शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

ऋषिपंचमीच्या व्रताला यंदा कोरोना संसर्गाचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

कोरोनामुळे मागील वर्षीही ऋषिपंचमी व्रत माेजक्या महिलांना अपवाद वगळता उर्वरित महिलांना व्रत करता आले नाही. यावर्षी ११ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीचे व्रत भाद्रपदातील शुक्ल पंचमीला केले जाते. सामान्यतः हे व्रत गणेशचतुर्थीच्या नंतरच्या दिवशी आणि हरितालिकेच्या व्रताच्या दोन दिवसांनंतर केले जाते. हे व्रत स्त्रियांना अखंड सौभाग्य देणारे असल्याचे मानले जाते. या दिवशी देवदेवतांचे पूजन केले जात नाही, तर पंचमीच्या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : ऋषिपंचमीच्या दिवशी स्त्रिया सप्तऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ऋषिपंचमीचे व्रत दरवर्षी ठेवतात. हरितालिका गौरी व्रताच्या दुसऱ्या दिवशी हे व्रत ठेवले जाते. दरवर्षी विदर्भाची काशी मार्कण्डेश्वर देवस्थान या धार्मिक स्थळी हे व्रत वैनगंगा नदीच्या तीरावर केले जाते. या वर्षी ११ सप्टेंबरला ऋषिपंचमी व्रत आहे. मात्र सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने हा ऋषिपंचमी व्रत करणाऱ्या महिलांना या व्रतापासून मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे मागील वर्षीही ऋषिपंचमी व्रत माेजक्या महिलांना अपवाद वगळता उर्वरित महिलांना व्रत करता आले नाही. यावर्षी ११ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीचे व्रत भाद्रपदातील शुक्ल पंचमीला केले जाते. सामान्यतः हे व्रत गणेशचतुर्थीच्या नंतरच्या दिवशी आणि हरितालिकेच्या व्रताच्या दोन दिवसांनंतर केले जाते. हे व्रत स्त्रियांना अखंड सौभाग्य देणारे असल्याचे मानले जाते. या दिवशी देवदेवतांचे पूजन केले जात नाही, तर पंचमीच्या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते. शास्त्रातील मान्यतेनुसार ऋषिपंचमीचे व्रत शुद्ध मनाने केल्यास सर्व दुःख दूर होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळते. या वर्षी ऋषिपंचमी शनिवार ११ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीचा दिवस व्रत ठेवण्यासाठी फलदायक असतो. पौराणिक मान्यतेनुसार ऋषिपंचमीचे हे व्रत स्त्रियांनी केल्यास त्यांना सुख-शांती आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सुहासिनी स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होते. या दिवशी गंगास्नानाचेही महत्त्व असते. महिला या दिवशी सप्तऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि सुख, शांती व समृद्धीसाठी हे व्रत करतात. यात पूजा केल्यानंतर ऋषिपंचमीच्या व्रताची कथा ऐकली जाते आणि पंडितांना भोजन देऊन व्रताचे उद्यापन करण्यात येते. अविवाहित स्त्रियांसाठीही हे व्रत महत्त्वपूर्ण व फलदायी मानले जाते दरवर्षी मार्कडा देव येथे वैनगंगा तीरावर वसलेले मार्कण्डेश्वर मंदिर या पवित्र तीर्थक्षेत्र स्थळी ऋषिपंचमी व्रत केले जाते मात्र यावर्षीही हे व्रत महिलांना कोरोनामुळे करता येईल की नाही ही शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ऋषिपंचमी दिनी मार्कंडास्थळी चोख पोलीस बंदोबस्त राहणार असून याबाबत तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी पोलीस प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत.सण-समारंभ साजरा करताना गर्दी होऊन कोराेना प्रादुर्भाव वाढण्याचा धोका उद्भवू शकतो त्यामुळे धार्मिक स्थळी भाविकांना प्रवेश करण्यास तसेच धार्मिक पूजा करण्यास मनाई करण्याबाबत सूचना आहेत.

मंदिरात गर्दी करू नका- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यात जमावबंदी लागू असून कोणत्याही प्रकारचे धार्मिक उत्सव, राजकीय कार्यक्रम करता येणार नाहीत. यानुसार तहसीलदार चामोर्शी यांच्याकडून व चामोर्शी पाेलिसांकडून मार्कंडादेव मंदिराजवळ बंदोबस्त उभारण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी किंवा मंदिर प्रवेशासाठी बंदी घालण्यात आलेली असून नागरिकांनी त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिर