शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

ठेंगण्या पुलाच्या दुरूस्तीला ‘ठेंगा’

By admin | Updated: July 19, 2016 01:48 IST

गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम,

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम, अतिदुर्गम भागाशिवाय मुख्य रहदारीच्या रस्त्यावरही असलेल्या कमी उंचीच्या ठेंगण्या पूलांची दुरूस्ती करण्याकडे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या अरूंद व ठेंगण्या पूलावर अपघात होऊन आतापर्यंत जिल्ह्यात ३०० वर अधिक लोकांचे बळी गेल्या तीन-चार वर्षात गेलेले आहेत. सध्या फक्त कठाणी नदीचा पूल नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय आणखी आठ ते दहा ठेंगणे पूल जिल्ह्यात असून त्यांची उंची वाढविण्याबाबत शासनस्तरावरून प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. या पुलांमुळे दरवर्षी पावसाळ्यात पुलावर पाणी चढल्याने रस्ता बंद होण्याची स्थिती निर्माण होते.गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून चंद्रपूर-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव तसेच गडचिरोली- आरमोरी- देसाईगंज-गोंदिया हे आंतरराज्य व राज्य महामार्ग आहेत. या व चंद्रपूर-अहेरी या महामार्गावर बोरी गावाजवळ दिना नदीचा पूल आहे. हा पूल अरूंद व ठेंगणा आहे. येथून अनेकदा वाहन पडतात. येथे आतापर्यंत ८ ते ९ अपघात झाले व अनेकांचा बळीही गेला आहे. याशिवाय गोंडपिपरी-आष्टी दरम्यान असलेल्या वैनगंगा नदीच्या पूलावरूनही वाहन पडल्याच्या अनेक घटना घडल्या. व यातही अनेकजणांचे बळी गेले आहेत. तसेच नागपूर-गडचिरोली मार्गावर आरमोरी तालुक्यात ठाणेगाव जवळील गाढवी नदीच्या पूलावर वाहन कोसळल्याने आतापर्यंत १५ अपघात झाले आहे. मात्र यापैकी कुठल्याही पूलाची दुरूस्ती करण्यात आलेली नाही तसेच हे पूल उंच करण्याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आलेला नाही. गडचिरोलीचा वारंवार संपर्क पूर आल्यानंतर मुख्यालयाशी तुटत होता. याला कठाणी नदीचा ठेंगणा पूल कारणीभूत ठरला होता. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी लक्ष घालून हा पूल उंच करण्याचे काम हाती घेतले आहे. १५ कोटी रूपये या कामासाठी मंजूर केले. आता या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलाचे कामही मंजूर करण्यात आले होते. मात्र त्याचे घोडे अजुनही रखडलेलेचे आहे. यासोबत १० ठेंगणे पूल पावसाळ्यात वाहतूक रोखण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात या पुलाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह असून राष्ट्रीय महामार्गाचेही काम अधांतरीच दिसत आहे.३ वर्षांत २९० अपघातांमध्ये ३३७ लोकांचा बळी४२०१० मध्ये ९५ अपघातात १०६ जण मरण पावले. २०११ मध्ये ९७ अपघातात १०७ जण तर २०१२ मध्ये ९८ अपघातात १२४ जण मरण पावले आहेत. आष्टीजवळ वैनगंगा नदीच्या ठेंगण्या पूलावरून अनेक वाहने आजवर पडलीत. यात अनेकांचा बळी गेला. तसेच अहेरी मार्गावर दिना नदीच्या पूलावरही काही वर्षापूर्वी मेटॉडोर वाहून गेला होता. यातही ६ ते ७ लोकांचा बळी गेला होता. परंतु तरीही या पूलांची दुरूस्ती झालेली नाही.