शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट पूल बांधकामामुळे अडचणी वाढल्या

By admin | Updated: August 8, 2015 01:34 IST

चामोर्शी तालुक्यातील तळोधीचे बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर ...

प्रशासनाचे दुर्लक्ष : कडुली नाल्यावरील पूल धोकादायकतळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील तळोधीचे बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर कंत्राटदाराने केवळ ५० मीटरच्या अंतरावर सिमेंट पायल्या टाकून कच्चा पूल उभारला आहे. सदर पूल अर्धवट असल्याने या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी अर्धवट पूलामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तळोधी बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर पूल नसल्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना प्रचंड अडचण जाणवत होती. या ठिकाणी पुलाची मागणी सातत्याने करण्यात आल्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी पुलाचे बांधकाम मंजूर केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम एका खासगी कंत्राटदाराकडे सोपविले. उन्हाळ्यात संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणी केवळ ५० मीटर अंतरावर सिमेंटच्या सहा पायल्या टाकून पुलाचे अर्धवट काम केले. या ठिकाणी आणखी दीडशे मीटर अंतरापर्यंत पूल होणे आवश्यक आहे. तेव्हाच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते. संबंधित कंत्राटदाराने पुलाच्या अग्रभागी गोटा पिचिंग न केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीघाटावरील स्मशानभूमीत प्रेत दफनविधीसाठी याच मार्गाचा उपयोग होतो. मात्र अर्धवट पुलामुळे व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात स्मशानभूमीत जाऊन दफनविधी करण्यास अडचण येत आहे. प्रशासनाने या ठिकाणी केवळ ५० मीटरचाच रस्ता कसा काय मंजूर केला, असा प्रश्न या भागातील नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. नाल्याच्या पलीकडे हजारो एकर शेती असून पुलाअभावी शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्याऐवजी उलअ वाढला आहे. (वार्ताहर)दोन पुलाचे काम प्रलंबितचतळोधी (मो.) गावाकडून दागोबा देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर एक नाला आहे. तसेच वन विभागाच्या नाक्याजवळून वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर एक नाला आहे. या दोन्ही नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून मागणीही सातत्याने होत आहे. मात्र प्रशासनाने या दोन्ही नाल्यावर पुलाचे बांधकाम मंजूर केले नाही. त्यामुळे या मार्गावरील रहदारी प्रभावीत होत आहे. पावसाळ्यात या भागातील शेतकरी जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करतात. प्रशासनाने या दोन्ही नाल्यावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.