शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात पंचनाम्यांसाठी अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:23 IST

जनजागृतीसाठी आरोग्य विभागाची चमू गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरण्यासाठी पाठविण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा तडाखा बसत असल्याने या चमूला गावांमध्ये फिरणेही कठीण होत आहे.

ठळक मुद्देमहसूल व आरोग्य विभागाच्या चमुपुढे गावात पोहोचण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यात यावर्षी १९९४ नंतरचा सर्वाधिक पाऊस झाल्याने चांगलाच हाह:कार उडाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात २५०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद घेण्यात आली. आठवडाभर अक्षरश: पावसात राहिल्याने निर्माण झालेल्या आरोग्यविषयीच्या समस्या दूर करण्यासाठी आणि नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी आरोग्य व महसूल विभागाची चमू तिथे पोहोचली आहे. परंतू दुर्गम भागातील नाले अजूनही तुडूंब भरून असल्यामुळे त्या गावांमध्ये जाणेही कठीण होत आहे.गेल्या ३ ते १० सप्टेंबरच्या सकाळपर्यंत, म्हणजे पूर्ण आठवडाभर पूर परिस्थितीमुळे भामरागडसह अनेक ;गावे संपर्काबाहेर होती. ६ सप्टेंबरपासून पुराचे पाणी गावात शिरल्याने ७० टक्के भामरागड पुराच्या पाण्यात होते. दुर्गम भागातील अनेक गावांचा तर अजूनही संपर्क तुटलेलाच आहे. मात्र या परिस्थितीत जीवित आणि वित्तहाणी झालेल्यांना तातडीने मदत देण्यासाठी पंचनामे करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाची चमू या तालुक्यात पाठविली. शिवाय जलजन्य आजारांची साथ उद्भवू नये म्हणून आरोग्य तपासणी, उपचार व जनजागृतीसाठी आरोग्य विभागाची चमू या तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरण्यासाठी पाठविण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा तडाखा बसत असल्याने या चमूला गावांमध्ये फिरणेही कठीण होत आहे. बहुतांश गावांना पोहोचण्यासाठी जंगलांमधून वाहात येणारे छोटे-छोटे नाले पार करावे लागतात. हे सर्व नाले तुडूंब भरून असल्यामुळे गावात पोहोचणेच अशक्य होत आहे.तूर्त तरी कोणत्याही गावात साथरोगाचा उद्रेक झालेला नसला तरी पुढील काही दिवस मोठी दक्षता घ्यावी लागणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूर