शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

सर्वसाधारण क्षेत्रातील २० गावांबाबत आक्षेप

By admin | Updated: May 24, 2017 00:31 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करताना यावर्षीपासून पहिल्यांदाच गावांची अवघड व सर्वसाधारण या दोन भागात विभागणी करण्यात आली आहे.

अंतिम निर्णयाकडे लक्ष : अवघड क्षेत्रात टाकण्यासाठी अर्जलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करताना यावर्षीपासून पहिल्यांदाच गावांची अवघड व सर्वसाधारण या दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील एकूण १ हजार ५३६ गावांपैकी ८९१ गावे अवघड क्षेत्रात तर ६४५ गावे सर्वसाधारण क्षेत्रात टाकली होती. यापैकी २० गावांबाबत शिक्षकांनी आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळा दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र या शाळांमध्ये अध्यापन करण्यास शिक्षक तयार होत नसल्याने दरवर्षी शिक्षकांच्या बदल्यांदरम्यान राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये मोठा गोंधळ उडत होता. या सर्व प्रकाराला आळा बसण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच शासनाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्ह्यातील गावांचे अवघड व सर्वसाधारण या दोन भागात विभाजन करण्याचे निर्देश दिले. जे क्षेत्र तालुका मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यास सोयीसुविधा नाही. दुर्गम व डोंगराळ भागातील गावांना अवघड क्षेत्र म्हणून जाहीर करावे. तर हे क्षेत्र वगळता इतर क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रात टाकण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षण विभागाने मागील दोन महिन्यांपासून विविध विभागाकडून माहिती मागितली. त्या माहितीवरून जिल्हा परिषदेने ६४५ गावे सर्वसाधारण क्षेत्रात मोडतात. तर ८९१ गावे अवघड क्षेत्रात मोडत असल्याचे जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, कोरची हे तालुके जंगलांनी व्यापलेले आहेत. या तालुक्यांमध्ये नक्षलवादाची समस्या आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील सर्वच गावे अवघड क्षेत्रात टाकण्यात आली आहेत. तर आरमोरी, देसाईगंज या तालुक्यांमधील सर्वच गावे सर्वसाधारण क्षेत्रात टाकण्यात आली आहेत. सर्वसाधारण व अवघड क्षेत्र जाहीर झाल्यानंतर यावर आक्षेप नोंदविण्याचे अधिकार शिक्षक व शिक्षक संघटनांना देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांनी २० गावांबाबत आक्षेप नोंदविला आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांचे संबंधित अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. अवघड व सर्वसाधारण क्षेत्रासंदर्भात शासनाने जो निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शिक्षकांकडून अर्ज मागविण्याची तरतूद आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा राहणार आहे. यावर्षी तयार झालेली गावांची यादी भविष्यातही कायम राहणार आहे. या यादीनुसारच भविष्यात शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे या यादीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षकांच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी किती गावे अवघडमध्ये टाकतात व किती गावे सर्वसाधारणमध्ये टाकतात याकडे जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचे लक्ष लागले आहे. बदली झालेले १२ शिक्षक भारमुक्तफेब्रुवारी महिन्यात आंतर जिल्हा बदलीने ज्या शिक्षकांची बदली झाली होती. अशा १२ शिक्षकांना गडचिरोली जिल्हा परिषदेने नुकतेच भारमुक्त केले आहे. सदर बदल्या आपसी स्वरूपाच्या राहत असल्याने गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत सेवा देणाऱ्या १२ शिक्षकांची त्यांच्या स्वजिल्ह्यात बदली झाली आहे. तर त्याच जिल्ह्यांमधून गडचिरोली जिल्ह्यात १२ शिक्षक रूजू होणार आहेत. त्यामुळे मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील असलेल्या शिक्षकांना या जिल्ह्यात सेवा देण्यास संधी मिळणार आहे. यावर्षीपासून आंतर जिल्हा बदलीचे अर्ज आॅनलाईन झाले आहेत. यामुळे शिक्षकांचा बराच खर्च श्रम वाचण्यास मदत झाली आहे. अनेक शिक्षकांचे अर्ज भरून झाले नव्हते. त्यामुळे आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज करण्यास २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.