शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट पूल बांधकामामुळे अडचणी वाढल्या

By admin | Updated: August 8, 2015 01:34 IST

चामोर्शी तालुक्यातील तळोधीचे बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर ...

प्रशासनाचे दुर्लक्ष : कडुली नाल्यावरील पूल धोकादायकतळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील तळोधीचे बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर कंत्राटदाराने केवळ ५० मीटरच्या अंतरावर सिमेंट पायल्या टाकून कच्चा पूल उभारला आहे. सदर पूल अर्धवट असल्याने या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी अर्धवट पूलामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तळोधी बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर पूल नसल्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना प्रचंड अडचण जाणवत होती. या ठिकाणी पुलाची मागणी सातत्याने करण्यात आल्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी पुलाचे बांधकाम मंजूर केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम एका खासगी कंत्राटदाराकडे सोपविले. उन्हाळ्यात संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणी केवळ ५० मीटर अंतरावर सिमेंटच्या सहा पायल्या टाकून पुलाचे अर्धवट काम केले. या ठिकाणी आणखी दीडशे मीटर अंतरापर्यंत पूल होणे आवश्यक आहे. तेव्हाच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते. संबंधित कंत्राटदाराने पुलाच्या अग्रभागी गोटा पिचिंग न केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीघाटावरील स्मशानभूमीत प्रेत दफनविधीसाठी याच मार्गाचा उपयोग होतो. मात्र अर्धवट पुलामुळे व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात स्मशानभूमीत जाऊन दफनविधी करण्यास अडचण येत आहे. प्रशासनाने या ठिकाणी केवळ ५० मीटरचाच रस्ता कसा काय मंजूर केला, असा प्रश्न या भागातील नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. नाल्याच्या पलीकडे हजारो एकर शेती असून पुलाअभावी शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्याऐवजी उलअ वाढला आहे. (वार्ताहर)दोन पुलाचे काम प्रलंबितचतळोधी (मो.) गावाकडून दागोबा देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर एक नाला आहे. तसेच वन विभागाच्या नाक्याजवळून वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर एक नाला आहे. या दोन्ही नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून मागणीही सातत्याने होत आहे. मात्र प्रशासनाने या दोन्ही नाल्यावर पुलाचे बांधकाम मंजूर केले नाही. त्यामुळे या मार्गावरील रहदारी प्रभावीत होत आहे. पावसाळ्यात या भागातील शेतकरी जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करतात. प्रशासनाने या दोन्ही नाल्यावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.