शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

जिल्ह्यात साथ रोगांचे थैमान

By admin | Updated: October 30, 2014 22:52 IST

अहेरी, कोरची, गडचिरोली तालुक्यात साथ रोगांनी थैमान घातल्याने शेकडो नागरिक तापाने फणफणत आहेत. मात्र याकडे आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याने रूग्णांची आकडेवारी

गडचिरोली : अहेरी, कोरची, गडचिरोली तालुक्यात साथ रोगांनी थैमान घातल्याने शेकडो नागरिक तापाने फणफणत आहेत. मात्र याकडे आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याने रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गावाला लागूनच धानाच्या बांध्या राहतात. बांध्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने डासांची पैदास वाढते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात डास आढळून येतात. त्याचबरोबर गावाकाठी असलेल्या जंगलामुळेही डासांची पैदास वाढते. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखणे हे प्रशासन व गावकऱ्यांसमोरील मोठे आवाहन बनले आहे. डासांमुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आदी रोगांची साथ पसरते. सिरोंचा तालुक्यातील कंबलपेठा परिसरात मलेरियाची साथ पसरली आहे. कंबलपेठा येथील १० वर्षीय रमनय्या करके गावडे या ब्रेन मलेरिया रोगाने मुलाचा मृत्यू झाला. त्याला मागील काही दिवसांपासून ताप येत होता. सोमवारी त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला जिमलगट्टा येथील रूग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोरची तालुक्यातही मलेरियाची साथ पसरली आहे. कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात मलेरियाचे दहा रूग्ण भरती झाले आहेत. तसेच इतर आजारांचे रूग्णसुद्धा आहेत. जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर व पंचायत समिती सभापती अवधराम बागमुळ यांनी २८ आॅक्टोबर रोजी कोरची येथील ग्रामीण रूग्णालयास भेट दिली असता, बहुतांश कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. मागील दहा दिवसांपासून रूग्णांना भोजन मिळत नसल्याची माहिती रूग्णांनी दिली. दवाखान्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने रूग्णांना दवाखान्याबाहेर जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागते. रूग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माण अधिकारी, वॉर्डबॉय, परिचारीकांची पदे रिक्त आहेत. यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा मिळणे कठीण झाली आहे. ग्रामीण रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक प्रभारी आहेत. त्यांच्याकडे इतरही कामाचा बोजा आहे. त्यामुळे ते रूग्णांच्या सेवेसाठी पूर्णवेळ देऊ शकत नाही. येथील कर्मचारी नियमितपणे हजर राहत नसल्याने अशा कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. कोरची ग्रामीण रूग्णालयाप्रमाणेच जिल्ह्यातील इतरही रूग्णालयांची हिच परिस्थिती असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)