शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आडते व्यापाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By admin | Updated: July 11, 2016 23:53 IST

अहमदनगर : शेतीमाल बाजार समित्यांच्या नियमानातून मुक्त केल्याच्या निषेधार्थ शहरासह आडते व्यापाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली़

अहमदनगर : शेतीमाल बाजार समित्यांच्या नियमानातून मुक्त केल्याच्या निषेधार्थ शहरासह आडते व्यापाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली़ दरम्यान, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्ह्यातील फळे व भाजीपाला विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापनेच्या सूचना संबंधितांना केल्या़फळे व भाजीपाला बाजार समितीच्या नियमातून मुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ सरकारच्या या निर्णयाचा शहरासह जिल्ह्यातील आडते व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध केला़ नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बैठक घेऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ कांदा आडतदार भाजीपाला फळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदलाल झंवर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले़ शिष्टमंडळात संतोष सूर्यवंशी, निखिल वारे आदींचा समावेश होता़ यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे, सन १९७२ पासून १० टक्के आडत घेत होते़ शेतीमाल विक्रीचे व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आल्यानंतर आडतीचा ६ टक्के झाला़ सध्या व्यापारी या दरानेच आडत वसूल करतात़ त्याबदल्यात शेतकऱ्यांच्या मालाचा योग्य भाव आणि पैशाची हमी समिती देते़ असे असताना सरकारने शेतीमाल नियमन मुक्त करण्याचा निर्णय घेतला़ नियमनमुक्ती म्हणजे बाहेर माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे बंधन नाही़ याचाच अर्थ मुक्त बाजारामुळे पिढ्यान् पिढ्या व्यापार करणारे बेघर होतील़ त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल़ त्यामुळे हा नियमनमुक्ती कायदा कृषी बाजार समितीतील आवरात व्यापार करणाऱ्यांसाठी लागू करावा़ जेणेकरून बाहेरच्या व्यापाऱ्यांशी स्पर्धा करता येईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ आंदोलनात घोडेगाव, वांबोरी, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, पारनेर, शेवगाव, तिसगाव, संगमनेर येथील कडबा व्यापारी आदींचा समावेश होता़(प्रतिनिधी)उपाययोजना करण्याच्या सूचनानिवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहायक उपनिबंधक, जिल्हा पणन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलीस उपधीक्षक, प्रादेशिक परिवन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली़ बैठकीत जिल्ह्यातील नगर, राहुरी, राहाता, श्रीगोंदा, कर्जत येथील बाजार समित्या सुरू असल्याचे सांगण्यात आले़ तर जामखेड, शेवगाव आणि पाथर्डी येथील बाजार समितीचा कारभार बंद आहे़ संगमनेर व अकोले येथील भाजीपाला विक्रीची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या़