शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

ठेंगण्या पुलाच्या दुरूस्तीला ‘ठेंगा’

By admin | Updated: July 19, 2016 01:48 IST

गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम,

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम, अतिदुर्गम भागाशिवाय मुख्य रहदारीच्या रस्त्यावरही असलेल्या कमी उंचीच्या ठेंगण्या पूलांची दुरूस्ती करण्याकडे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या अरूंद व ठेंगण्या पूलावर अपघात होऊन आतापर्यंत जिल्ह्यात ३०० वर अधिक लोकांचे बळी गेल्या तीन-चार वर्षात गेलेले आहेत. सध्या फक्त कठाणी नदीचा पूल नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय आणखी आठ ते दहा ठेंगणे पूल जिल्ह्यात असून त्यांची उंची वाढविण्याबाबत शासनस्तरावरून प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. या पुलांमुळे दरवर्षी पावसाळ्यात पुलावर पाणी चढल्याने रस्ता बंद होण्याची स्थिती निर्माण होते.गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून चंद्रपूर-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव तसेच गडचिरोली- आरमोरी- देसाईगंज-गोंदिया हे आंतरराज्य व राज्य महामार्ग आहेत. या व चंद्रपूर-अहेरी या महामार्गावर बोरी गावाजवळ दिना नदीचा पूल आहे. हा पूल अरूंद व ठेंगणा आहे. येथून अनेकदा वाहन पडतात. येथे आतापर्यंत ८ ते ९ अपघात झाले व अनेकांचा बळीही गेला आहे. याशिवाय गोंडपिपरी-आष्टी दरम्यान असलेल्या वैनगंगा नदीच्या पूलावरूनही वाहन पडल्याच्या अनेक घटना घडल्या. व यातही अनेकजणांचे बळी गेले आहेत. तसेच नागपूर-गडचिरोली मार्गावर आरमोरी तालुक्यात ठाणेगाव जवळील गाढवी नदीच्या पूलावर वाहन कोसळल्याने आतापर्यंत १५ अपघात झाले आहे. मात्र यापैकी कुठल्याही पूलाची दुरूस्ती करण्यात आलेली नाही तसेच हे पूल उंच करण्याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आलेला नाही. गडचिरोलीचा वारंवार संपर्क पूर आल्यानंतर मुख्यालयाशी तुटत होता. याला कठाणी नदीचा ठेंगणा पूल कारणीभूत ठरला होता. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी लक्ष घालून हा पूल उंच करण्याचे काम हाती घेतले आहे. १५ कोटी रूपये या कामासाठी मंजूर केले. आता या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलाचे कामही मंजूर करण्यात आले होते. मात्र त्याचे घोडे अजुनही रखडलेलेचे आहे. यासोबत १० ठेंगणे पूल पावसाळ्यात वाहतूक रोखण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात या पुलाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह असून राष्ट्रीय महामार्गाचेही काम अधांतरीच दिसत आहे.३ वर्षांत २९० अपघातांमध्ये ३३७ लोकांचा बळी४२०१० मध्ये ९५ अपघातात १०६ जण मरण पावले. २०११ मध्ये ९७ अपघातात १०७ जण तर २०१२ मध्ये ९८ अपघातात १२४ जण मरण पावले आहेत. आष्टीजवळ वैनगंगा नदीच्या ठेंगण्या पूलावरून अनेक वाहने आजवर पडलीत. यात अनेकांचा बळी गेला. तसेच अहेरी मार्गावर दिना नदीच्या पूलावरही काही वर्षापूर्वी मेटॉडोर वाहून गेला होता. यातही ६ ते ७ लोकांचा बळी गेला होता. परंतु तरीही या पूलांची दुरूस्ती झालेली नाही.