शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात पंचनाम्यांसाठी अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:23 IST

जनजागृतीसाठी आरोग्य विभागाची चमू गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरण्यासाठी पाठविण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा तडाखा बसत असल्याने या चमूला गावांमध्ये फिरणेही कठीण होत आहे.

ठळक मुद्देमहसूल व आरोग्य विभागाच्या चमुपुढे गावात पोहोचण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यात यावर्षी १९९४ नंतरचा सर्वाधिक पाऊस झाल्याने चांगलाच हाह:कार उडाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात २५०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद घेण्यात आली. आठवडाभर अक्षरश: पावसात राहिल्याने निर्माण झालेल्या आरोग्यविषयीच्या समस्या दूर करण्यासाठी आणि नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी आरोग्य व महसूल विभागाची चमू तिथे पोहोचली आहे. परंतू दुर्गम भागातील नाले अजूनही तुडूंब भरून असल्यामुळे त्या गावांमध्ये जाणेही कठीण होत आहे.गेल्या ३ ते १० सप्टेंबरच्या सकाळपर्यंत, म्हणजे पूर्ण आठवडाभर पूर परिस्थितीमुळे भामरागडसह अनेक ;गावे संपर्काबाहेर होती. ६ सप्टेंबरपासून पुराचे पाणी गावात शिरल्याने ७० टक्के भामरागड पुराच्या पाण्यात होते. दुर्गम भागातील अनेक गावांचा तर अजूनही संपर्क तुटलेलाच आहे. मात्र या परिस्थितीत जीवित आणि वित्तहाणी झालेल्यांना तातडीने मदत देण्यासाठी पंचनामे करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाची चमू या तालुक्यात पाठविली. शिवाय जलजन्य आजारांची साथ उद्भवू नये म्हणून आरोग्य तपासणी, उपचार व जनजागृतीसाठी आरोग्य विभागाची चमू या तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरण्यासाठी पाठविण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा तडाखा बसत असल्याने या चमूला गावांमध्ये फिरणेही कठीण होत आहे. बहुतांश गावांना पोहोचण्यासाठी जंगलांमधून वाहात येणारे छोटे-छोटे नाले पार करावे लागतात. हे सर्व नाले तुडूंब भरून असल्यामुळे गावात पोहोचणेच अशक्य होत आहे.तूर्त तरी कोणत्याही गावात साथरोगाचा उद्रेक झालेला नसला तरी पुढील काही दिवस मोठी दक्षता घ्यावी लागणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूर