शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

‘त्या’ जंगली हत्तींच्या वास्तव्यासाठी जिल्ह्यात पोषक वातावरणाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. चपराळा येथे हत्तींच्या नैसर्गिक निवासाबाबत जागा तयार करावयाची असल्यास काय-काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचे पॉवर पॉईंट सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एस. आर. कुमारस्वामी यांनी केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : जिल्ह्यात छत्तीसगडमार्गे दाखल झालेल्या २१ जंगली हत्तींच्या कळपासाठी चपराळा अभयारण्यात पुरेसे खाद्य मिळणार नाही. त्यांच्यासाठी भामरागड किंवा सिरोंचा परिसरातील जंगल अधिक पोषक राहू शकते. असे असले तरी चपराळातही गवत, पाणी अशा सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी यावर चर्चा केली. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात चपराळा येथील वन विभागाच्या विश्रामगृहावर आढावा घेतला. जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. चपराळा येथे हत्तींच्या नैसर्गिक निवासाबाबत जागा तयार करावयाची असल्यास काय-काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचे पॉवर पॉईंट सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एस. आर. कुमारस्वामी यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एएसपी अनुज तारे, आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, उपविभागीय वन अधिकारी राहुल शितोलिया, चौडमपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश लांडगे, क्षेत्र सहायक एम. पोतगंटावार व वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी वन विभागाने हत्तींच्या वास्तव्याचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी  दिले. यावेळी शिवसेनेचे किशाेर पाेतदार व सुरेंद्रसिंह चंदेल उपस्थित हाेते.

हत्तींची दिवसा भटकंती, रात्री आराम-    वनसंरक्षक किशोर मानकर यांनी यावेळी हत्तींबाबतची सद्यस्थिती सांगितली. सध्या तो कळप धानोरा तालुक्यातील जंगलात सुरक्षित आहे. या कळपात पिलूही असल्यामुळे कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास हे हत्ती आक्रमक होतात, असे सांगितले. हे सर्व हत्ती सकाळी ७.३० वाजता जंगलात निघून जाऊन सायंकाळी ६ च्या सुमारास परत येत आहेत. त्यांना जंगलातील तलावामध्ये पाण्याची सोयही असल्यामुळे त्याठिकाणी त्यांचा मुक्काम आहे. परंतु, उन्हाळ्यात त्याठिकाणी हत्तींना पाणी मिळणार नसल्यामुळे ते खालच्या भागात भामरागडकडे जाऊ शकतात, अशी माहिती यावेळी पालकमंत्र्यांना देण्यात आली.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग