शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

देसाईगंजातील गाळे रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:46 IST

स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत देसाईगंज येथे २००९ मध्ये लाखो रूपये खुर्चन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर गाळे सुशिक्षित बेरोजगारांना भाडे तत्त्वावर द्यायचे होते. मात्र सदर गाळे अजूनपर्यंत भाडे तत्त्वावर देण्यात आले नाही.

ठळक मुद्देलाखोंचा खर्च पाण्यात : स्वर्ण जयंती ग्राम योजनेअंतर्गत बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत देसाईगंज येथे २००९ मध्ये लाखो रूपये खुर्चन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर गाळे सुशिक्षित बेरोजगारांना भाडे तत्त्वावर द्यायचे होते. मात्र सदर गाळे अजूनपर्यंत भाडे तत्त्वावर देण्यात आले नाही.शहरामध्ये अनेक बेरोजगार युवक व्यवसाय करण्यासाठी तयार असतात. मात्र व्यवसाय करण्यासाठी आवश्यक दुकानगाळे उपलब्ध होत नाही. दुकानाची इमारत भाड्याने घेण्यासाठी लाखो रूपये मोजावे लागतात. सुशिक्षित बेरोजगारांना दुकानाच्या इमारती उपलब्ध व्हाव्या, यासाठी शासनाने स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शहरात दुकान गाळे बांधले जातात. देसाईगंज येथे जुन्या पंचायत समितीच्या दर्शनी भागात २००९ मध्ये पाच गाळ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र अजूनपर्यंत सदर गाळे भाड्याने देण्यात आले नाही. पंचायत समितीच्या दर्शनी भागात सदर गाळे असल्याने झेरॉक्स मशीन, स्टेशनरी व हॉटेल यासारखी दुकाने सहज चालू शकतात. मात्र बेरोजगार युवकही सदर गाळे भाड्याने घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येते. देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ज्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले आहेत, तेथील जागेचे भाव कोट्यवधी रूपयांच्या घरात आहेत. मागील आठ वर्षांच्या कालावधीत पंचायत समितीने या गाळ्यांच्या देखभाल व दुरूस्तीकडे कायमचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गाळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या गाळ्यांच्या भिंती व शटरला रंगरंगोटी झाल्यास बेरोजगार युवक दुकान टाकण्यास तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील बहुतांश गाळ्यांची विदारक स्थितीसुवर्ण ग्राम जयंती योजने अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे दुकान गाळ्यांना भाडेकरू मिळणार की नाही, याचा विचार न करता शासनाकडून आलेले पैसे केवळ खर्च करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने गाळ्यांचे बांधकाम केले आहे. मात्र आठ ते नऊ वर्षांपासून दुकान गाळे भाडेकरूविना पडून आहेत. त्यावर झालेला लाखो रूपयांचा खर्च वाया गेला आहे. सदर गाळे बेरोजगारांना उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.