शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

देसाईगंज व कोरचीत वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: January 9, 2017 00:51 IST

रस्त्याच्या बाजुला झालेल्या अतिक्रमणामुळे कोरची व देसाईगंज येथे वाहतुकीच्या कोंडीची समस्या प्रचंड गंभीर झाली आहे.

अपघात वाढले : अतिक्रमणामुळे निर्माण झाली समस्या, कोरचीवासीयांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनदेसाईगंज/कोरची : रस्त्याच्या बाजुला झालेल्या अतिक्रमणामुळे कोरची व देसाईगंज येथे वाहतुकीच्या कोंडीची समस्या प्रचंड गंभीर झाली आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. कोरची येथील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याच्या बाजुचे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरची हे १३३ गावांचे संपर्क ठिकाण असल्याने या ठिकाणी वाहने व नागरिकांचे नेहमीच वर्दळ राहते. आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य मार्गावरून वाहन घेऊन जाणे कठीण होते. कोरची ग्रामपंचायत असताना नगरातील प्रमुख रस्ते रूंदीकरणाकरिता जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांनी मिळून अतिक्रमणधारकांना रस्त्याच्या मुख्य केंद्रापासून १२ मीटरपर्यंतचे अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस दिले होते. मात्र संधीसाधू लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. १० वर्षा अगोदर अतिक्रमण हटविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. मात्र त्याचेही काहीच झाले नाही. कोरची येथील रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत. कोरची येथे ब्रह्मपुरी, गडचिरोली, साकोली व गोंदिया आगाराच्या बसेस येतात. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करावे, अशी मागणी कोरची शहरातील नागरिकांकडून करण्यात येत असली तरी याकडे नगर पंचायत तसेच बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. विविध वस्तू खरेदीसाठी जिल्हाभरातील नागरिक देसाईगंज येथे येतात. त्यामुळे बाजारपेठ, मुख्य मार्गावर चारचाकी वाहने व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. मात्र देसाईगंजातही अतिक्रमणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरातून मुख्य मार्गाने रस्ता दुभाजक नाही. त्यामुळेही वाहनांवर नियंत्रण राहत नाही. कधीकधी चार ते पाच वाहने एकाच वेळेवर आल्याने वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानकासमोर वर्षभर गर्दी राहते. स्वतंत्र बसस्थानक नसल्याने जिल्हाभरातून येणाऱ्या बसेस बसस्थानकाच्या समोरच उभ्या केल्या जातात. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.कोरचीत इतरही समस्या कायमग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर झाले असले तरी शहराच्या विकासावर कोणताही परिणाम झाला नाही. शहराच्या विकासासाठी आठवडी बाजाराचे स्थानांतरण करावे, कचऱ्याचा स्वतंत्र डम्पिंग ग्राऊंड तयार करावा, सर्वच वार्डांमध्ये सीमेंट रस्ते, नाली बांधकाम व मोरी बांधकाम करावे, क्रीडा संकुलाचे बांधकाम करून नवीन बगिचा बांधण्यात यावा, तलावाची दुरूस्ती करून सौंदर्यीकरण करावे, कोरची येथील गरजू व्यक्तींना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी कोरची येथील हिरालाल पांडुरंग राऊत, परदेशी बगवा, प्रियतमा खुशाल जेंगठे यांनी केले आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.