शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कोरचीच्या जांभळाला नागपुरात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:54 IST

गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून या जंगलात तसेच शेतशिवार व रस्त्याच्या आजुबाजूला जांभळाची अनेक झाडे आहेत. या झाडांचे जांभूळ आता निघत आहेत. कोरचीचे जांभूळ स्वादिष्ट असून ते विदर्भात प्रसिद्ध आहे. या जांभळाला नागपुरात मोठी मागणी असून कोरची येथून वाहनाद्वारे जांभूळ नागपूरला पोहोचत आहे.

ठळक मुद्देसंकलनातून अनेकांना मिळतोय रोजगार : गडचिरोलीत १०० रुपये तर नागपुरात २०० रुपये किलोने विक्री

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून या जंगलात तसेच शेतशिवार व रस्त्याच्या आजुबाजूला जांभळाची अनेक झाडे आहेत. या झाडांचे जांभूळ आता निघत आहेत. कोरचीचे जांभूळ स्वादिष्ट असून ते विदर्भात प्रसिद्ध आहे. या जांभळाला नागपुरात मोठी मागणी असून कोरची येथून वाहनाद्वारे जांभूळ नागपूरला पोहोचत आहे.कोरचीमध्ये जांभूळ २५ ते ३० रुपये किलो तर गडचिरोलीत १०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. नागपूरमध्ये किलोमागे २०० रुपये मोजावे लागत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जांभूळ शेतीबाबत दरवर्षी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते. गतवर्षी गडचिरोली येथे जांभूळ महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात अनेक शेतकरी व नागरिकांनी हजेरी लावली होती. सदर महोत्सवात कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी तज्ज्ञांनी जांभळाचे महत्त्व पटवून दिले होते.कोरची, कुरखेडा, आरमोरी तालुक्यात अहेरी उपविभागतही जांभळाचे अनेक झाडे आहेत. गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल असल्याने येथील आदिवासी नागरिक विविध प्रकारच्या रानमेवा संकलित करून त्यावर उपजीविका करतात. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिक सकाळच्या सुमारास जंगल परिसरात जाऊन जांभूळ व इतर प्रकारचे रानमेवा तसेच रानभाज्या संकलित करीत आहेत. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली येथील बाजारात गेल्या आठ-दहा दिवसांपासून रानभाज्या मोठ्या प्रमाणात विक्रीस आणल्या जात आहेत. या रानभाज्याला नागरिकांकडून मोठी मागणी आहे.गडचिरोली जिल्ह्यातील गावांच्या सभोवताल जंगल आहे. या जंगलात अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात. तसेच काही झाडांच्या फुलांची भाजी केली जाते. बाजारात हळदफरी, पातूर, कळू भाजी, बहाव्याचा फूल, घोर, वराकल्या आदी रानभाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत. सदर भाज्या खरेदी करण्यास शहरातील नागरिकांना प्रतिष्ठा आड येत होती. रानभाज्या वर्षातून एकदाच येतात. प्रत्येक रानभाजीचे स्वतंत्र चव आहे. विशेष म्हणजे, कोणतीही कीटकनाशकाची फवारणी नसल्याने या रानभाज्यांमध्ये पोषकतत्व आढळतात.आरोग्यासाठी जांभूळ लाभदायक, मधुमेहावर गुणकारीजांभूळ हा मूलत: दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबूल कुळातील सदाहरीत, सपुष्प वृक्ष आहे. जांभळाच्या झाडाला उन्हाळ्यात जांभळ्या रंगाची फळे येतात. ही फळे गोड-तुरट चवीची असतात. आकारामानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. जांभळाला सायझिजियम क्युमिनी असे शास्त्रीय नाव आहे. जांभूळ मधुमेह रोगावर गुणकारी आहे. जांभूळ रसाच्या तसेच बीच्या भूकटीला औषधी गुणधर्म आहे. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहार औषध आहे. जांभूूळ रक्त शुद्ध करते. चेहºयावरचे मुरूम व पुटकुळ्या जांभळाच्या बिया उगारून लेप लावल्यास नष्ट होतात. जांभूळ हे पाचक आहे, असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. रामायण व पौराणिक ग्रंथामध्येही जांभळाचे महत्त्व विशद केले आहे. एकूणच जांभूळ हा आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.