शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तमधून जिल्हा वगळणे लोकप्रतिनिधींचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:01 IST

पाण्याअभावी जिल्हाभरातील पिके करपली आहेत. पाण्याची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत एका मीटरने खाली गेली आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. याला येथील लोकप्रतिनिधी व भाजपाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप आ.विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचा आरोप : पाणीपातळी एक मीटरने खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पाण्याअभावी जिल्हाभरातील पिके करपली आहेत. पाण्याची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत एका मीटरने खाली गेली आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. याला येथील लोकप्रतिनिधी व भाजपाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप आ.विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. पोळ्यानंतर पावसाने कायमची दडी मारली. त्यामुळे सिंचनाची सुविधा नसलेले धानपीक करपले. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन पिकालाही फटका बसला. जिल्हाभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एटापल्ली, भामरागड, कोरची, कुरखेडा या तालुक्यांमध्ये भयावह स्थिती असून धान लागवडीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. इतरही तालुक्यातील धानपीक करपले आहे. अशी विपरित परिस्थिती असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्वे केला जातो. त्यावेळी त्यांना योग्य सर्वे करण्याचे निर्देश देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. यावरून ते जनतेप्रती गंभीर नसल्याचे दिसून येते. त्यांची बांधिलकी जनतेशी नसून मतांशी आहे. राज्यभरात १५४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका नाही. अतिशय गंभीर बाब आहे.लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर, नागभिड, सिंदेवाही हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. हा भाग सुद्धा धानाचा पट्टा आहे. जेव्हा ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाली तर गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मागील वर्षी मावा, तुडतुडा रोगाने हजारो हेक्टरवरील धानपीक उद्ध्वस्त झाले. या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत मिळाली नाही. ज्यांना मदत मिळाली, ती अतिशय कमी आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, डॉ.नितीन कोडवते, कुणाल पेंदोरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार