शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

दुष्काळग्रस्तमधून जिल्हा वगळणे लोकप्रतिनिधींचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:01 IST

पाण्याअभावी जिल्हाभरातील पिके करपली आहेत. पाण्याची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत एका मीटरने खाली गेली आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. याला येथील लोकप्रतिनिधी व भाजपाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप आ.विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचा आरोप : पाणीपातळी एक मीटरने खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पाण्याअभावी जिल्हाभरातील पिके करपली आहेत. पाण्याची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत एका मीटरने खाली गेली आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. याला येथील लोकप्रतिनिधी व भाजपाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप आ.विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. पोळ्यानंतर पावसाने कायमची दडी मारली. त्यामुळे सिंचनाची सुविधा नसलेले धानपीक करपले. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन पिकालाही फटका बसला. जिल्हाभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एटापल्ली, भामरागड, कोरची, कुरखेडा या तालुक्यांमध्ये भयावह स्थिती असून धान लागवडीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. इतरही तालुक्यातील धानपीक करपले आहे. अशी विपरित परिस्थिती असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्वे केला जातो. त्यावेळी त्यांना योग्य सर्वे करण्याचे निर्देश देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. यावरून ते जनतेप्रती गंभीर नसल्याचे दिसून येते. त्यांची बांधिलकी जनतेशी नसून मतांशी आहे. राज्यभरात १५४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका नाही. अतिशय गंभीर बाब आहे.लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर, नागभिड, सिंदेवाही हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. हा भाग सुद्धा धानाचा पट्टा आहे. जेव्हा ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाली तर गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मागील वर्षी मावा, तुडतुडा रोगाने हजारो हेक्टरवरील धानपीक उद्ध्वस्त झाले. या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत मिळाली नाही. ज्यांना मदत मिळाली, ती अतिशय कमी आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, डॉ.नितीन कोडवते, कुणाल पेंदोरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार