शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या राेपांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST

गडचिराेली : काेराेनाच्या संकटकाळात बहुतांश नागरिक आपल्या आराेग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, याकरिता राेगप्रतिकार शक्ती ...

गडचिराेली : काेराेनाच्या संकटकाळात बहुतांश नागरिक आपल्या आराेग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, याकरिता राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देत आहेत. त्याअनुषंगाने रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या तुळस, पुदीना, अद्रक, अश्वगंधा व गुळवेल आदी औषधी गुणधर्म असणाऱ्या राेपांना मागणी वाढली आहे.

प्राचीन काळापासून आयुर्वेदात विविध वनस्पतींचे विविध गुण व महत्त्व विशद करण्यात आले आहे. वनविभागासह अनेक जाणकार नागरिक आपल्या घरी तुळस, पुदिना, अद्रक, अश्वगंधा, गुळवेलसह विविध औषधी गुणधर्म असणाऱ्या राेपांची लागवड करीत असल्याचे दिसून येते. गडचिराेली शहरातील बऱ्याच घरी विड्याच्या पानांची राेपटी दिसून येतात. एकूणच या वनाैषधीचा विविध आजारांवर उपयाेग केला जाताे.

काेट...

काेराेना महामारीच्या पहिल्या लाटेत काही नागरिकांनी आमच्याकडील विविध प्रकारची वनाैषधी नेली. आता दुसऱ्या लाटेत वनस्पतीचा उपयाेग करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या अंगणात वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. घरच्या सदस्यांना कुठलाही आजार झाला की आम्ही प्राथमिकस्तरावर वनाैषधीचा उपयाेग करताे. प्रत्येकाच्या घरी वनाैषधीची झाडे असावीत.

- भाऊराव किरंगे, नागरिक

सध्या काेराेनावर कुठलेच रामबाण औषध नाही. गडचिराेली जिल्ह्यात आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या वनाैषधी आहेत. विविध आजारांसाठी जाणकारांच्या सल्ल्यानुसार गुळवेल, अश्वगंधा, कुड्याचे फूल व इतर वनाैषधीचा रस याेग्य प्रमाणात घेतल्यास लाभ हाेताे. नागरिकांनी वनाैषधीची लागवड करून झाडे जगविली पाहिजेत. आयुर्वेदिक वनाैषधी लागवडीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे.

- मिलिंद उमरे, वनाैषधी अभ्यासक

बाॅक्स...

हे आहेत वनस्पतीतील औषधी गुणधर्म

तुळस : तुळशीची झाडे घरामध्ये किंवा अंगणात लावल्याने डास आणि किडे घरामध्ये येत नाही. राेज तुळशीची पाने खाल्ल्याने माणसाच्या शरीरातील रक्त शुद्ध हाेते. सर्दी, खाेकला घालविण्यासाठी चहामध्ये तुळशीचे पाने टाकून पितात.

अश्वगंधा : शरीरातील ताकद वाढविण्यासाठी अश्वगंधा वनस्पतीचा उपयाेग केला जाताे. आयुर्वेदिक औषधी बनविण्याकरिता तसेच गुडघे दुखणे, खाेकला, अस्थमा या आजारावर सदर वनस्पतीचा उपयाेग केला जाताे.

पुदिना : उन्हाळ्यामध्ये गरम हवेपासून बचाव करण्याकरिता सरबत म्हणून पुदिना वनस्पतीचा उपयाेग केला जाताे. याचे सेवन केल्याने पाेटदुखी कमी हाेते. त्वचेशी संबंधित आजारासाठी पुदिना लाभदायक ठरताे. मिरची, हिंग, जिरे व पुदिना याचे मिश्रण केल्याने उलट्या थांबतात. याशिवाय लहान बालकांच्या छाेट्या-माेठ्या आजारासाठी या वनस्पतीचा उपयाेग केला जाताे.

गुळवेल : गुळवेल वनस्पती अनेक आजारावर गुणकारी आहे. जीर्ण ताप व सर्व प्रकारच्या तापानंतर येणारा अशक्तपणा, वाताचा त्रास, तहान-तहान होणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने वारंवार आजारपण येणे, भूक न लागणे, मंदावणे, कावीळसाठी वापरतात.

अद्रक : पाचन विकारासाठी अद्रक अत्यंत लाभदायक आहे. सर्दी, खाेकला, पाेटात गॅस हाेणे आदींसाठी अद्रकचा रस उपयुक्त ठरताे. श्वसन विकार, महिलांच्या विविध आजारांवर अद्रक उपयुक्त आहे. वेदना कमी करण्यासाठी अद्रकचा उपयाेग केला जाताे.