शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

गडचिरोली नगर परिषदेतील विकास कामे मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:00 IST

गडचिरोली शहरातील बहुप्रतीक्षित विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लागण्याची आशा बळावली आहे.

ठळक मुद्देनिधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश : नवी पाणीपुरवठा योजना, नाट्यगृह मार्गी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील बहुप्रतीक्षित विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लागण्याची आशा बळावली आहे.गडचिरोली नगर परिषदेच्या विविध कामांसाठी भरीव निधी देण्याची मागणी याआधीच मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मंगळवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भाजपचे जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रस्ताव तत्काळ मार्गी लावून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.राज्य सरकारचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. निवडणुकीची आचारसंहिता दीड महिन्यात लागणार आहे. त्यामुळे शक्य तितकी कामे मंजूर करून निधी देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेत आहे. आता ही कामे कधी मार्गी लागतील आणि त्याचा गडचिरोलीकरांना कधी लाभ घेता येईल, याकडे शहरवासियांचे लक्ष राहणार आहे.असे आहेत कामांचे प्रस्तावशहरातील प्रस्तावित कामांमध्ये गडचिरोली नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीकरिता २५ कोटी, शहर सौंदर्यीकरण व रस्ते विकास कामासाठी १५ कोटी, शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेकरीता ४५ कोटी रु पये आणि नवीन नाट्यगृहासाठी २० कोटी रुपये दिले जाणार आहेत.घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर पंचायतींना निधीस्वच्छ भारत अभियानांतर्गत एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, अहेरी नगर पंचायती व आरमोरी नगर परिषदेला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी)च्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छता राखणे, घनकचरा व्यवस्थापन करणे या दोन मुख्य घटकांचा समावेश आहे.१ मार्च २०१९ रोजी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या बैठकीत १२३ नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन नमुना प्रकल्पाच्या अहवालास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार नगर पंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये एटापल्ली नगर पंचायतीला ७८ लाख, भामरागड नगर पंचायतीला ६८.९६ लाख, चामोर्शी नगर पंचायतीला ९५.७६ लाख, अहेरी नगर पंचायतींला १०४.८३ लाख, आरमोरी नगर परिषदेला १३६.२५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारावा, असे निर्देश संबंधित नगर पंचायती व नगर परिषदांना देण्यात आले आहे.