शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या राेपांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST

गडचिराेली : काेराेनाच्या संकटकाळात बहुतांश नागरिक आपल्या आराेग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, याकरिता राेगप्रतिकार शक्ती ...

गडचिराेली : काेराेनाच्या संकटकाळात बहुतांश नागरिक आपल्या आराेग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, याकरिता राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देत आहेत. त्याअनुषंगाने रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या तुळस, पुदीना, अद्रक, अश्वगंधा व गुळवेल आदी औषधी गुणधर्म असणाऱ्या राेपांना मागणी वाढली आहे.

प्राचीन काळापासून आयुर्वेदात विविध वनस्पतींचे विविध गुण व महत्त्व विशद करण्यात आले आहे. वनविभागासह अनेक जाणकार नागरिक आपल्या घरी तुळस, पुदिना, अद्रक, अश्वगंधा, गुळवेलसह विविध औषधी गुणधर्म असणाऱ्या राेपांची लागवड करीत असल्याचे दिसून येते. गडचिराेली शहरातील बऱ्याच घरी विड्याच्या पानांची राेपटी दिसून येतात. एकूणच या वनाैषधीचा विविध आजारांवर उपयाेग केला जाताे.

काेट...

काेराेना महामारीच्या पहिल्या लाटेत काही नागरिकांनी आमच्याकडील विविध प्रकारची वनाैषधी नेली. आता दुसऱ्या लाटेत वनस्पतीचा उपयाेग करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या अंगणात वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. घरच्या सदस्यांना कुठलाही आजार झाला की आम्ही प्राथमिकस्तरावर वनाैषधीचा उपयाेग करताे. प्रत्येकाच्या घरी वनाैषधीची झाडे असावीत.

- भाऊराव किरंगे, नागरिक

सध्या काेराेनावर कुठलेच रामबाण औषध नाही. गडचिराेली जिल्ह्यात आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या वनाैषधी आहेत. विविध आजारांसाठी जाणकारांच्या सल्ल्यानुसार गुळवेल, अश्वगंधा, कुड्याचे फूल व इतर वनाैषधीचा रस याेग्य प्रमाणात घेतल्यास लाभ हाेताे. नागरिकांनी वनाैषधीची लागवड करून झाडे जगविली पाहिजेत. आयुर्वेदिक वनाैषधी लागवडीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे.

- मिलिंद उमरे, वनाैषधी अभ्यासक

बाॅक्स...

हे आहेत वनस्पतीतील औषधी गुणधर्म

तुळस : तुळशीची झाडे घरामध्ये किंवा अंगणात लावल्याने डास आणि किडे घरामध्ये येत नाही. राेज तुळशीची पाने खाल्ल्याने माणसाच्या शरीरातील रक्त शुद्ध हाेते. सर्दी, खाेकला घालविण्यासाठी चहामध्ये तुळशीचे पाने टाकून पितात.

अश्वगंधा : शरीरातील ताकद वाढविण्यासाठी अश्वगंधा वनस्पतीचा उपयाेग केला जाताे. आयुर्वेदिक औषधी बनविण्याकरिता तसेच गुडघे दुखणे, खाेकला, अस्थमा या आजारावर सदर वनस्पतीचा उपयाेग केला जाताे.

पुदिना : उन्हाळ्यामध्ये गरम हवेपासून बचाव करण्याकरिता सरबत म्हणून पुदिना वनस्पतीचा उपयाेग केला जाताे. याचे सेवन केल्याने पाेटदुखी कमी हाेते. त्वचेशी संबंधित आजारासाठी पुदिना लाभदायक ठरताे. मिरची, हिंग, जिरे व पुदिना याचे मिश्रण केल्याने उलट्या थांबतात. याशिवाय लहान बालकांच्या छाेट्या-माेठ्या आजारासाठी या वनस्पतीचा उपयाेग केला जाताे.

गुळवेल : गुळवेल वनस्पती अनेक आजारावर गुणकारी आहे. जीर्ण ताप व सर्व प्रकारच्या तापानंतर येणारा अशक्तपणा, वाताचा त्रास, तहान-तहान होणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने वारंवार आजारपण येणे, भूक न लागणे, मंदावणे, कावीळसाठी वापरतात.

अद्रक : पाचन विकारासाठी अद्रक अत्यंत लाभदायक आहे. सर्दी, खाेकला, पाेटात गॅस हाेणे आदींसाठी अद्रकचा रस उपयुक्त ठरताे. श्वसन विकार, महिलांच्या विविध आजारांवर अद्रक उपयुक्त आहे. वेदना कमी करण्यासाठी अद्रकचा उपयाेग केला जाताे.