शहरं
Join us  
Trending Stories
1
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
2
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
3
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
4
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख
5
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार
6
पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना
7
अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या
8
Viral Video: ढोल- ताशाच्या तालावर महिलांचा हटके डान्स, थेट जमिनीवर लोळल्या; व्हिडीओ व्हायरल!
9
राहुल गांधींना धक्का, मानहानीच्या खटल्यात ती मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
10
पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!
11
...अन् पोलिसवाल्यानं भरून काढली 'आर्मी मॅन'ची कमी! कोण आहे भालाफेकमधील भारताचा नवा 'बाहुबली'?
12
पाकिस्तानने भारताची ६ लढाऊ विमाने पाडली? सीडीएस अनिल चौहान यांनी सगळंच सांगितलं
13
Devendra Fadnavis : "अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणार"; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
14
भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी 
15
'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू प्रसाद यादवांना झटका! दिल्ली उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला
16
"राज्यात तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा’’, काँग्रेसची मागणी 
17
IND vs ENG : नायर ऑन फायर! इंग्लंडमधील द्विशतकी खेळीसह पठ्ठ्यानं किंग कोहलीच्या जागेवर टाकला 'रुमाल'
18
बाबा, काहीही कर पण आमची नोकरी सोडू नको, ८५० कोटी देतो...; गुगलने दिली होती या भारतीयाला ऑफर, आजही...
19
३४ षटकांनंतर नवा चेंडू, ५ बॅकअप खेळाडू, क्रिकेटमधील हे नियम आता बदलणार, ICCने दिली मान्यता
20
तंत्र विद्यामध्ये तज्ज्ञ, अनेक YouTubers सोबत संबंध...; पाकिस्तानला भेट देणाऱ्या गुप्तहेर कासिमची संपूर्ण कुंडली

किन्हाळाचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:42 IST

गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावाचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले.

ठळक मुद्देपुनर्वसित गाव : काही कुटुंब स्थलांतरित झालीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावाचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले. ही दोन्ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.किन्हाळा व अरततोंडी ही गावे गाढवी नदीच्या जवळ सखल भागात वसली होती. या गावांमध्ये गाढवी नदीच्या पुराचे पाणी शिरत होते. परिणामी दरवर्षी येथील नागरिकांना दुसºया ठिकाणी विस्थापीत व्हावे लागत होते. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने आर्थिक हानी होत होती. १९९४ मध्ये ही दोन्ही गावे पुराच्या तडाख्यात सापडली होती. त्यावर्षी या दोन्ही गावांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर या दोन्ही गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या गावांचे पाच किमी अंतरावरील मोहटोला व चिखली रिठ या आबादी जागेत पुनर्वसन करण्यात आले. ज्या वेळेवर नागरिकांचे पुनर्वसन झाले. त्या वेळेवर शासनाने रस्ते, नाल्या आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याने या सुविधा अल्पावधीतच नेस्तनाभूत झाल्या. आजच्या स्थितीत या दोन्ही गावांमध्ये रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. किन्हाळा गावच्या नाल्या पूर्णपणे खचल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र दिसून येते. पावसाळ्यात ही समस्या गंभीर होते. पुनर्वसीत गावांना मूलभूत सोयीसुविधा मिळणे गरजेचे असताना या दोन्ही गावांना वंचित ठेवले जात आहे. किन्हाळा या गावाप्रमाणेच अरततोंडी गावाचे चिखली रिठ येथील आबादी जागेत पुनर्वसन झाले. परंतु जुन्या अरततोंडी गावातील अर्धे अधिक नागरिक आजतागायत नवीन पुनर्वसीत ठिकाणी आलेले नाहीत. फक्त मिळालेल्या नवीन जागेवर त्यांनी कब्जा करून ठेवला आहे. रेशनपासून तर शाळेपर्यंतच्या सुविधांबाबत हे गाव द्विधा स्थितीत आहे. नागरिक दोन ठिकाणी राहत असल्याने सोयीसुविधा पुरविताना अडचण जात आहे. सोयी सुविधांचा अभाव असल्याने या दोन्ही गावातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.