शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

अर्धवट पूल बांधकामामुळे अडचणी वाढल्या

By admin | Updated: August 8, 2015 01:34 IST

चामोर्शी तालुक्यातील तळोधीचे बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर ...

प्रशासनाचे दुर्लक्ष : कडुली नाल्यावरील पूल धोकादायकतळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील तळोधीचे बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर कंत्राटदाराने केवळ ५० मीटरच्या अंतरावर सिमेंट पायल्या टाकून कच्चा पूल उभारला आहे. सदर पूल अर्धवट असल्याने या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी अर्धवट पूलामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तळोधी बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर पूल नसल्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना प्रचंड अडचण जाणवत होती. या ठिकाणी पुलाची मागणी सातत्याने करण्यात आल्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी पुलाचे बांधकाम मंजूर केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम एका खासगी कंत्राटदाराकडे सोपविले. उन्हाळ्यात संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणी केवळ ५० मीटर अंतरावर सिमेंटच्या सहा पायल्या टाकून पुलाचे अर्धवट काम केले. या ठिकाणी आणखी दीडशे मीटर अंतरापर्यंत पूल होणे आवश्यक आहे. तेव्हाच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते. संबंधित कंत्राटदाराने पुलाच्या अग्रभागी गोटा पिचिंग न केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीघाटावरील स्मशानभूमीत प्रेत दफनविधीसाठी याच मार्गाचा उपयोग होतो. मात्र अर्धवट पुलामुळे व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात स्मशानभूमीत जाऊन दफनविधी करण्यास अडचण येत आहे. प्रशासनाने या ठिकाणी केवळ ५० मीटरचाच रस्ता कसा काय मंजूर केला, असा प्रश्न या भागातील नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. नाल्याच्या पलीकडे हजारो एकर शेती असून पुलाअभावी शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्याऐवजी उलअ वाढला आहे. (वार्ताहर)दोन पुलाचे काम प्रलंबितचतळोधी (मो.) गावाकडून दागोबा देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर एक नाला आहे. तसेच वन विभागाच्या नाक्याजवळून वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर एक नाला आहे. या दोन्ही नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून मागणीही सातत्याने होत आहे. मात्र प्रशासनाने या दोन्ही नाल्यावर पुलाचे बांधकाम मंजूर केले नाही. त्यामुळे या मार्गावरील रहदारी प्रभावीत होत आहे. पावसाळ्यात या भागातील शेतकरी जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करतात. प्रशासनाने या दोन्ही नाल्यावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.