शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्याची मागणी

By admin | Updated: January 19, 2016 01:27 IST

प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासंदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा येथील

आरमोरी/देसाईगंज : प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासंदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा येथील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आॅथरिटीच्या वतीने सोमवारी जनमत सभा घेण्यात आली. याला दोन्ही ठिकाणी नागरिक, व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.साकोली-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग २५३ सी या रस्त्याच्या संदर्भात राजीव भवन आरमोरी येथे सभा झाली. ही जनमत सभा राष्ट्रीय महामार्ग अभियंता कार्यालय नागपूर यांच्या अंतर्गत घेण्यात आली. स्मिथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बंगलोर हे या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम करीत आहे. त्यांच्या वतीने अभियंता संदीप आर. जी. यांनी जनसभेला माहिती दिली. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीशा, पश्चिम बंगाल या राज्यांशी हा मार्ग जोडला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात बायपास जाणार की, शहरातून जाणार याविषयी नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम होता. सदर मार्ग २४ मीटर म्हणजे, ८० फूटाचा राहणार असल्याचे संदीप यांनी स्पष्ट केले. बायपास मार्गाने आरमोरी शहरासाठी हा मार्ग न्यावा, असे मत काहींनी मांडले तर काहींनी रस्ता बायपास नेल्यास शेतकऱ्यांची शेतजमीन संपादन करावी लागेल. अनेक शेतकरी भूमीहिन होतील. याचाही विचार झाला पाहिजे, असे मत मांडले. तर काहींनी शेतकऱ्यांना बाजारभावानुसार जमिनीचा मोबदला व त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) दुर्वेश सोनवणे, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार मनोहर वलथरे, नायब तहसीलदार शशीकांत चन्नावार, सहायक अभियंता लभाने, माजी आमदार आनंदराव गेडाम, भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, किशोर वनमाळी, चंदू वडपल्लीवार, अमोल मारकवार, भारत बावणथडे, दिवाकर रामटेके, अमिन लालानी, शरद भोयर आदी उपस्थित होते. त्यानंतर देसाईगंज येथे नगर पालिकेच्या सांस्कृतिक भवनात जनमत सभा झाली. या सभेला व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी मात्र पाठ फिरविली. राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी हा देसाईगंज शहरातून न नेता तो बायपास मार्ग न्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातून २४ मीटर रूंदीचा मार्ग राहणार असल्याचे अभियंता संदीप यांनी सांगितले. यावेळी देसाईगंजचे तहसीलदार अजय चरडे यांच्यासह ३०० वर व्यावसायिक उपस्थित होते. (वार्ताहर/प्रतिनिधी)२४ मीटर लांबीच्या (८० फूट) रस्त्यासाठी ६ हजार २२१ झाडे तोडली जाणार४साकोली ते गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग २५३ सी करिता २०.१५ हेक्टर जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे. या मार्गावर १२ मोठ्या पुलांचे रूंदीकरण, ९१ लहान पुलांचे नवीन बांधकाम, एका रेल्वे पुलाचे नवीन बांधकाम, २७६ मोऱ्या बांधकाम, दोन ट्रॅक्सकरिता थांबे करावे लागणार आहे. या महामार्गाच्या डाव्या आणि उजव्या बाजुला येणाऱ्या १३ प्रार्थना स्थळांनाही हटवावे लागणार आहे. दोन शाळा, आठ शासकीय इमारती, ४५ निवासी व व्यापारी इमारती व १६५ व्यापारी इमारती व १०४ निवासी इमारती असे एकूण ३३७ मालमत्तेचे संपादन करावे लागणार आहे. यातील १३१ डाव्या बाजुचे तर २०६ उजव्या बाजुचे असतील. १६० किमी एकूण लांबी गडचिरोली-साकोली या राष्ट्रीय महामार्गाची असेल. रूंदीकरिता २४ मीटर जागा अधिग्रहण करणे प्रस्तावित आहे. साकोली-गडचिरोली या मार्गाकरिता ३९.७०० हेक्टर वनजमीन लागणार आहे. ६ हजार २२१ झाडे दोन्ही बाजुने तोडावे लागणार आहे. या अंतर्गत सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबाना नवीन जमीन अधिग्रहण कायदा २०१३ नुसार मदत दिली जाणार आहे. जास्तीत जास्त वृक्षारोपण करून हरीतपट्टा महामार्ग निर्माण केला जाईल, अशी माहिती अभियंता संदीप यांनी दोन्ही ठिकाणी सुनावणीदरम्यान दिली.