शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

उपजिल्हा रूग्णालयाला प्रतिनियुक्तीचे ग्रहण

By admin | Updated: October 28, 2014 22:57 IST

कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रूग्णालयात ड्यूटी लावल्याने येथील आरोग्यसेवा प्रभावीत होत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक रूग्णांवर वेळीच

कुरखेडा : कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रूग्णालयात ड्यूटी लावल्याने येथील आरोग्यसेवा प्रभावीत होत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक रूग्णांवर वेळीच उपचार होत नसल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची ड्यूटी रद्द करून उपजिल्हा रूग्णालयातच कर्तव्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांना ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात १ अधीक्षक व ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यापैकी ६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आलेली आहेत. मात्र येथील डॉ. परवते यांची पदव्यूत्तर शिक्षणासाठी निवड झाल्याने सध्या ते नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तर डॉ. माळाकोळीकर यांची सेवा पूर्णपणे प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रूग्णालयात जोडण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम व सुंगनी तज्ज्ञ डॉ. संभाजी ठाकर यांचे सुद्धा सेवा आठवड्यातून एक दिवस प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रूग्णालयात जोडण्यात आली आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय सेवा प्रभावीत होत आहे. अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बहुसंख्य रूग्णांना उपचारासाठी नाईलाजास्तव गडचिरोली येथे यावे लागत आहे. कुरखेडा रूग्णालयात नेहमीच रूग्णांची उपचारासाठी मोठी वर्दळ असते. कुरखेडा, देसाईगंज, कोरची तालुक्यासह लगतच्या गोंदिया जिल्ह्यातील रूग्णसुद्धा उपचाराकरिता उपजिल्हा रूग्णालयात येतात. त्यामुळे येथील बाह्य रूग्ण विभागात दररोज २५० ते ३०० रूग्ण औषधोपचार घेतात. तर आंतररूग्ण विभागात ५० खाटांची क्षमता असतांनादेखील ६० ते ७० रूग्ण दाखल होत असतात. या रूग्णालयात रूग्णांची नेहमीच गर्दी असते. मात्र वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर असल्याने रूग्णांना वेळीच उपचार मिळू शकत नाही. परिणामी उपजिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा प्रभावीत होत आहे.उपजिल्हा रूग्णालयातील स्त्रीरोग व सुंगनी तज्ज्ञ गडचिरोली येथे प्रतिनियुक्तीवर असल्याने कुरखेडा येथे होणाऱ्या प्रसुती शस्त्रक्रिया सुद्धा प्रभावीत होत आहेत. रूग्णांना सुरक्षा उपयोजना म्हणून गडचिरोली येथील रूग्णालयात पाठविले जात आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीने प्रभावीत झालेली येथील आरोग्यसेवा पूर्ववत करण्याकरिता प्रतिनियुक्त्या त्वरित रद्द करण्यात याव्या, अशी मागणी तंमुसचे अध्यक्ष तलतअली सय्यद, उपसरपंच अशोक कंगाले, ग्रा. पं. सदस्य रोहीत ढवळे, सिराज पठाण, राकेश चव्हाण व नागरिकांनी केली आहे. प्रतिनियुक्त्या त्वरित रद्द न झाल्यास आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.