शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

रूग्णांची परवड

By admin | Updated: August 3, 2014 00:04 IST

राज्य शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत दीड लाख रूपयापर्यंत मोफत औषधोपचार करण्याची सोय असली तरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत नोंदणी असलेले एकच रूग्णालय असल्याने

जीवनदायी योजना : एकच रूग्णालय; १५०१ लोकांनाच लाभ दिगांबर जवादे - गडचिरोलीराज्य शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत दीड लाख रूपयापर्यंत मोफत औषधोपचार करण्याची सोय असली तरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत नोंदणी असलेले एकच रूग्णालय असल्याने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या रूग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. दोन वर्षात केवळ १५०१ रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. वाढत्या महागाईबरोबरच दवाखान्याचा खर्चही सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा झाला आहे. तर सरकारी रूग्णालयांचा दर्जा सुमार असल्याने या रूग्णालयात औषधोपचार घेण्यास नागरिक तयार होत नव्हते. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २ जुलै २०१२ पासून गडचिरोलीसह निवडक ८ जिल्ह्यात सुरू केली. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ पासून सदर योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्य शासनाने केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांचा ३३३ रूपये प्रति कुटुंब रक्कम भरून विमा काढला आहे. या विम्यांतर्गत सुमारे ९७२ प्रकारच्या आजारांवर नोंदणीकृत खासगी रूग्णालयांमध्ये दीड लाख रूपयापर्यंतच मोफत औषधोपचार करण्यात येते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र ज्या गडचिरोली जिल्ह्यापासून या योजनेची सुरूवात झाली. तो जिल्हा मात्र उपेक्षितच राहिला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत नोंदणी असलेले सुमारे ४७६ रूग्णालय आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान १० रूग्णालये आढळून येतात. गडचिरोली जिल्ह्यात मात्र गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय हे एकमेव नोंदणीकृत रूग्णालय आहे. गडचिरोली जिल्हा क्षेत्रफळाने बराच मोठा आहे. सिरोंचा, भामरागड, कोरची या तालुक्यातील रूग्णाला शेकडो किमीचे अंतर पार करून गडचिरोली येथे येणे शक्य होत नाही. परिणामी या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या रूग्णांची संख्या सुध्दा कमी असल्याची दिसून येते. दोन वर्षामध्ये केवळ १५०१ रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. इतर जिल्ह्यात मात्र रूग्णांची आकडेवारी ७ हजार ते १५ हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. याचा अर्थ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना अत्यंत कमी लाभ मिळाला असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना या योजनेविषयी फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. राजीव गांधी जीवनदायी योजनेत रूग्णालयाचा समावेश होण्यासाठी संबंधित रूग्णालयात ५० खाटांची व्यवस्था असावी. त्यामध्ये अतिदक्षाता विभाग व एमबीबीएस डॉक्टर असावे या अटी आहेत. या अटी अंतर्गत गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय हे एकमेव रूग्णालय आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक, आर्थिक परिस्थितीचा विचार करून गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अट शिथील करावी, अशी मागणी होत आहे. जेणे करून आरमोरी, अहेरी, कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयांची या योजनेंतर्गत नोंदणी होऊ शकेल. या तीन रूग्णालयात जीवनदायी योजनेंतर्गतचा लाभ मिळाल्यास लाभार्थ्यांची संख्या आपोआप वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.