शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुख्याध्यापकांना हटवा, आश्रमशाळा वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:22 IST

भामरागड तालुक्यातील चिचोडा येथील संत मानवदयाल प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराने परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक चांगलेच वैतागले आहेत. तब्बल ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि त्यानंतर मिळालेल्या सानुग्रह अनुदानातील गैरव्यवहारप्रकरणी सदर मुख्याध्यापकाला या आश्रमशाळेतून हटवा, अन्यथा पुढील सत्राच्या पहिल्या दिवशी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकवर्गाने दिला आहे.

ठळक मुद्देपालकांची मागणी : विद्यार्थ्यांचा मृत्यू व गैरव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यातील चिचोडा येथील संत मानवदयाल प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराने परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक चांगलेच वैतागले आहेत. तब्बल ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि त्यानंतर मिळालेल्या सानुग्रह अनुदानातील गैरव्यवहारप्रकरणी सदर मुख्याध्यापकाला या आश्रमशाळेतून हटवा, अन्यथा पुढील सत्राच्या पहिल्या दिवशी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकवर्गाने दिला आहे.यासंदर्भातील प्रगतीशिल शेतकरी सीताराम मडावी यांच्यासह ५३ गावकऱ्यांच्या सहीचे निवेदन आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यात नमूद केल्यानुसार सदर आश्रमशाळेतील ७ विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला आहे. त्यासंदर्भात मुख्याध्यापकावर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यानंतर मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात येणाºया सामुग्रह अनुदानात पाच विद्यार्थ्यांच्या बाबतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊनही दोषीवर कारवाई झाली नाही. त्यामुळे पालकवर्गात रोष व्यक्त होत आहे.मुख्याध्यापक एस.बी.अलोणे यांच्यावर ३० एप्रिलपर्यंत कारवाई करून या शाळेतून न हटविल्यास शाळेला कुलूप ठोकले जाईल, असा इशारा निवेदनातून पालकांनी दिला आहे.