शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बाल संरक्षणाबाबत उदासीनता

By admin | Updated: April 12, 2015 02:11 IST

बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, त्याचबरोबर राज्य केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचून

गडचिरोली : बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, त्याचबरोबर राज्य केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचून प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य व्हावे यासाठी प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्याचे निर्देश १ जून २०१४ रोजी देण्यात आले होते. मात्र याला १० महिन्यांचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील १६६८ गावांपैकी केवळ ३९ गावांमध्ये बाल संरक्षण समित्यांची स्थापणा झाली आहे. यावरून बालकांच्या संरक्षणाबाबत गावकरी व प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.मुलांना देशाचे भावी आधारस्तंभ मानले जाते. मात्र बदलत चाललेल्या समाज व्यवस्थेचे लहान मुले शिकार बनत चालले आहेत. याचा विपरित परिणाम त्यांच्या भविष्यावर होत आहे. काही बालकांना तर नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, त्याचबरोबर त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र या योजनांची माहिती पालक वर्गाला राहत नसल्याने पीडित मुलगा योजनांपासून वंचित राहत आहेत. त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण करता यावे यासाठी प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करावी, असे आदेश महिला व बाल विकास विभागाने दिले होते.याबद्दलच्या सूचना पंचायत समितीच्या बाल विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या व समित्या स्थापन झाल्याची माहिती बाल संरक्षण कक्षाला कळवायची होती. बाल संरक्षण समितीची स्थापना ग्रामसभेत करायची होती. मात्र १० महिन्यांचा कालावधी उलटूनही बहुतांश गावांनी या समित्या स्थापन केल्याच नाहीत. या समितीचे अध्यक्ष सरपंच असून सचिव अंगणवाडी सेविका आहेत. त्यामुळे या समित्या स्थापन करण्यासाठी या दोन प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेणे आवश्यक होते. त्याचबरोबर या बद्दलची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सरपंच व अंगणवाडी सेविकांना देणे आवश्यक होते. मात्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी ही बाब फारशी गंभीरतेने न घेतल्याने बाल संरक्षण समित्या स्थापन झाल्या नाही. केवळ चामोर्शी तालुक्यांमध्ये ३९ ग्राम बाल संरक्षण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित गावांनी मात्र याबाबत उदासिनता बाळगली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)