शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

काेराेनाचे संकट असतानाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात पसरत असल्याच्या घटनेला वर्षपूर्ती हाेत आहे. आराेग्य विभागाच्या सल्ल्यानुसार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात पसरत असल्याच्या घटनेला वर्षपूर्ती हाेत आहे. आराेग्य विभागाच्या सल्ल्यानुसार अनेक जण इम्युनिटी पाॅवर वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचे सेवन करीत असले तरी अनेक जण लिंबू, संत्री, माेसंबीसह आंबट फळे व खाद्यपदार्थांना पसंती दर्शवितात. परंतु, गडचिराेली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील नागरिकांचा लिंबू, संत्री, माेसंबी खाण्याकडे कल असल्याने जिल्ह्यात या फळांचे दर स्थिर आहेत.

गडचिराेली जिल्ह्यात मागील वर्षी मे महिन्यात काेराेना विषाणूबाधित रुग्ण आढळून आले हाेते. सुरुवातीपासून गडचिराेली जिल्हा ग्रीन झाेनमध्ये हाेता. जेव्हा जिल्ह्यात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेव्हापासून अनेकांनी राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर दिला. याचाच परिणाम अनेक जण बाधित आढळूनही मृत्यूदर अतिशय कमी हाेता. दिवाळी ते संक्रांतीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने घटली हाेती. त्यानंतर मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यापासून पुन्हा रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. याच कालावधीपासून गडचिराेली शहरातही लिंबू, संत्री, माेसंबी फळांची मागणी काहीशा प्रमाणात वाढली. परंतु, माेजकेच ग्राहक असल्याने लिंबू, संत्रीची मागणी वाढूनही दरामध्ये फारसा फरक पडला नाही. १० ते २० रुपयांच्या फरकाने फळाच्या किमती कमी-जास्त झाल्याचे दिसून येते.

बाॅक्स ......

माेसंबी हैदराबाद येथून, संत्री नागपूर तर लिंबू चंद्रपूरहून

गडचिराेली जिल्ह्यात लिंबू फळाचे फारसे उत्पादन हाेत नाही. घरगुती अथवा शेतात लिंबू लावून शेतकरी वैयक्तिकच वापर करतात. त्यामुळे जिल्ह्यात चंद्रपूर व नागपूरहून लिंबू विक्रीसाठी येताे. माेसंबी हैदराबाद तर संत्री नागपूरवरून विक्रीसाठी येताे. सकाळपासूनच फळ वाहतुकीची वाहने येथील फळ बाजारात दिसून येतात. स्थानिक स्तरावर माेसंबी व संत्रीचे उत्पादन हाेत नाही. केवळ लिंबूचे उत्पादन अल्प प्रमाणात माेजकेच शेतकरी घेतात; परंतु घरगुती वापर हाेताे.

बाॅक्स .....

केवळ ५ टक्के दरवाढ

जिल्ह्यात फळविक्रीची फारशी माेठी बाजारपेठ नाही. अनेक जण रुग्णांना तसेच नातेवाईकांच्या गावाला जाण्यासाठी फळांची खरेदी करतात. परंतु राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी माेजकेच लाेक फळे खरेदी करतात. त्यामुळे केवळ ५ टक्के दरवाढ दिसून येत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

काेट .....

माेसंबी, संत्री व लिंबूची मागणी फारशी वाढल्याचे दिसून येत नाही. काही लाेक या फळांची खरेदी करीत असले तरी वयाेमानानुसार याेग्य प्रमाणात या फळांचे सेवन करावे.

- डाॅ. तामदेव दुधबळे, चामाेर्शी

काेट.....

लिंबूवर्गीय फळांमध्ये अ व क जीवनसत्त्व तसेच प्राेटिन्स असतात. ही फळे आराेग्यासाठी लाभदायक आहेत. इम्युनिटी पाॅवर वाढविण्यासाठी शरीराला ते लाभदायक आहेत.

- डाॅ. विलास वाघधरे, वैरागड

इम्युनिटी वाढते! मी फळे खाताे तुम्हीही खा!!

काेट ....

लिंबूवर्गीय फळांच्या सेवनाने राेगप्रतिकारकशक्ती वाढते. परंतु याबाबत ग्रामीण भागात लाेकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे अनेक जण आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे खाेकला हाेताे. या गैरसमजातून लिंबूचा वापर आहारात करीत नाहीत; परंतु घरातील आम्ही बहुतेक जण लिंबूचा वापर नेहमीच करीत असताे. हंगामानुसार संत्रीही खात असताे.

- सुधीर बारसागडे, गडचिराेली

काेट .......

राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी विविध फळांचे सेवन आमच्या कुटुंबातील सदस्य करतात. यासह व्यायामावरही भर देतात. परंतु, काेराेना संकटकाळात काही जण लिंबू, संत्री, माेसंबी आदी फळांचे सेवन आणि पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात करीत आहेत. राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी ही फळे खावीत.

- विश्वास किरंगे, गडचिराेली