शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

धानपिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:18 IST

कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना धानपिकाला शेततळ्यांचे पाणी देऊन वाचविले जात आहे.

ठळक मुद्दे३६६ एकर जागेला सिंचन : आरमोरी तालुक्यात ८७ शेततळे तयार

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना धानपिकाला शेततळ्यांचे पाणी देऊन वाचविले जात आहे. आरमोरी तालुक्यातील ८७ शेतकºयांकडे शेततळे असून यामुळे जवळपास ३६६ एकराला सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.मोठे जलसिंचन प्रकल्प निर्माण करणे अशक्य असल्याने शासन वैयक्तिक जलसिंचनावर विशेष भर देत आहे. याअंतर्गतच शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर विहीर, शेततळे खोदून दिले जात आहे. धानपिकाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. त्यामुळे संबंधित शेतकºयाकडे संरक्षित जलसाठा असणे अत्यंत आवश्यक आहे. आरमोरी तालुक्यातील शेतकºयांनी विविध योजनेअंतर्गत शेततळे बांधले आहेत. सुमारे ८७ शेतकºयांनी शेततळ्यांचा लाभ घेतला आहे. यावर शासनाने ६१ लाख रूपयांचे अनुदान दिले आहे. शेततळ्यांमुळे जवळपास ३६६ एकराला जलसिंचन होणार आहे. आठ दिवसांच्या पूर्वी पावसाने उसंत घेतली होती. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानपीक करपायला लागले होते. अशा कालावधीत शेतकºयांनी शेततळ्यातील पाण्याचा वापर करून धानपीक जगविले आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने आणखी १५ दिवस धानाला सिंचनाची गरज आहे. तोपर्यंत शेततळ्यातील साठा संरक्षित ठेवला जाणार आहे. आकस्मिक स्थितीत या पाण्याचा वापर केला जात आहे.काही शेतकºयांच्या शेततळ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. शेततळ्यांचे पाणी फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत राहते. त्यामुळे सदर शेतकरी भाजीपाल्याचेही उत्पादन घेतात. शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकºयांना दुहेरी उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.अडचणींच्या वेळी शेततळ्याचे पाणी धानपिकासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. शेततळ्यातील पाण्याचा उपयोग संरक्षित जलसाठा म्हणून केला जातो. त्यामुळे या पाण्याचा उपयोग करताना बांधिमध्ये पाणी साचेपर्यंत पाणी देऊ नये. पाण्याचा सुयोग्य वापर करावा.- एस.पी. ढोणे,तालुका कृषी अधिकारी, आरमोरी