची खरेदी प्रक्रिया आटोपण्याआधीच पाणी अडविले जात आहे. या धरणाचा लाभ तेलंगणाला होत आहे. बुडीत क्षेत्र मात्र सिरोंचा तालुक्याच्या वाट्याला आले आहे. या ठिकाणी बॅरेज बांधकामाला महाराष्ट्र शासनाने विरोध करणे आवश्यक होते. मात्र कोणताही विरोध न केल्याने तेलंगणा सरकारने धरण बांधले आहे. उन्हाळभर गेट बंदच राहिल्यास आणखी काही शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.शेतकरी करणार आंदोलनमेडीगड्डा बॅरेज महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक असलेल्या गोदावरी नदीवर बांधले आहे. त्यामुळे मेडीगड्डा धरणाचा प्रश्न आंतरराज्यीय बनला आहे. सिरोंचातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर तेलंगणा सरकारला काहीच सोयरसूतक नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने त्यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. विशेष करून स्थानिक लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून तेलंगणा सरकारवर दबाव वाढविणे आवश्यक आहे. मात्र हे काम होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारची हिंमत वाढत चालली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती