शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

तुमच्या पिंडाला कावळा शिवला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

कावळा म्हटले की, कर्कश आवाज, कपटी, चतुर, स्वार्थी, असे विविध गुण- अवगुण व कौशल्य असलेला पक्षी लक्षात येतो; परंतु पर्यावरणात कावळा तितकाच महत्त्वाचा. मेलेल्या लहान प्राण्यांचे मांस खाणे, शेतातील कीटक खाणे, ही त्याची कामे; परंतु तो पितृमोक्ष अमावास्येलाच का आठवतो? पूर्वजांच्या पिंडाला शिवण्या(स्पर्श)साठी, नाहीतर घरावर ओरडत असला तर कुणीतरी पाहुणे येणार, हे सांगण्यासाठी. 

गोपाल लाजूरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘चिमणी चिव नाही अन् कावळा काव नाही, अशा भव्य अरण्यात’ अशी विशेषणे असलेल्या कथा व गोष्टी बालपणी ऐकत असताना पटकन लक्षात यायचे की, ‘हे’ पक्षी गावालगतच असतात. जंगलात राहत नाहीत. ८ ते १० वर्षांपूर्वी हे जाणवायचेसुद्धा; परंतु आता ही स्थिती बदलली. गावोगावी, घरे व झाडांवर दिसणारे कावळे आता कुठे अदृश्य झाले? खरंच कावळे कुठे गडप झाले, हे मात्र कुणालाच कळेना झाले आहे. जागतिक कावळा दिनानिमित्त याकडे लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.

कावळा म्हटले की, कर्कश आवाज, कपटी, चतुर, स्वार्थी, असे विविध गुण- अवगुण व कौशल्य असलेला पक्षी लक्षात येतो; परंतु पर्यावरणात कावळा तितकाच महत्त्वाचा. मेलेल्या लहान प्राण्यांचे मांस खाणे, शेतातील कीटक खाणे, ही त्याची कामे; परंतु तो पितृमोक्ष अमावास्येलाच का आठवतो? पूर्वजांच्या पिंडाला शिवण्या(स्पर्श)साठी, नाहीतर घरावर ओरडत असला तर कुणीतरी पाहुणे येणार, हे सांगण्यासाठी. विशेष म्हणजे, त्याच्या ओरडण्याचा व पाहुणे घरी येण्याचा काही एक संबंध नाही; पण त्यानिमित्ताने कावळा आठवत होता, घरावर दिसत होता. मात्र, आता तो दिसेनासा झाला आहे. पिंडाला शिवण्यासाठीही कावळ्याचे दर्शन दुर्लभ झाले आहे. गेल्या पाच वर्षांत कावळ्यांची संख्या झपाट्याने घटली, जैवविविधतेच्या ऱ्हासाची ही नांदीच नाही काय? असा सवाल पक्षीप्रेमींकडून केला जात आहे. 

कावळे काय खातात? 

कावळ्याला सर्वभक्ष्यी पक्षी म्हटले जाते. त्याचे सरासरी आयुष्य १२ ते १५ वर्षे असते. त्याचे मुख्य अन्न हे शिजलेले अन्न, धान्य, अंडी, फळे, बिया, शिळे अन्न हे आहे. प्रसंगी उंदीर, चुचुंद्री, बेडूक आदींची शिकारही ते करतात. याशिवाय शेतातील किडे, अळ्या, जनावरांच्या अंगावरील गोचीड, जखमेतील किडेसुद्धा कावळे खातात.

मानवी वस्तीने संपविला कावळ्यांचा अधिवाससिमेंटच्या वाढत्या जंगलांमुळे झाडांचे प्रमाण कमी झाले. गावालगतची अन् वस्तीतली झाडे नष्ट झाली. कावळे हे वस्तीलगत वास्तव्य करीत असल्याने त्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला. आपोआपच कावळ्यांनी गाव सोडले, काही नष्ट झाले. -    महाराष्ट्रात मे ते जुलैदरम्यान त्यांचा विणीचा हंगाम असतो. कावळे ४-५ अंडी घालतात, असे पक्षीप्रेमी अजय कुकडकर यांनी सांगितले; पण आता तसे अधिवासाचे वातावरण त्यांना मिळेनासे झाले आहे.

 

टॅग्स :Natureनिसर्ग