शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

काेराेनाचे संकट असतानाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात पसरत असल्याच्या घटनेला वर्षपूर्ती हाेत आहे. आराेग्य विभागाच्या सल्ल्यानुसार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात पसरत असल्याच्या घटनेला वर्षपूर्ती हाेत आहे. आराेग्य विभागाच्या सल्ल्यानुसार अनेक जण इम्युनिटी पाॅवर वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचे सेवन करीत असले तरी अनेक जण लिंबू, संत्री, माेसंबीसह आंबट फळे व खाद्यपदार्थांना पसंती दर्शवितात. परंतु, गडचिराेली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील नागरिकांचा लिंबू, संत्री, माेसंबी खाण्याकडे कल असल्याने जिल्ह्यात या फळांचे दर स्थिर आहेत.

गडचिराेली जिल्ह्यात मागील वर्षी मे महिन्यात काेराेना विषाणूबाधित रुग्ण आढळून आले हाेते. सुरुवातीपासून गडचिराेली जिल्हा ग्रीन झाेनमध्ये हाेता. जेव्हा जिल्ह्यात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेव्हापासून अनेकांनी राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर दिला. याचाच परिणाम अनेक जण बाधित आढळूनही मृत्यूदर अतिशय कमी हाेता. दिवाळी ते संक्रांतीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने घटली हाेती. त्यानंतर मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यापासून पुन्हा रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. याच कालावधीपासून गडचिराेली शहरातही लिंबू, संत्री, माेसंबी फळांची मागणी काहीशा प्रमाणात वाढली. परंतु, माेजकेच ग्राहक असल्याने लिंबू, संत्रीची मागणी वाढूनही दरामध्ये फारसा फरक पडला नाही. १० ते २० रुपयांच्या फरकाने फळाच्या किमती कमी-जास्त झाल्याचे दिसून येते.

बाॅक्स ......

माेसंबी हैदराबाद येथून, संत्री नागपूर तर लिंबू चंद्रपूरहून

गडचिराेली जिल्ह्यात लिंबू फळाचे फारसे उत्पादन हाेत नाही. घरगुती अथवा शेतात लिंबू लावून शेतकरी वैयक्तिकच वापर करतात. त्यामुळे जिल्ह्यात चंद्रपूर व नागपूरहून लिंबू विक्रीसाठी येताे. माेसंबी हैदराबाद तर संत्री नागपूरवरून विक्रीसाठी येताे. सकाळपासूनच फळ वाहतुकीची वाहने येथील फळ बाजारात दिसून येतात. स्थानिक स्तरावर माेसंबी व संत्रीचे उत्पादन हाेत नाही. केवळ लिंबूचे उत्पादन अल्प प्रमाणात माेजकेच शेतकरी घेतात; परंतु घरगुती वापर हाेताे.

बाॅक्स .....

केवळ ५ टक्के दरवाढ

जिल्ह्यात फळविक्रीची फारशी माेठी बाजारपेठ नाही. अनेक जण रुग्णांना तसेच नातेवाईकांच्या गावाला जाण्यासाठी फळांची खरेदी करतात. परंतु राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी माेजकेच लाेक फळे खरेदी करतात. त्यामुळे केवळ ५ टक्के दरवाढ दिसून येत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

काेट .....

माेसंबी, संत्री व लिंबूची मागणी फारशी वाढल्याचे दिसून येत नाही. काही लाेक या फळांची खरेदी करीत असले तरी वयाेमानानुसार याेग्य प्रमाणात या फळांचे सेवन करावे.

- डाॅ. तामदेव दुधबळे, चामाेर्शी

काेट.....

लिंबूवर्गीय फळांमध्ये अ व क जीवनसत्त्व तसेच प्राेटिन्स असतात. ही फळे आराेग्यासाठी लाभदायक आहेत. इम्युनिटी पाॅवर वाढविण्यासाठी शरीराला ते लाभदायक आहेत.

- डाॅ. विलास वाघधरे, वैरागड

इम्युनिटी वाढते! मी फळे खाताे तुम्हीही खा!!

काेट ....

लिंबूवर्गीय फळांच्या सेवनाने राेगप्रतिकारकशक्ती वाढते. परंतु याबाबत ग्रामीण भागात लाेकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे अनेक जण आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे खाेकला हाेताे. या गैरसमजातून लिंबूचा वापर आहारात करीत नाहीत; परंतु घरातील आम्ही बहुतेक जण लिंबूचा वापर नेहमीच करीत असताे. हंगामानुसार संत्रीही खात असताे.

- सुधीर बारसागडे, गडचिराेली

काेट .......

राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी विविध फळांचे सेवन आमच्या कुटुंबातील सदस्य करतात. यासह व्यायामावरही भर देतात. परंतु, काेराेना संकटकाळात काही जण लिंबू, संत्री, माेसंबी आदी फळांचे सेवन आणि पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात करीत आहेत. राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी ही फळे खावीत.

- विश्वास किरंगे, गडचिराेली