शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

सर्वसाधारण क्षेत्रातील २० गावांबाबत आक्षेप

By admin | Updated: May 24, 2017 00:31 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करताना यावर्षीपासून पहिल्यांदाच गावांची अवघड व सर्वसाधारण या दोन भागात विभागणी करण्यात आली आहे.

अंतिम निर्णयाकडे लक्ष : अवघड क्षेत्रात टाकण्यासाठी अर्जलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करताना यावर्षीपासून पहिल्यांदाच गावांची अवघड व सर्वसाधारण या दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील एकूण १ हजार ५३६ गावांपैकी ८९१ गावे अवघड क्षेत्रात तर ६४५ गावे सर्वसाधारण क्षेत्रात टाकली होती. यापैकी २० गावांबाबत शिक्षकांनी आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळा दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र या शाळांमध्ये अध्यापन करण्यास शिक्षक तयार होत नसल्याने दरवर्षी शिक्षकांच्या बदल्यांदरम्यान राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये मोठा गोंधळ उडत होता. या सर्व प्रकाराला आळा बसण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच शासनाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्ह्यातील गावांचे अवघड व सर्वसाधारण या दोन भागात विभाजन करण्याचे निर्देश दिले. जे क्षेत्र तालुका मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यास सोयीसुविधा नाही. दुर्गम व डोंगराळ भागातील गावांना अवघड क्षेत्र म्हणून जाहीर करावे. तर हे क्षेत्र वगळता इतर क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रात टाकण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षण विभागाने मागील दोन महिन्यांपासून विविध विभागाकडून माहिती मागितली. त्या माहितीवरून जिल्हा परिषदेने ६४५ गावे सर्वसाधारण क्षेत्रात मोडतात. तर ८९१ गावे अवघड क्षेत्रात मोडत असल्याचे जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, कोरची हे तालुके जंगलांनी व्यापलेले आहेत. या तालुक्यांमध्ये नक्षलवादाची समस्या आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील सर्वच गावे अवघड क्षेत्रात टाकण्यात आली आहेत. तर आरमोरी, देसाईगंज या तालुक्यांमधील सर्वच गावे सर्वसाधारण क्षेत्रात टाकण्यात आली आहेत. सर्वसाधारण व अवघड क्षेत्र जाहीर झाल्यानंतर यावर आक्षेप नोंदविण्याचे अधिकार शिक्षक व शिक्षक संघटनांना देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांनी २० गावांबाबत आक्षेप नोंदविला आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांचे संबंधित अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. अवघड व सर्वसाधारण क्षेत्रासंदर्भात शासनाने जो निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शिक्षकांकडून अर्ज मागविण्याची तरतूद आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा राहणार आहे. यावर्षी तयार झालेली गावांची यादी भविष्यातही कायम राहणार आहे. या यादीनुसारच भविष्यात शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे या यादीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षकांच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी किती गावे अवघडमध्ये टाकतात व किती गावे सर्वसाधारणमध्ये टाकतात याकडे जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचे लक्ष लागले आहे. बदली झालेले १२ शिक्षक भारमुक्तफेब्रुवारी महिन्यात आंतर जिल्हा बदलीने ज्या शिक्षकांची बदली झाली होती. अशा १२ शिक्षकांना गडचिरोली जिल्हा परिषदेने नुकतेच भारमुक्त केले आहे. सदर बदल्या आपसी स्वरूपाच्या राहत असल्याने गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत सेवा देणाऱ्या १२ शिक्षकांची त्यांच्या स्वजिल्ह्यात बदली झाली आहे. तर त्याच जिल्ह्यांमधून गडचिरोली जिल्ह्यात १२ शिक्षक रूजू होणार आहेत. त्यामुळे मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील असलेल्या शिक्षकांना या जिल्ह्यात सेवा देण्यास संधी मिळणार आहे. यावर्षीपासून आंतर जिल्हा बदलीचे अर्ज आॅनलाईन झाले आहेत. यामुळे शिक्षकांचा बराच खर्च श्रम वाचण्यास मदत झाली आहे. अनेक शिक्षकांचे अर्ज भरून झाले नव्हते. त्यामुळे आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज करण्यास २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.