शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या राेपांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST

गडचिराेली : काेराेनाच्या संकटकाळात बहुतांश नागरिक आपल्या आराेग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, याकरिता राेगप्रतिकार शक्ती ...

गडचिराेली : काेराेनाच्या संकटकाळात बहुतांश नागरिक आपल्या आराेग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, याकरिता राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देत आहेत. त्याअनुषंगाने रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या तुळस, पुदीना, अद्रक, अश्वगंधा व गुळवेल आदी औषधी गुणधर्म असणाऱ्या राेपांना मागणी वाढली आहे.

प्राचीन काळापासून आयुर्वेदात विविध वनस्पतींचे विविध गुण व महत्त्व विशद करण्यात आले आहे. वनविभागासह अनेक जाणकार नागरिक आपल्या घरी तुळस, पुदिना, अद्रक, अश्वगंधा, गुळवेलसह विविध औषधी गुणधर्म असणाऱ्या राेपांची लागवड करीत असल्याचे दिसून येते. गडचिराेली शहरातील बऱ्याच घरी विड्याच्या पानांची राेपटी दिसून येतात. एकूणच या वनाैषधीचा विविध आजारांवर उपयाेग केला जाताे.

काेट...

काेराेना महामारीच्या पहिल्या लाटेत काही नागरिकांनी आमच्याकडील विविध प्रकारची वनाैषधी नेली. आता दुसऱ्या लाटेत वनस्पतीचा उपयाेग करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या अंगणात वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. घरच्या सदस्यांना कुठलाही आजार झाला की आम्ही प्राथमिकस्तरावर वनाैषधीचा उपयाेग करताे. प्रत्येकाच्या घरी वनाैषधीची झाडे असावीत.

- भाऊराव किरंगे, नागरिक

सध्या काेराेनावर कुठलेच रामबाण औषध नाही. गडचिराेली जिल्ह्यात आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या वनाैषधी आहेत. विविध आजारांसाठी जाणकारांच्या सल्ल्यानुसार गुळवेल, अश्वगंधा, कुड्याचे फूल व इतर वनाैषधीचा रस याेग्य प्रमाणात घेतल्यास लाभ हाेताे. नागरिकांनी वनाैषधीची लागवड करून झाडे जगविली पाहिजेत. आयुर्वेदिक वनाैषधी लागवडीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे.

- मिलिंद उमरे, वनाैषधी अभ्यासक

बाॅक्स...

हे आहेत वनस्पतीतील औषधी गुणधर्म

तुळस : तुळशीची झाडे घरामध्ये किंवा अंगणात लावल्याने डास आणि किडे घरामध्ये येत नाही. राेज तुळशीची पाने खाल्ल्याने माणसाच्या शरीरातील रक्त शुद्ध हाेते. सर्दी, खाेकला घालविण्यासाठी चहामध्ये तुळशीचे पाने टाकून पितात.

अश्वगंधा : शरीरातील ताकद वाढविण्यासाठी अश्वगंधा वनस्पतीचा उपयाेग केला जाताे. आयुर्वेदिक औषधी बनविण्याकरिता तसेच गुडघे दुखणे, खाेकला, अस्थमा या आजारावर सदर वनस्पतीचा उपयाेग केला जाताे.

पुदिना : उन्हाळ्यामध्ये गरम हवेपासून बचाव करण्याकरिता सरबत म्हणून पुदिना वनस्पतीचा उपयाेग केला जाताे. याचे सेवन केल्याने पाेटदुखी कमी हाेते. त्वचेशी संबंधित आजारासाठी पुदिना लाभदायक ठरताे. मिरची, हिंग, जिरे व पुदिना याचे मिश्रण केल्याने उलट्या थांबतात. याशिवाय लहान बालकांच्या छाेट्या-माेठ्या आजारासाठी या वनस्पतीचा उपयाेग केला जाताे.

गुळवेल : गुळवेल वनस्पती अनेक आजारावर गुणकारी आहे. जीर्ण ताप व सर्व प्रकारच्या तापानंतर येणारा अशक्तपणा, वाताचा त्रास, तहान-तहान होणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने वारंवार आजारपण येणे, भूक न लागणे, मंदावणे, कावीळसाठी वापरतात.

अद्रक : पाचन विकारासाठी अद्रक अत्यंत लाभदायक आहे. सर्दी, खाेकला, पाेटात गॅस हाेणे आदींसाठी अद्रकचा रस उपयुक्त ठरताे. श्वसन विकार, महिलांच्या विविध आजारांवर अद्रक उपयुक्त आहे. वेदना कमी करण्यासाठी अद्रकचा उपयाेग केला जाताे.