शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

रूग्णांची परवड

By admin | Updated: August 3, 2014 00:04 IST

राज्य शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत दीड लाख रूपयापर्यंत मोफत औषधोपचार करण्याची सोय असली तरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत नोंदणी असलेले एकच रूग्णालय असल्याने

जीवनदायी योजना : एकच रूग्णालय; १५०१ लोकांनाच लाभ दिगांबर जवादे - गडचिरोलीराज्य शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत दीड लाख रूपयापर्यंत मोफत औषधोपचार करण्याची सोय असली तरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत नोंदणी असलेले एकच रूग्णालय असल्याने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या रूग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. दोन वर्षात केवळ १५०१ रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. वाढत्या महागाईबरोबरच दवाखान्याचा खर्चही सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा झाला आहे. तर सरकारी रूग्णालयांचा दर्जा सुमार असल्याने या रूग्णालयात औषधोपचार घेण्यास नागरिक तयार होत नव्हते. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २ जुलै २०१२ पासून गडचिरोलीसह निवडक ८ जिल्ह्यात सुरू केली. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ पासून सदर योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्य शासनाने केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांचा ३३३ रूपये प्रति कुटुंब रक्कम भरून विमा काढला आहे. या विम्यांतर्गत सुमारे ९७२ प्रकारच्या आजारांवर नोंदणीकृत खासगी रूग्णालयांमध्ये दीड लाख रूपयापर्यंतच मोफत औषधोपचार करण्यात येते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र ज्या गडचिरोली जिल्ह्यापासून या योजनेची सुरूवात झाली. तो जिल्हा मात्र उपेक्षितच राहिला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत नोंदणी असलेले सुमारे ४७६ रूग्णालय आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान १० रूग्णालये आढळून येतात. गडचिरोली जिल्ह्यात मात्र गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय हे एकमेव नोंदणीकृत रूग्णालय आहे. गडचिरोली जिल्हा क्षेत्रफळाने बराच मोठा आहे. सिरोंचा, भामरागड, कोरची या तालुक्यातील रूग्णाला शेकडो किमीचे अंतर पार करून गडचिरोली येथे येणे शक्य होत नाही. परिणामी या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या रूग्णांची संख्या सुध्दा कमी असल्याची दिसून येते. दोन वर्षामध्ये केवळ १५०१ रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. इतर जिल्ह्यात मात्र रूग्णांची आकडेवारी ७ हजार ते १५ हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. याचा अर्थ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना अत्यंत कमी लाभ मिळाला असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना या योजनेविषयी फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. राजीव गांधी जीवनदायी योजनेत रूग्णालयाचा समावेश होण्यासाठी संबंधित रूग्णालयात ५० खाटांची व्यवस्था असावी. त्यामध्ये अतिदक्षाता विभाग व एमबीबीएस डॉक्टर असावे या अटी आहेत. या अटी अंतर्गत गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय हे एकमेव रूग्णालय आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक, आर्थिक परिस्थितीचा विचार करून गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अट शिथील करावी, अशी मागणी होत आहे. जेणे करून आरमोरी, अहेरी, कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयांची या योजनेंतर्गत नोंदणी होऊ शकेल. या तीन रूग्णालयात जीवनदायी योजनेंतर्गतचा लाभ मिळाल्यास लाभार्थ्यांची संख्या आपोआप वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.