शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

देसाईगंज व कोरचीत वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: January 9, 2017 00:51 IST

रस्त्याच्या बाजुला झालेल्या अतिक्रमणामुळे कोरची व देसाईगंज येथे वाहतुकीच्या कोंडीची समस्या प्रचंड गंभीर झाली आहे.

अपघात वाढले : अतिक्रमणामुळे निर्माण झाली समस्या, कोरचीवासीयांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनदेसाईगंज/कोरची : रस्त्याच्या बाजुला झालेल्या अतिक्रमणामुळे कोरची व देसाईगंज येथे वाहतुकीच्या कोंडीची समस्या प्रचंड गंभीर झाली आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. कोरची येथील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याच्या बाजुचे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरची हे १३३ गावांचे संपर्क ठिकाण असल्याने या ठिकाणी वाहने व नागरिकांचे नेहमीच वर्दळ राहते. आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य मार्गावरून वाहन घेऊन जाणे कठीण होते. कोरची ग्रामपंचायत असताना नगरातील प्रमुख रस्ते रूंदीकरणाकरिता जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांनी मिळून अतिक्रमणधारकांना रस्त्याच्या मुख्य केंद्रापासून १२ मीटरपर्यंतचे अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस दिले होते. मात्र संधीसाधू लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. १० वर्षा अगोदर अतिक्रमण हटविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. मात्र त्याचेही काहीच झाले नाही. कोरची येथील रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत. कोरची येथे ब्रह्मपुरी, गडचिरोली, साकोली व गोंदिया आगाराच्या बसेस येतात. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करावे, अशी मागणी कोरची शहरातील नागरिकांकडून करण्यात येत असली तरी याकडे नगर पंचायत तसेच बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. विविध वस्तू खरेदीसाठी जिल्हाभरातील नागरिक देसाईगंज येथे येतात. त्यामुळे बाजारपेठ, मुख्य मार्गावर चारचाकी वाहने व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. मात्र देसाईगंजातही अतिक्रमणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरातून मुख्य मार्गाने रस्ता दुभाजक नाही. त्यामुळेही वाहनांवर नियंत्रण राहत नाही. कधीकधी चार ते पाच वाहने एकाच वेळेवर आल्याने वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानकासमोर वर्षभर गर्दी राहते. स्वतंत्र बसस्थानक नसल्याने जिल्हाभरातून येणाऱ्या बसेस बसस्थानकाच्या समोरच उभ्या केल्या जातात. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.कोरचीत इतरही समस्या कायमग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर झाले असले तरी शहराच्या विकासावर कोणताही परिणाम झाला नाही. शहराच्या विकासासाठी आठवडी बाजाराचे स्थानांतरण करावे, कचऱ्याचा स्वतंत्र डम्पिंग ग्राऊंड तयार करावा, सर्वच वार्डांमध्ये सीमेंट रस्ते, नाली बांधकाम व मोरी बांधकाम करावे, क्रीडा संकुलाचे बांधकाम करून नवीन बगिचा बांधण्यात यावा, तलावाची दुरूस्ती करून सौंदर्यीकरण करावे, कोरची येथील गरजू व्यक्तींना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी कोरची येथील हिरालाल पांडुरंग राऊत, परदेशी बगवा, प्रियतमा खुशाल जेंगठे यांनी केले आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.