शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

‘त्या’ बहिष्कृत कुटुंबांना अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने गावप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:38 IST

ग्रामीण भागात सामाजिक सलोख्याचे वातावरण दिसत असले तरी एटापल्ली तालुक्यातील मेडरी गावाजवळच्या उईकानटोल्यात...

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ग्रामीण भागात सामाजिक सलोख्याचे वातावरण दिसत असले तरी एटापल्ली तालुक्यातील मेडरी गावाजवळच्या उईकानटोल्यात पाच कुटुंबांवर गावकऱ्यांनी सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना गावाबाहेर काढले होते. आठवडाभर भटकंती केल्यानंतर या कुटुंबाने पोलिसांकडे दाद मागितली. अखेर कसनसूर पोलिसांच्या मध्यस्थीने या कुटुंबांना गावात पुन्हा प्रवेश देण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, एटापल्लीपासून ८० किलोमीटर अंतरावर मेडरी हे गाव आहे. या गावात केमुकुंद तिरंगा, गोविंद पांडू कोकडे, गुरूदास तिरंगा आणि मारवाडी तिरंगा यांचे कुटुंबीय राहतात. हे लोक पूजा-अर्चना करीत असल्यामुळे त्यांची प्रगती होत आहे, या कारणावरून गावातील इतर लोक त्यांना त्रास देत होते. मार्च महिन्यात या चार परिवारांना गावातील नागरिकांनी विहिरीवरून आणि नळावरून पाणी भरण्यास मज्जाव केला. त्यामुळे इकडून-तिकडून पाणी आणून हे कुटूंब कसेतरे दिवस काढत होते.दरम्यान १० जुलै रोजी गावकऱ्यांनी मिळून पीडित कुटूंबांच्या घरांना कुलूप ठोकून त्यांना गावातून हाकलून लावले. त्यामुळे हे कुटूंब आठवडाभर छत्तीसगडमधील कुरेनार गावात आश्रयाला गेले. या प्रकाराची माहिती मेडरीच्या पोलीस पाटलांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या पीडित कुटूंबांशी संपर्क करून १६ जुलै रोजी कसनपूर उप पोलीस ठाण्यात बोलविले. सोबतच गावकऱ्यांना घेऊन ते ठाण्यात पोहोचले. ठाण्याचे प्रभारी अधिकारी व्ही.व्ही. वाडकर यांच्या मार्गदर्शनात पी.के. मगर व एस.डी. पाटील यांनी मिळून लोकांना समजावले. त्यांच्या मनात त्या कुटुंबीयांबद्दल असलेले गैरसमज दूर केले. जवळपास दोन तासांच्या या बैठकीनंतर पीडित कुटुंबीयांना मेडरी गावात पाठविण्यात आले.