शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

नक्षल्यांच्या विनाशातून विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:24 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत नक्षलवादी अडथळा आणत आहेत. हिंसक व घातपाताच्या कारवाया घडवून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून सातत्याने होतो.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षकांचे प्रतिपादन : वेनासरच्या जनजागरण मेळाव्यात साहित्य वाटप

ऑनलाईन लोकमतएटापल्ली : गडचिरोली जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत नक्षलवादी अडथळा आणत आहेत. हिंसक व घातपाताच्या कारवाया घडवून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून सातत्याने होतो. यावर एकमेव उपाय म्हणजे नक्षलवाद्यांचा विनाश हा आहे. नक्षल्यांच्या विनाशातूनच जनतेचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन कसनसूर उपपोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.एम. मेश्राम यांनी केले.तालुक्यातील कसनसूर उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेनासर येथे सोमवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कसनसूरचे सरपंच सुनील मडावी, ग्रा.पं. सदस्य नरोटे, मुख्याध्यापक वैरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चिकाटे, सहायक पोलीस निरीक्षक मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक संसारे, मोरे, डाके, गिरीगोवासी, अरोंदीकर आदी मान्यव उपस्थित होते.या मेळाव्यात आरोग्य, महावितरण, वन व कृषी विभागाच्या वतीने स्टॉल लावून उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच सदर मेळाव्यादरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये महिलांसाठी रांगोळी व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. गावातील गरजू व्यक्तींना पोलीस विभागातर्फे विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कसनसूर उपपोलीस ठाण्याचे मेजर आपटे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मेळाव्याला बिनासर व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. वाटपाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सामूहिक भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.