शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नक्षल्यांच्या विनाशातून विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:24 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत नक्षलवादी अडथळा आणत आहेत. हिंसक व घातपाताच्या कारवाया घडवून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून सातत्याने होतो.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षकांचे प्रतिपादन : वेनासरच्या जनजागरण मेळाव्यात साहित्य वाटप

ऑनलाईन लोकमतएटापल्ली : गडचिरोली जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत नक्षलवादी अडथळा आणत आहेत. हिंसक व घातपाताच्या कारवाया घडवून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून सातत्याने होतो. यावर एकमेव उपाय म्हणजे नक्षलवाद्यांचा विनाश हा आहे. नक्षल्यांच्या विनाशातूनच जनतेचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन कसनसूर उपपोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.एम. मेश्राम यांनी केले.तालुक्यातील कसनसूर उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेनासर येथे सोमवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कसनसूरचे सरपंच सुनील मडावी, ग्रा.पं. सदस्य नरोटे, मुख्याध्यापक वैरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चिकाटे, सहायक पोलीस निरीक्षक मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक संसारे, मोरे, डाके, गिरीगोवासी, अरोंदीकर आदी मान्यव उपस्थित होते.या मेळाव्यात आरोग्य, महावितरण, वन व कृषी विभागाच्या वतीने स्टॉल लावून उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच सदर मेळाव्यादरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये महिलांसाठी रांगोळी व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. गावातील गरजू व्यक्तींना पोलीस विभागातर्फे विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कसनसूर उपपोलीस ठाण्याचे मेजर आपटे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मेळाव्याला बिनासर व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. वाटपाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सामूहिक भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.