शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

साखरीटोला परिसरातील गावात डेंग्यूचा कहर

By admin | Updated: September 1, 2014 23:35 IST

सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्यूने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्यूने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच साखरीटोला गावाला लागून असलेल्या आमगाव व सालेकसा तालुक्यातील अनेक गावे डेंग्यूच्या विळख्यात सापडली आहेत. यात तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या वडद, सोनेखारी, कवडी, कन्हारटोला, रामपूर, अंजोरा गावात डेंग्यूचे बरेच रुग्ण आढळले. तर सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सलंगटोला, चर्जेटोला येथे डेंगुचे रुग्ण आढळल्याची माहिती अहे. त्यामुळे परिसरात डेंग्यू आजाराचे तैमान सुरू असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अजून काही गावे डेंग्यूच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत.वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण परिसर डेंग्युमय होऊ शकतो. याकडे आरोग्य विभागाने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी केली जात आहे. कोटरा गावाला वगळले तर या संपूर्ण गावाकडे आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष आहे.प्राप्त माहितीनुसार, कोटरा गावातील लीलाधर क्षीरसागर, दिपाली बोहरे, मानीकचंद मानकर, सलंगटोला येथील रंजित दाते, मधू दोनोडे, ललित दोनोडे, सोनेखारी येथील योगेश्वरी पटले, कवडी येथील आशीष साखरे, अक्षय उईके, अंजोरा येथील कांची राणे, राहुल रहांगडाले, भूमेश्वर रहांगडाले, वैशाली अंबुले, तिरखेडी येथील योगेश्वरी मडावी, वडद येथील शालिकराम पारधी, रामपूर येथील उदल बहेकार, कन्हारटोला येथील रमेश तांडेकर, मुकेश ताडेकर, सुनील रहिले, बालू ब्राह्मणकर, चर्जेटोला येथील मनोहर चर्जे, वंदना चर्जे, स्वाती चर्जे, मयाराम चनाप, डेंग्यूसारख्या आजाराने ग्रस्त असून यातील बरेच रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती आहे.काही रुग्ण गोदियाच्या केटीएस रुग्णालयात उपचार घेत आहेत. अंजोरा गावातील बरेच रुग्ण गोंदिया येथील खासगी रुग्णालयात तर काही साखरीटोला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून पाऊस न पडल्याने वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तापाचे प्रमाण वाढले. मात्र यात डेंग्यूग्रस्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचे जानवते. विविध रोगाने आजारी रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी डॉक्टरांची चांदी आहे. या परिस्थितीमुळे असे लक्षात येते की शासनाचे आरोग्य विभागावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र रोगावर आळा घालण्यास यंत्रणा कुचकामी ठरत आहे. यामुळे लोकांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)