शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

‘त्या’ बहिष्कृत कुटुंबांना अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने गावप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:38 IST

ग्रामीण भागात सामाजिक सलोख्याचे वातावरण दिसत असले तरी एटापल्ली तालुक्यातील मेडरी गावाजवळच्या उईकानटोल्यात...

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ग्रामीण भागात सामाजिक सलोख्याचे वातावरण दिसत असले तरी एटापल्ली तालुक्यातील मेडरी गावाजवळच्या उईकानटोल्यात पाच कुटुंबांवर गावकऱ्यांनी सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना गावाबाहेर काढले होते. आठवडाभर भटकंती केल्यानंतर या कुटुंबाने पोलिसांकडे दाद मागितली. अखेर कसनसूर पोलिसांच्या मध्यस्थीने या कुटुंबांना गावात पुन्हा प्रवेश देण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, एटापल्लीपासून ८० किलोमीटर अंतरावर मेडरी हे गाव आहे. या गावात केमुकुंद तिरंगा, गोविंद पांडू कोकडे, गुरूदास तिरंगा आणि मारवाडी तिरंगा यांचे कुटुंबीय राहतात. हे लोक पूजा-अर्चना करीत असल्यामुळे त्यांची प्रगती होत आहे, या कारणावरून गावातील इतर लोक त्यांना त्रास देत होते. मार्च महिन्यात या चार परिवारांना गावातील नागरिकांनी विहिरीवरून आणि नळावरून पाणी भरण्यास मज्जाव केला. त्यामुळे इकडून-तिकडून पाणी आणून हे कुटूंब कसेतरे दिवस काढत होते.दरम्यान १० जुलै रोजी गावकऱ्यांनी मिळून पीडित कुटूंबांच्या घरांना कुलूप ठोकून त्यांना गावातून हाकलून लावले. त्यामुळे हे कुटूंब आठवडाभर छत्तीसगडमधील कुरेनार गावात आश्रयाला गेले. या प्रकाराची माहिती मेडरीच्या पोलीस पाटलांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या पीडित कुटूंबांशी संपर्क करून १६ जुलै रोजी कसनपूर उप पोलीस ठाण्यात बोलविले. सोबतच गावकऱ्यांना घेऊन ते ठाण्यात पोहोचले. ठाण्याचे प्रभारी अधिकारी व्ही.व्ही. वाडकर यांच्या मार्गदर्शनात पी.के. मगर व एस.डी. पाटील यांनी मिळून लोकांना समजावले. त्यांच्या मनात त्या कुटुंबीयांबद्दल असलेले गैरसमज दूर केले. जवळपास दोन तासांच्या या बैठकीनंतर पीडित कुटुंबीयांना मेडरी गावात पाठविण्यात आले.