शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांशी थेट संवाद हा दादासाहेबांचा स्थायिभाव

By admin | Updated: July 26, 2015 02:42 IST

२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. नवा जिल्हा असला तरी रा. सु. उपाख्य दादासाहेब गवई ..

पाच वेळा गडचिरोलीला दिली भेट : कार्यकर्त्यांमध्ये जागवायचे नवी ऊर्जागडचिरोली : २६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. नवा जिल्हा असला तरी रा. सु. उपाख्य दादासाहेब गवई यांचा गडचिरोलीशी नेहमीच स्रेहसंबंध राहिला. या मागास जिल्ह्याच्या विकासाची कायम तळमळ होती. त्यामुळे या भागातील शेकडो कार्यकर्त्यांशी नेहमीच संवाद साधण्यासाठी ते उत्सुक राहायचे.या भागातला कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता दादासाहेबांना भेटला तर ते त्याची आस्थेवाईक चौकशी करीत. जिल्हा निर्मितीनंतर ते १९८४ ला पहिल्यांदा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने आयोजित जाहीर सभेसाठी गडचिरोलीला आले होते. स्थानिक इंदिरा गांधी चौकात दादासाहेबांची ही जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना अत्यंत आवेशपूर्ण मार्गदर्शन केले, अशी माहिती रिपाइं (गवई गट) चे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यानंतर १९८९ मध्ये गडचिरोलीच्या श्री मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्यासाठी दादासाहेब पुन्हा आलेत. त्यावेळीही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जातीयवादी शक्तीचा विरोध करा, असा सरळ नारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर १९९६ ला रात्रीच्या वेळी त्यांनी इंदिरा गांधी चौकात कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले. २००२ मध्ये नगर परिषदेची आचारसंहिता लागलेली होती. परंतु दादासाहेबांचा दौरा हा पूर्वनिश्चित असल्याने त्यांचा कार्यक्रम गडचिरोलीत घ्यायचा होता. मग यावर तोडगा म्हणून हा कार्यक्रम तत्कालीन खा. नरेश पुगलिया यांनी नवेगाव परिसरात घेण्याचे सूचविले. या कार्यक्रमालाही दादासाहेब उपस्थित झाले व त्यांनी काँग्रेस, रिपाईच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे निश्चित झाले. या पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन दादासाहेबांच्या हस्ते पार पाडण्यात आले. विशेष बाब म्हणजे या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला दादासाहेब आवर्जुन उपस्थित होते. यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत माधवराव सिंधिया हे ही आले होते. या कार्यक्रमाला त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाशी असलेली दादासाहेबांची नाळ कधीही गडचिरोली जिल्ह्यात तुटली नाही. वेळोवेळी त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मला सर्व अधिकार देऊन या भागात रिपाईची चळवळ मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले, असे अ‍ॅड. मेश्राम यांनी सांगितले. राज्यपाल असतानाही दादासाहेबांचा गडचिरोली जिल्ह्यात दौरा झाला. दादासाहेबांचा कायम जिव्हाळा या भागाशी राहिलेला आहे. देशातील मागास भागासोबतच गडचिरोली परिसरातील भूमीहिन लोकांना पट्टे वितरित झाले पाहिजे, यासाठी त्यांनी १९६४ पासून आक्रमक भूमिका घेतली. रिपाइंच्या माध्यमातून सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठीही ते कधी डगमगले नाही. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाही त्यांनी त्याच भूमिकेतून मार्गदर्शन केले. दादासाहेबांच्या या स्रेहबंधामुळे आपल्याला १९८२ पासून गडचिरोली जिल्हा रिपाइंचे अध्यक्षपद मिळाले, ते आजगायत कायम आहे. दादासाहेबांच्या निघून जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्याप्रती जिव्हाळा ठेवणारे एक मोठे नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना अ‍ॅड. मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.नागपूर येथील दीक्षा भूमीच्या विकासातही दादासाहेबांचा मोलाचा वाटा राहिला आहे. दरवर्षी विजयादशमीला त्यांचे मार्गदर्शन शेकडो भीमसैनिक व तरूणांसाठी प्रेरणादायी ठरणारे होते. आता या मार्गदर्शनाला कायमचा विराम दादासाहेबांच्या जाण्याने मिळणार आहे. आता पुन्हा त्यांचे भाषण ऐकता येणार नाही. (जिल्हा प्रतिनिधी)