शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

निधी मिळूनही ७० लाभार्थ्यांनी शौचालय बांधलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:33 IST

गडचिरोली शहराला गोदरीमुक्त बनविण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधण्याची जम्बो मोहीम हाती घेण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनुदानाची रक्कम अग्रीम स्वरूपात दिलेल्या ७० लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केले नाही. वर्षभरापासून या लाभार्थ्यांकडे पालिकेचे ५ लाख ४१ हजार रुपये प्रलंबित असल्याची माहिती हाती आली आहे.

ठळक मुद्देवसुलीसाठी पालिकेकडून दिरंगाई : ५ लाख ४१ हजार रुपयांची वसुली करणार?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छ भारत अभियान (शहरी) अंतर्गत गडचिरोली पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहराला गोदरीमुक्त बनविण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधण्याची जम्बो मोहीम हाती घेण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनुदानाची रक्कम अग्रीम स्वरूपात दिलेल्या ७० लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केले नाही. वर्षभरापासून या लाभार्थ्यांकडे पालिकेचे ५ लाख ४१ हजार रुपये प्रलंबित असल्याची माहिती हाती आली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात पालिकेच्या हद्दीतील बहुतांश वॉर्डात वैयक्तिक शौचालयाची मोहीम राबविण्यात आली. शौचालय नसणाऱ्या कुटुंबियांकडून अर्ज मागविण्यात आले. पालिका प्रशासनाकडे एकूण ३ हजार ३७१ अर्ज प्राप्त झाले. यापैकी पालिकेने २ हजार ८४८ अर्ज मंजूर केले. विविध त्रूटींमुळे ४७३ अर्ज नामंजूर करण्यात आले. मंजूर २ हजार ८४८ लाभार्थ्यांपैकी २ हजार ७३७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम १०० टक्के पूर्ण केले. या लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदानाची संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली. गडचिरोली शहरातील ३० वैयक्तिक शौचालय अद्यापही अपूर्ण स्थितीत आहे.शहराच्या विविध वॉर्डातील तब्बल ८१ लाभार्थ्यांनी शौचालयाच्या बांधकामाला सुरूवातच केली नाही. बांधकामाची सुरूवात न केलेल्या लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम पालिका प्रशासनाला परत करावी, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले होते. मात्र पालिकेचा पाठपुरावा कमी पडला. त्यामुळे ८१ लाभार्थ्यांपैकी केवळ ११ लाभार्थ्यांनी ७६ हजार रुपयांचा निधी पालिका प्रशासनाला परत केला. तब्बल ७० लाभार्थ्यांनी अद्यापही अनुदानाचा निधी पालिका प्रशासनाला परत केला नाही. लाभार्थ्यांकडून पालिका प्रशासनाला ५ लाख ४१ हजार रुपयांचा निधी येणे शिल्लक आहे.२ आॅक्टोबर २०१९ गांधी जयंतीपर्यंत लाभार्थ्यांकडून ५ लाख ४१ हजार रुपयांचा निधी पालिकेला परत मिळणे आवश्यक आहे. मात्र या तारखेपर्यंत सदर निधी लाभार्थ्यांकडून वसूल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या निधीतून तात्पुरत्या स्वरूपात ५.४१ लाखांचा निधी भरणा करण्यात यावा. हा निधी स्वच्छ महाराष्टÑ अभियानाच्या अनुदान खात्यात भरणा करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पालिकेला ओडीएफ प्लस व तीन स्टार मानांकन प्राप्त होणार नसल्याची शक्यता आहे.कोट्यवधींची विकास कामे थंडबस्त्यातराज्य सरकारच्या वतीने गडचिरोली पालिकेला विविध योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नगरोत्थान, दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर निधी, पाणीपुरवठा विकास योजना व इतर योजनांच्या माध्यमातून रस्ते, नाली, सौंदर्यीकरण, पांदण रस्ते, नळ पाईपलाईन, पाणीटाकी व इतर अनेक कामांसाठी पालिकेकडे निधी उपलब्ध आहे. मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने बरीचशी विकास कामे गेल्या काही महिन्यांपासून थंडबस्त्यात पडले आहेत. निधी असूनही कामे होत नसल्याने शहरवासीय नाराज आहेत.