शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
3
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
4
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
7
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
8
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
9
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
10
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
11
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
12
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
13
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
14
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
15
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
16
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
17
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
18
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
19
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
20
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 

धानपिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:18 IST

कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना धानपिकाला शेततळ्यांचे पाणी देऊन वाचविले जात आहे.

ठळक मुद्दे३६६ एकर जागेला सिंचन : आरमोरी तालुक्यात ८७ शेततळे तयार

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना धानपिकाला शेततळ्यांचे पाणी देऊन वाचविले जात आहे. आरमोरी तालुक्यातील ८७ शेतकºयांकडे शेततळे असून यामुळे जवळपास ३६६ एकराला सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.मोठे जलसिंचन प्रकल्प निर्माण करणे अशक्य असल्याने शासन वैयक्तिक जलसिंचनावर विशेष भर देत आहे. याअंतर्गतच शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर विहीर, शेततळे खोदून दिले जात आहे. धानपिकाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. त्यामुळे संबंधित शेतकºयाकडे संरक्षित जलसाठा असणे अत्यंत आवश्यक आहे. आरमोरी तालुक्यातील शेतकºयांनी विविध योजनेअंतर्गत शेततळे बांधले आहेत. सुमारे ८७ शेतकºयांनी शेततळ्यांचा लाभ घेतला आहे. यावर शासनाने ६१ लाख रूपयांचे अनुदान दिले आहे. शेततळ्यांमुळे जवळपास ३६६ एकराला जलसिंचन होणार आहे. आठ दिवसांच्या पूर्वी पावसाने उसंत घेतली होती. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानपीक करपायला लागले होते. अशा कालावधीत शेतकºयांनी शेततळ्यातील पाण्याचा वापर करून धानपीक जगविले आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने आणखी १५ दिवस धानाला सिंचनाची गरज आहे. तोपर्यंत शेततळ्यातील साठा संरक्षित ठेवला जाणार आहे. आकस्मिक स्थितीत या पाण्याचा वापर केला जात आहे.काही शेतकºयांच्या शेततळ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. शेततळ्यांचे पाणी फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत राहते. त्यामुळे सदर शेतकरी भाजीपाल्याचेही उत्पादन घेतात. शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकºयांना दुहेरी उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.अडचणींच्या वेळी शेततळ्याचे पाणी धानपिकासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. शेततळ्यातील पाण्याचा उपयोग संरक्षित जलसाठा म्हणून केला जातो. त्यामुळे या पाण्याचा उपयोग करताना बांधिमध्ये पाणी साचेपर्यंत पाणी देऊ नये. पाण्याचा सुयोग्य वापर करावा.- एस.पी. ढोणे,तालुका कृषी अधिकारी, आरमोरी