शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात पंचनाम्यांसाठी अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:23 IST

जनजागृतीसाठी आरोग्य विभागाची चमू गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरण्यासाठी पाठविण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा तडाखा बसत असल्याने या चमूला गावांमध्ये फिरणेही कठीण होत आहे.

ठळक मुद्देमहसूल व आरोग्य विभागाच्या चमुपुढे गावात पोहोचण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यात यावर्षी १९९४ नंतरचा सर्वाधिक पाऊस झाल्याने चांगलाच हाह:कार उडाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात २५०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद घेण्यात आली. आठवडाभर अक्षरश: पावसात राहिल्याने निर्माण झालेल्या आरोग्यविषयीच्या समस्या दूर करण्यासाठी आणि नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी आरोग्य व महसूल विभागाची चमू तिथे पोहोचली आहे. परंतू दुर्गम भागातील नाले अजूनही तुडूंब भरून असल्यामुळे त्या गावांमध्ये जाणेही कठीण होत आहे.गेल्या ३ ते १० सप्टेंबरच्या सकाळपर्यंत, म्हणजे पूर्ण आठवडाभर पूर परिस्थितीमुळे भामरागडसह अनेक ;गावे संपर्काबाहेर होती. ६ सप्टेंबरपासून पुराचे पाणी गावात शिरल्याने ७० टक्के भामरागड पुराच्या पाण्यात होते. दुर्गम भागातील अनेक गावांचा तर अजूनही संपर्क तुटलेलाच आहे. मात्र या परिस्थितीत जीवित आणि वित्तहाणी झालेल्यांना तातडीने मदत देण्यासाठी पंचनामे करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाची चमू या तालुक्यात पाठविली. शिवाय जलजन्य आजारांची साथ उद्भवू नये म्हणून आरोग्य तपासणी, उपचार व जनजागृतीसाठी आरोग्य विभागाची चमू या तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरण्यासाठी पाठविण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा तडाखा बसत असल्याने या चमूला गावांमध्ये फिरणेही कठीण होत आहे. बहुतांश गावांना पोहोचण्यासाठी जंगलांमधून वाहात येणारे छोटे-छोटे नाले पार करावे लागतात. हे सर्व नाले तुडूंब भरून असल्यामुळे गावात पोहोचणेच अशक्य होत आहे.तूर्त तरी कोणत्याही गावात साथरोगाचा उद्रेक झालेला नसला तरी पुढील काही दिवस मोठी दक्षता घ्यावी लागणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूर