शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

धानोरा तालुक्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: March 13, 2017 01:20 IST

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षण मिळणे आवश्यक आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : दुर्गम भागातील जि.प. शिक्षकांच्या गैरहजेरी वाढल्या धानोरा : बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी, शिक्षक व पालक हे तीन बिंदू आहेत. या तिघांच्या समन्वयानेच शिक्षणाची प्रक्रिया गतिमान व अधिक प्रभावी होऊ शकते. मात्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने धानोरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या गैरहजेऱ्या वाढल्या आहेत. परिणामी धानोरा तालुक्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला असून शाळा व्यवस्थापन समित्यांच्या या संदर्भात जि.प. प्रशासनाकडे अनेक तक्रारी पोहोचल्या आहेत. शाळेचे संपूर्ण प्रशासन व अध्ययन, अध्यापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पर्यवेक्षण यंत्रणेची आहे. या यंत्रणेमध्ये केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र हे अधिकारी तालुक्याच्या दुर्गम व ग्रामीण भागातील शाळांमधील थेट दौरेच करीत नसल्याने जि.प. शिक्षकांचे चांगलेच फावले आहे. शिक्षण विभागाच्या या दुरावस्थेस अर्थकारण जबाबदार आहे. अधिकाऱ्यांची मनमर्जी सांभाळल्याने फारशी कारवाई होत नाही, असा समज या शिक्षकांमध्ये झाला असल्याने शाळांमध्ये विद्यार्थी अधिक असूनही अनेक शिक्षक बहुतांश वेळा शाळेत गैरहजर दिसून येतात. धानोरा तालुक्याच्या शिक्षण विभागात अनेक अधिकारी प्रभारी आहेत. अनुभवी व स्वतंत्र अधिकारी नसल्याने शिक्षणाचा पूरता बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे अनेक गावातील सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी थेट गडचिरोली गाठून जि.प. प्रशासनाकडे तक्रारी करीत आहेत. सदर तक्रारींवर वस्तुनिष्ठ सखोल चौकशी होत नसल्याने पदाधिकारीही आता हतबल झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)