शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेने नागरिक हैराण

By admin | Updated: June 7, 2017 01:23 IST

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सर्वत्र स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून सुंदर व स्वच्छ शहर करीत असल्याचा कांगावा केला जात आहे.

नगर पंचायत सुस्त : मंगल कार्यालयातील शिळे अन्न व घाणपाणी रिकाम्या भूखंडात लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सर्वत्र स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून सुंदर व स्वच्छ शहर करीत असल्याचा कांगावा केला जात आहे. मात्र आरमोरी नगर पंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व दुर्लक्षितपणामुळे आरमोरी शहराच्या अनेक वॉर्डात स्वच्छ भारत मिशनचा पूर्णत: फज्जा उडाला आहे. विशेष म्हणजे येथील नंदनवन कॉलनीत लगतच्या साई दामोधर मंगल कार्यालयातील उरलेले शिळे अन्न, घाणपाणी सर्रास सोडले जात आहे. परिणामी या रिकाम्या भूखंडात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिक प्रचंड त्रासले आहेत. यासंदर्भात नंदनवन कॉलनीतील नागरिकांनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, साई दामोधर मंगल कार्यालयात लग्न समारंभ व मोठे कार्यक्रम होत असतात. जेवनावळी आटोपल्यानंतर टाकाऊ अन्न, प्लास्टिकचे टाट, वाट्या, ग्लास आदी वस्तू लगतच्या रिकाम्या भूखंडात सर्रास फेकले जात आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. दुर्गंधी येत असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नगर पंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही नगर पंचायत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. तसेच संबंधित मंगल कार्यालयाच्या मालकास नोटीसही बजावली नाही. २२ मे रोजी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अजय काळबांधे, डी.के. बोरकर, कुशल तारगे, देविदास चहेले, गोपाल नंदनवार, अनंता खरवडे आदींसह नंदनवन कॉलनीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. आरमोरी शहराच्या विविध वॉर्डात मोठ्या प्रमाणात रिकामे भूखंड आहेत. शिवाय अनेक ठिकाणी नाल्यांचा अभाव असल्याने सांडपाणी रिकाम्या भूखंडात साचून राहते. आरमोरी शहरातील अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. आरमोरी शहरातील समस्यांबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी नगर पंचायतीला यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. मात्र नगर पंचायत प्रशासन याबाबत सुस्त आहे. नगर पंचायतीला प्राप्त झालेल्या नव्या घंटागाड्या तशाच पडून आहेत. घंटागाड्या निरूपयोगी ठरल्या आहेत. चौकशी करून कारवाई करा दामोधर मंगल कार्यालयातील घाणपाणी व टाकाऊ अन्न पदार्थामुळे नंदनवन कॉलनीतील लोकांना त्रास होत आहे. यासंदर्भात नगर पंचायतीने मोका चौकशी करून उचित कारवाई करावी, अशी मागणी नंदनवन नगर कॉलनीतील रहिवासी अजय काळबांधे यांनी मुख्याधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे केली आहे.