शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

तुमच्या पिंडाला कावळा शिवला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

कावळा म्हटले की, कर्कश आवाज, कपटी, चतुर, स्वार्थी, असे विविध गुण- अवगुण व कौशल्य असलेला पक्षी लक्षात येतो; परंतु पर्यावरणात कावळा तितकाच महत्त्वाचा. मेलेल्या लहान प्राण्यांचे मांस खाणे, शेतातील कीटक खाणे, ही त्याची कामे; परंतु तो पितृमोक्ष अमावास्येलाच का आठवतो? पूर्वजांच्या पिंडाला शिवण्या(स्पर्श)साठी, नाहीतर घरावर ओरडत असला तर कुणीतरी पाहुणे येणार, हे सांगण्यासाठी. 

गोपाल लाजूरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘चिमणी चिव नाही अन् कावळा काव नाही, अशा भव्य अरण्यात’ अशी विशेषणे असलेल्या कथा व गोष्टी बालपणी ऐकत असताना पटकन लक्षात यायचे की, ‘हे’ पक्षी गावालगतच असतात. जंगलात राहत नाहीत. ८ ते १० वर्षांपूर्वी हे जाणवायचेसुद्धा; परंतु आता ही स्थिती बदलली. गावोगावी, घरे व झाडांवर दिसणारे कावळे आता कुठे अदृश्य झाले? खरंच कावळे कुठे गडप झाले, हे मात्र कुणालाच कळेना झाले आहे. जागतिक कावळा दिनानिमित्त याकडे लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.

कावळा म्हटले की, कर्कश आवाज, कपटी, चतुर, स्वार्थी, असे विविध गुण- अवगुण व कौशल्य असलेला पक्षी लक्षात येतो; परंतु पर्यावरणात कावळा तितकाच महत्त्वाचा. मेलेल्या लहान प्राण्यांचे मांस खाणे, शेतातील कीटक खाणे, ही त्याची कामे; परंतु तो पितृमोक्ष अमावास्येलाच का आठवतो? पूर्वजांच्या पिंडाला शिवण्या(स्पर्श)साठी, नाहीतर घरावर ओरडत असला तर कुणीतरी पाहुणे येणार, हे सांगण्यासाठी. विशेष म्हणजे, त्याच्या ओरडण्याचा व पाहुणे घरी येण्याचा काही एक संबंध नाही; पण त्यानिमित्ताने कावळा आठवत होता, घरावर दिसत होता. मात्र, आता तो दिसेनासा झाला आहे. पिंडाला शिवण्यासाठीही कावळ्याचे दर्शन दुर्लभ झाले आहे. गेल्या पाच वर्षांत कावळ्यांची संख्या झपाट्याने घटली, जैवविविधतेच्या ऱ्हासाची ही नांदीच नाही काय? असा सवाल पक्षीप्रेमींकडून केला जात आहे. 

कावळे काय खातात? 

कावळ्याला सर्वभक्ष्यी पक्षी म्हटले जाते. त्याचे सरासरी आयुष्य १२ ते १५ वर्षे असते. त्याचे मुख्य अन्न हे शिजलेले अन्न, धान्य, अंडी, फळे, बिया, शिळे अन्न हे आहे. प्रसंगी उंदीर, चुचुंद्री, बेडूक आदींची शिकारही ते करतात. याशिवाय शेतातील किडे, अळ्या, जनावरांच्या अंगावरील गोचीड, जखमेतील किडेसुद्धा कावळे खातात.

मानवी वस्तीने संपविला कावळ्यांचा अधिवाससिमेंटच्या वाढत्या जंगलांमुळे झाडांचे प्रमाण कमी झाले. गावालगतची अन् वस्तीतली झाडे नष्ट झाली. कावळे हे वस्तीलगत वास्तव्य करीत असल्याने त्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला. आपोआपच कावळ्यांनी गाव सोडले, काही नष्ट झाले. -    महाराष्ट्रात मे ते जुलैदरम्यान त्यांचा विणीचा हंगाम असतो. कावळे ४-५ अंडी घालतात, असे पक्षीप्रेमी अजय कुकडकर यांनी सांगितले; पण आता तसे अधिवासाचे वातावरण त्यांना मिळेनासे झाले आहे.

 

टॅग्स :Natureनिसर्ग