शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

अन्यायकारक शैक्षणिक निर्णय रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:38 IST

शासनाकडून घेण्यात येत असलेल्या अन्यायकारक निर्णयांमुळे शैक्षणिक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. शासनाने सदर निर्णय बदलवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देशिक्षक परिषद संटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : मराठी माध्यमांच्या शासकीय शाळा बंद करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाकडून घेण्यात येत असलेल्या अन्यायकारक निर्णयांमुळे शैक्षणिक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. शासनाने सदर निर्णय बदलवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यीत शाळा अधिनियम राज्यशासनाने केला आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणीमुळे शिक्षण क्षेत्रातील मुळ शिक्षण व्यवस्था खिळखिळी झाली आहे. शिक्षण व्यवस्थाच उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत. नुकत्याच १ हजार ३१४ प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १२ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. २० डिसेंबर २०१७ रोजी अधिनियम मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये कंपन्यांना शाळा काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणाचे व्यावसायीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी अर्जाची छाननी करण्याची पद्धत सुलभ करावी, वर्षभर आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी परवानगी द्यावी, राज्यस्तरावर व क्षेत्रीय स्तरावर प्राधिकाºयांच्या नियुक्तीसाठी कार्यपद्धती विहित करावी, महानगरपालिका व ‘अ’ दर्जाच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन शाळा स्थापन करण्यासाठी जागेचे क्षेत्र कमी करावे.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या नियुक्तीसाठी होणारा भ्रष्टाचार दूर करावा. विद्यार्थ्यांकडून वसूल केल्या जाणाºया देणगी व इतर शुल्कांवर निर्णय घ्यावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष (माध्यमिक) संतोष सुरावार, जिल्हा कार्यवाह गोपाल मुनघाटे, अध्यक्ष (प्राथमिक) अविनाश तालापल्लीवार, उपाध्यक्ष यशवंत शेंडे, संघटन मंत्री सुरेश धुडसे, कार्यालय मंत्री सुरेंद्र धकाते, एस. पी. मेश्राम उपस्थित होते.व्यावसायिकीकरणाचा धोकाराज्य शासनाने कार्पोरेट कंपन्यांना शाळा उघडण्याची परवानगी दिली आहे. या कंपन्या शैक्षणिक धोरणाचे पूर्णपणे व्यावसायिकीकरण करण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी शिक्षक परिषदेने शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.