शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मुख्याध्यापकांना हटवा, आश्रमशाळा वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:22 IST

भामरागड तालुक्यातील चिचोडा येथील संत मानवदयाल प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराने परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक चांगलेच वैतागले आहेत. तब्बल ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि त्यानंतर मिळालेल्या सानुग्रह अनुदानातील गैरव्यवहारप्रकरणी सदर मुख्याध्यापकाला या आश्रमशाळेतून हटवा, अन्यथा पुढील सत्राच्या पहिल्या दिवशी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकवर्गाने दिला आहे.

ठळक मुद्देपालकांची मागणी : विद्यार्थ्यांचा मृत्यू व गैरव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यातील चिचोडा येथील संत मानवदयाल प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराने परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक चांगलेच वैतागले आहेत. तब्बल ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि त्यानंतर मिळालेल्या सानुग्रह अनुदानातील गैरव्यवहारप्रकरणी सदर मुख्याध्यापकाला या आश्रमशाळेतून हटवा, अन्यथा पुढील सत्राच्या पहिल्या दिवशी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकवर्गाने दिला आहे.यासंदर्भातील प्रगतीशिल शेतकरी सीताराम मडावी यांच्यासह ५३ गावकऱ्यांच्या सहीचे निवेदन आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यात नमूद केल्यानुसार सदर आश्रमशाळेतील ७ विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला आहे. त्यासंदर्भात मुख्याध्यापकावर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यानंतर मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात येणाºया सामुग्रह अनुदानात पाच विद्यार्थ्यांच्या बाबतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊनही दोषीवर कारवाई झाली नाही. त्यामुळे पालकवर्गात रोष व्यक्त होत आहे.मुख्याध्यापक एस.बी.अलोणे यांच्यावर ३० एप्रिलपर्यंत कारवाई करून या शाळेतून न हटविल्यास शाळेला कुलूप ठोकले जाईल, असा इशारा निवेदनातून पालकांनी दिला आहे.