शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

ठेंगण्या पुलाच्या दुरूस्तीला ‘ठेंगा’

By admin | Updated: July 19, 2016 01:48 IST

गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम,

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम, अतिदुर्गम भागाशिवाय मुख्य रहदारीच्या रस्त्यावरही असलेल्या कमी उंचीच्या ठेंगण्या पूलांची दुरूस्ती करण्याकडे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या अरूंद व ठेंगण्या पूलावर अपघात होऊन आतापर्यंत जिल्ह्यात ३०० वर अधिक लोकांचे बळी गेल्या तीन-चार वर्षात गेलेले आहेत. सध्या फक्त कठाणी नदीचा पूल नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय आणखी आठ ते दहा ठेंगणे पूल जिल्ह्यात असून त्यांची उंची वाढविण्याबाबत शासनस्तरावरून प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. या पुलांमुळे दरवर्षी पावसाळ्यात पुलावर पाणी चढल्याने रस्ता बंद होण्याची स्थिती निर्माण होते.गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून चंद्रपूर-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव तसेच गडचिरोली- आरमोरी- देसाईगंज-गोंदिया हे आंतरराज्य व राज्य महामार्ग आहेत. या व चंद्रपूर-अहेरी या महामार्गावर बोरी गावाजवळ दिना नदीचा पूल आहे. हा पूल अरूंद व ठेंगणा आहे. येथून अनेकदा वाहन पडतात. येथे आतापर्यंत ८ ते ९ अपघात झाले व अनेकांचा बळीही गेला आहे. याशिवाय गोंडपिपरी-आष्टी दरम्यान असलेल्या वैनगंगा नदीच्या पूलावरूनही वाहन पडल्याच्या अनेक घटना घडल्या. व यातही अनेकजणांचे बळी गेले आहेत. तसेच नागपूर-गडचिरोली मार्गावर आरमोरी तालुक्यात ठाणेगाव जवळील गाढवी नदीच्या पूलावर वाहन कोसळल्याने आतापर्यंत १५ अपघात झाले आहे. मात्र यापैकी कुठल्याही पूलाची दुरूस्ती करण्यात आलेली नाही तसेच हे पूल उंच करण्याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आलेला नाही. गडचिरोलीचा वारंवार संपर्क पूर आल्यानंतर मुख्यालयाशी तुटत होता. याला कठाणी नदीचा ठेंगणा पूल कारणीभूत ठरला होता. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी लक्ष घालून हा पूल उंच करण्याचे काम हाती घेतले आहे. १५ कोटी रूपये या कामासाठी मंजूर केले. आता या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलाचे कामही मंजूर करण्यात आले होते. मात्र त्याचे घोडे अजुनही रखडलेलेचे आहे. यासोबत १० ठेंगणे पूल पावसाळ्यात वाहतूक रोखण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात या पुलाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह असून राष्ट्रीय महामार्गाचेही काम अधांतरीच दिसत आहे.३ वर्षांत २९० अपघातांमध्ये ३३७ लोकांचा बळी४२०१० मध्ये ९५ अपघातात १०६ जण मरण पावले. २०११ मध्ये ९७ अपघातात १०७ जण तर २०१२ मध्ये ९८ अपघातात १२४ जण मरण पावले आहेत. आष्टीजवळ वैनगंगा नदीच्या ठेंगण्या पूलावरून अनेक वाहने आजवर पडलीत. यात अनेकांचा बळी गेला. तसेच अहेरी मार्गावर दिना नदीच्या पूलावरही काही वर्षापूर्वी मेटॉडोर वाहून गेला होता. यातही ६ ते ७ लोकांचा बळी गेला होता. परंतु तरीही या पूलांची दुरूस्ती झालेली नाही.