शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या निर्णयाने असंतोष

By admin | Updated: July 8, 2014 23:29 IST

राज्यातील आदिवासीबहूल असलेल्या १५ जिल्ह्यात केवळ आदिवासींनाच नोकरीत प्राधान्य देण्याचा राज्यपालांचा निर्णय या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या इतर जाती समूहांवर अन्याय करणारा आहे.

फेरविचार करा : नक्षलग्रस्त भागात आदिवासींना नोकरीत प्राधान्य देण्याचा निर्णयगडचिरोली : राज्यातील आदिवासीबहूल असलेल्या १५ जिल्ह्यात केवळ आदिवासींनाच नोकरीत प्राधान्य देण्याचा राज्यपालांचा निर्णय या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या इतर जाती समूहांवर अन्याय करणारा आहे. या निर्णयामुळे नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नव्या असंतोषाला तोंड फुटले आहे. आदिवासीबहूल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र या निर्णयाविरोधात बोलण्यास तयार नाही, असा आरोप गैर आदिवासी नागरिकांनी केला आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी घटनेच्या पाचव्या अनुसूचीनुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करीत हा आदेश जारी केला असून आता राज्यपालांच्या सचिवांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी बैठका घेणे सुरू केल्याने या जिल्ह्यांमधील इतर जाती समूहांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या नव्या निर्णयानुसार जिल्हास्तरावर भरण्यात येणाऱ्या वर्ग तीन व चारच्या जागा आता केवळ आदिवासींमधूनच भरल्या जाणार आहेत. आजवर या जागांवर आदिवासींसोबतच या जिल्ह्यांमधील इतर जाती समूहातील उमेदवारांनाही संधी उपलब्ध होत होती. आता ती मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. राज्यपालांचा हा निर्णय अजूनही मानव विकास व सामाजिक निर्देशाकांत मागे असलेल्या आदिवासींसाठी दिलासा देणारा असला तरी या जिल्ह्यांमधील इतर जातीतील पात्र उमेदवारांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण करणाराही आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. याच जिल्ह्यांमध्ये इतर मागास प्रवर्गात येणाऱ्या जातीही भरपूर आहेत. शिवाय, याच जिल्ह्यांमध्ये दलितांची संख्याही लक्षणिय आहे. आदिवासींची संख्या जास्त आहे, हे लक्षात घेऊन राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी या जिल्ह्यात इतर मागास प्रवर्गासाठी असलेले आरक्षण १८ वरून ८ टक्क्यांवर आणले होते. याविरोधात या प्रवर्गातील जाती समूह लढत असतानाच आता हा नवा निर्णय आल्याने या प्रवर्गातील जाती समूहांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यात आदिवासींसोबतच इतर जाती समूहांची संख्यासुध्दा लक्षणीय आहे. या प्रवर्गातील उमेदवारांना आता नोकरीसाठी इतरत्र धाव घ्यावी लागणार आहे. हे जिल्हे नक्षलग्रस्त असल्यामुळे येथे शासकीय कर्मचाऱ्यांची पदसंख्याही भरपूर आहे. त्याचा फायदा घेऊन आजवर या प्रवर्गातील अनेकांना नोकरी मिळाली. शिक्षणात मागे असल्यामुळे आदिवासी मात्र नोकरीपासून वंचित राहिले. आता आदिवासींनाच नोकरी देण्याचे बंधन आल्याने व पात्र उमेदवार मिळण्याची शक्यता कमी असल्याने अनेक पदे रिक्त राहण्याची भीती शासकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे. नक्षलवाद्यांमुळे हा भाग कमालीचा संवेदनशील आहे. अशा स्थितीत जाती समूहांमध्ये नव्याने निर्माण होणारा असंतोष धोकादायक ठरू शकतो, अशी भीती सुध्दा अधिकारी बोलून दाखवत आहेत. मात्र या सर्व प्रश्नावर आदिवासीबहूल भागातील लोकप्रतिनिधी कोणतीही भूमिका घेण्यास तयार नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यातील इतर जातींचे नागरिकही बहुसंख्येने आहेत. ज्या भागासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील बहुतांशी आमदार हे आदिवासी समाजाचेच आहे. ज्यामुळे त्यांचा या निर्णयाला विरोध नाही. गैर आदिवासीवर अन्याय झाला तरी तो होऊ द्यायचा, अशी त्यांची भूमिका आहे. (जिल्हा प्रतिनिधी)