शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दप्तर दिरंगाईने विकासाचा निधी वाद्यांत

By admin | Updated: November 17, 2016 02:02 IST

गडचिरोली जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतो.

२०१५-१६ व २०१६-१७ चे काम थांबणार : साडेतीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांची प्रोसिडिंगवर स्वाक्षरीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतो. यातील बराचसा निधी हा जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत खर्च केला जातो. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कामात नियमबाह्यपणे जिल्हा प्रशासन व पालकमंत्री हस्तक्षेप करीत असल्याने जिल्हा परिषदेच्या विकास कामावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांकडून केला जात आहे.३० जुलै २०१६ रोजी जिल्हा नियोजन व विकास समितीची सभा पार पडली होती. या सभेत जिल्हा विकासाचे नियोजन निश्चित करण्यात आले होते. ही सभा पार पडल्यानंतर साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र डीपीडीसीचे सदस्य असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना या सभेचे इतिवृत्तच प्राप्त झालेले नाही. या इतिवृत्तावर ५ नोव्हेंबर २०१६ रोजी पालकमंत्र्यांची स्वाक्षरी जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली. तब्बल साडेतीन महिन्यांचा कालावधी या कामासाठी लोटला. त्यामुळे सभेत ठरलेल्या योजना व त्यावर निश्चीत करण्यात आलेला निधी याचे नियोजनच वाद्यांत आलेले आहे. त्यातच नगर पालिका क्षेत्राची आचारसंहिता जिल्हा परिषदेच्या विकास कामांच्या नियोजनासाठीही लागू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने ठरविलेला विकास कामांचा आराखडा केवळ माहितीसाठी जिल्हा प्रशासनाकडे, डीपीडीसीकडे पाठविला जात होता. ही प्रथा पूर्वापार चालत आलेली होती. मात्र विद्यमान जिल्हा प्रशासन प्रमुखांनी जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या आराखड्याला डीपीडीसीची परवानगी लागेल. त्यानंतरच निधी मंजूर होईल, अशी अट घातली आहे. जिल्ह्यात दर तीन महिन्याला जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक होत नाही. त्यामुळे दिलेल्या आराखडा तसाच पडून राहतो. सहा-सहा महिने त्यावर अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात होणाऱ्या विकासकामांवर याचा थेट परिणाम होऊ लागला आहे. जिल्हा परिषदेची संपूर्ण बाजुने नाकेबंदी करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, पालकमंत्री यांच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वाट्याला येणारा निधीही जिल्हा परिषद सदस्य खर्च करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे, अशी माहिती अनेक सदस्यांनी लोकमतशी बोलताना दिली. (जिल्हा प्रतिनिधी)२२ सदस्यांनी विशेष सभा बोलवण्याची केली मागणीजिल्हा विकासाच्या कामाचे नियोजन करण्याकरिता जिल्हा नियोजन समितीची विशेष सभा तातडीने बोलविण्यात यावी, अशी मागणी २२ सदस्यांनी २२ सप्टेंबर २०१६ रोजी पालकमंत्र्यांकडे सदस्य, सचिव जिल्हा नियोजन समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने निवेदन देऊन केली होती. मात्र दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही विशेष सभा पालकमंत्र्यांनी बोलविली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या नियोजनावर अंमलबजावणीच आता होऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जि.प.ला येणारा विकास निधी ३१ मार्चपर्यंत खर्च न झाल्यास तो शासनाला सरेंडर करावा लागणार आहे व तो इतरत्र पळवून नेला जाऊ शकतो. एकूणच पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे जिल्हा विकासाचे तीनतेरा वाजले आहे. ३० जुलैच्या सभेचे इतिवृत्त (प्रोसीडींगही) जिल्हा परिषद अध्यक्षासह समितीच्या अनेक सदस्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत मिळालेले नाही, अशी माहिती पुढे आली आहे. याबाबत जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, प्रोसीडींग वाटप करण्यात आले. आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद क्षेत्रातील काम रखडलेले असतील तर याबाबत सदस्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे लोकमतशी बोलताना ते म्हणाले.हायकोर्टाच्या निर्णयानंतरही नियमबाह्य हस्तक्षेप जिल्हा नियोजन व विकास समिती तथा पालकमंत्री यांना जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या विकास आराखड्यात हस्तक्षेप करता येत नाही, काम बदलविता येत नाही. यापूर्वी वर्धा व भंडारा या दोन जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी अशा स्वरूपाचा हस्तक्षेप केल्याची घटना घडली होती. या घटनेला भंडाराचे तत्कालीन जि.प. सदस्य चरण वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावेळी खंडपीठाने दोन्ही पालकमंत्र्यांवर दंड ठोठावला व राज्य सरकारला तसे दिशानिर्देश दिले होते. हायकोर्टाच्या दिशानिर्देशानंतरही गडचिरोली जिल्ह्यात असा हस्तक्षेप अजुनही सुरू आहे, अशी माहिती जि.प. सदस्यांनी दिली. या हस्तक्षेपामुळे जि.प.च्या अधिकारावर अतिक्रमण होत आहे.