शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
4
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
5
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
6
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
7
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
10
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
11
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
12
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
13
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
14
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
15
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
16
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
17
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
18
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
19
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
20
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

अस्वच्छतेने नागरिक हैराण

By admin | Updated: June 7, 2017 01:23 IST

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सर्वत्र स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून सुंदर व स्वच्छ शहर करीत असल्याचा कांगावा केला जात आहे.

नगर पंचायत सुस्त : मंगल कार्यालयातील शिळे अन्न व घाणपाणी रिकाम्या भूखंडात लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सर्वत्र स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून सुंदर व स्वच्छ शहर करीत असल्याचा कांगावा केला जात आहे. मात्र आरमोरी नगर पंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व दुर्लक्षितपणामुळे आरमोरी शहराच्या अनेक वॉर्डात स्वच्छ भारत मिशनचा पूर्णत: फज्जा उडाला आहे. विशेष म्हणजे येथील नंदनवन कॉलनीत लगतच्या साई दामोधर मंगल कार्यालयातील उरलेले शिळे अन्न, घाणपाणी सर्रास सोडले जात आहे. परिणामी या रिकाम्या भूखंडात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिक प्रचंड त्रासले आहेत. यासंदर्भात नंदनवन कॉलनीतील नागरिकांनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, साई दामोधर मंगल कार्यालयात लग्न समारंभ व मोठे कार्यक्रम होत असतात. जेवनावळी आटोपल्यानंतर टाकाऊ अन्न, प्लास्टिकचे टाट, वाट्या, ग्लास आदी वस्तू लगतच्या रिकाम्या भूखंडात सर्रास फेकले जात आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. दुर्गंधी येत असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नगर पंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही नगर पंचायत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. तसेच संबंधित मंगल कार्यालयाच्या मालकास नोटीसही बजावली नाही. २२ मे रोजी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अजय काळबांधे, डी.के. बोरकर, कुशल तारगे, देविदास चहेले, गोपाल नंदनवार, अनंता खरवडे आदींसह नंदनवन कॉलनीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. आरमोरी शहराच्या विविध वॉर्डात मोठ्या प्रमाणात रिकामे भूखंड आहेत. शिवाय अनेक ठिकाणी नाल्यांचा अभाव असल्याने सांडपाणी रिकाम्या भूखंडात साचून राहते. आरमोरी शहरातील अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. आरमोरी शहरातील समस्यांबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी नगर पंचायतीला यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. मात्र नगर पंचायत प्रशासन याबाबत सुस्त आहे. नगर पंचायतीला प्राप्त झालेल्या नव्या घंटागाड्या तशाच पडून आहेत. घंटागाड्या निरूपयोगी ठरल्या आहेत. चौकशी करून कारवाई करा दामोधर मंगल कार्यालयातील घाणपाणी व टाकाऊ अन्न पदार्थामुळे नंदनवन कॉलनीतील लोकांना त्रास होत आहे. यासंदर्भात नगर पंचायतीने मोका चौकशी करून उचित कारवाई करावी, अशी मागणी नंदनवन नगर कॉलनीतील रहिवासी अजय काळबांधे यांनी मुख्याधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे केली आहे.