शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

‘त्या’ जंगली हत्तींच्या वास्तव्यासाठी जिल्ह्यात पोषक वातावरणाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. चपराळा येथे हत्तींच्या नैसर्गिक निवासाबाबत जागा तयार करावयाची असल्यास काय-काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचे पॉवर पॉईंट सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एस. आर. कुमारस्वामी यांनी केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : जिल्ह्यात छत्तीसगडमार्गे दाखल झालेल्या २१ जंगली हत्तींच्या कळपासाठी चपराळा अभयारण्यात पुरेसे खाद्य मिळणार नाही. त्यांच्यासाठी भामरागड किंवा सिरोंचा परिसरातील जंगल अधिक पोषक राहू शकते. असे असले तरी चपराळातही गवत, पाणी अशा सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी यावर चर्चा केली. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात चपराळा येथील वन विभागाच्या विश्रामगृहावर आढावा घेतला. जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. चपराळा येथे हत्तींच्या नैसर्गिक निवासाबाबत जागा तयार करावयाची असल्यास काय-काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचे पॉवर पॉईंट सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एस. आर. कुमारस्वामी यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एएसपी अनुज तारे, आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, उपविभागीय वन अधिकारी राहुल शितोलिया, चौडमपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश लांडगे, क्षेत्र सहायक एम. पोतगंटावार व वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी वन विभागाने हत्तींच्या वास्तव्याचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी  दिले. यावेळी शिवसेनेचे किशाेर पाेतदार व सुरेंद्रसिंह चंदेल उपस्थित हाेते.

हत्तींची दिवसा भटकंती, रात्री आराम-    वनसंरक्षक किशोर मानकर यांनी यावेळी हत्तींबाबतची सद्यस्थिती सांगितली. सध्या तो कळप धानोरा तालुक्यातील जंगलात सुरक्षित आहे. या कळपात पिलूही असल्यामुळे कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास हे हत्ती आक्रमक होतात, असे सांगितले. हे सर्व हत्ती सकाळी ७.३० वाजता जंगलात निघून जाऊन सायंकाळी ६ च्या सुमारास परत येत आहेत. त्यांना जंगलातील तलावामध्ये पाण्याची सोयही असल्यामुळे त्याठिकाणी त्यांचा मुक्काम आहे. परंतु, उन्हाळ्यात त्याठिकाणी हत्तींना पाणी मिळणार नसल्यामुळे ते खालच्या भागात भामरागडकडे जाऊ शकतात, अशी माहिती यावेळी पालकमंत्र्यांना देण्यात आली.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग