शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

बाजारात दाखल झाल्या वेगवेगळ्या रानभाज्या

By admin | Updated: July 9, 2016 01:32 IST

तृषार्त धरेला शांतवत पावसाळा आला की, धरणीला नवा तजेला मिळतो. तशाच रानात नवनव्या भाज्यांचीही उगवण होते.

खवय्यांसाठी अच्छे दिन : गावातून शहरात विक्रीसाठी घेऊन येतात नागरिकगडचिरोली : तृषार्त धरेला शांतवत पावसाळा आला की, धरणीला नवा तजेला मिळतो. तशाच रानात नवनव्या भाज्यांचीही उगवण होते. आता अशा अनेक भाज्या बाजारात दाखल होत असून या भाज्यांची ओळख असणारे आवडीने खरेदी करीत आहेत. भाजीविक्रेत्यांनाही या माध्यमातून रोजगार मिळाला आहे.पावसाळ्यात रानातून जाताना मोगऱ्याच्या सुंगधासारखाच एक आगळा सुगंध दरवळत असतो. या सुगंधाचा मागोवा घेतल्यास रानात प्राजक्ताच्या आकाराची छोटी पांढरी फुले दिसतात. या फुलांचा सुगंध धुंद करणाराच असतो. ही सुगंधी फुले कुड्याची फुले म्हणून ग्रामीण भागात ओळखतात. अतिशय सुगंधी असणारी ही फुले तेवढीच स्वादिष्टही असतात. मात्र, त्याची भाजी विशिष्ट पद्धतीने करावी लागते. ही फुले उकडून भरपूर कांदे घालून बऱ्यापैकी तेलात केलेली भाजी अगदी अंडाभूर्जीसारखीच लागते. अनेकजण या शाकाहारी भाजीला अंडाभूर्जी समजून फसतात. त्यानंतर पाऊस वाढला की, अळींबीच्या जुड्या बाजारात दिसतात. मोठ मोठ्या आलीशान हॉटेलमध्ये सर्व्ह होणारे मशरूम म्हणजे या अळींबीच आहेत. जंगलात नैसर्गिकरित्या उगवलेल्या अळींबी गोळा करण्यासाठी अनेकजण रानाची वाट धरतात. नजिकच्या शहरात अळींबी विकायला आली, की ग्राहकांची झुंबड उडते. इकडच्या ग्रामीण भागात या भाजीला सात्या किंवा डुंबर सात्या म्हणतात. याशिवाय शेरेडेरे, कडूभाजी, धान भाजी, लेंगडा भाजी (पांढऱ्या मुसळीच्या पानांची भाजी), फेट्रा अशा अनेक भाज्या पावसाळ्यात खाण्यात येतात. महानगरात दुर्मिळ असणाऱ्या या भाज्यांची चव घ्यायची असेल, तर गडचिरोलीसारख्या निसर्गसंपन्न जिल्ह्याशिवाय पर्याय नाही.