शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सेवाज्येष्ठता यादी सादर करण्यास विलंब

By admin | Updated: September 3, 2016 01:34 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बीएड प्रशिक्षीत शिक्षकांच्या एका रिठ याचिकेच्या संदर्भात ...

उच्च न्यायालयाचे होते निर्देशगडचिरोली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बीएड प्रशिक्षीत शिक्षकांच्या एका रिठ याचिकेच्या संदर्भात गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आॅगस्ट १९९९ पासून पदवीधर व बीएड अहर्ताधारक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या बाबीला साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही न्यायालयाला शिक्षकांची यादी सादर करण्यात आली नाही. गडचिरोली जिल्हा परिषदेने सन २००० व २००१ मध्ये बीएड प्रशिक्षीत प्राथमिक शिक्षक उपलब्ध असताना अप्रशिक्षीत पदवीधर शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी निवड केली. यामुळे या पदासाठी पात्र असणाऱ्या प्रशिक्षीत शिक्षकांवर अन्याय झाला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिठ याचिका दाखल केली. या संदर्भातील निर्णय २० एप्रिल २०१६ ला पारीत झाला. सदर न्यायालयीन निर्णयात विठ्ठल कत्रूजी मडावी विरूध्द जिल्हा परिषद चंद्रपूर या रिठ याचिकेच्या निकालाचा संदर्भ देऊन वरील वेतनश्रेणी ठरविण्यासाठी बीएड हे शैक्षणिक अहर्ता धारण करण्याची तिथी ही मुख्य बाब आहे, असे नमूद केले. शिवाय गडचिरोली जिल्हा परिषदेने १९९९ पासून पदवीधर प्राथमिक शिक्षक पदासाठी पदवी व बीएडधारक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार न केल्याने या पदासाठी पात्र असणाऱ्या पदवीधर शिक्षकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याकडे सुध्दा न्यायालयाने आपल्या निर्णयात लक्ष वेधले आहे. साडेतीन महिन्यांमध्ये पदवीधर प्रशिक्षीत शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून न्यायालयात सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा परिषदेला दिले होते.न्यायालयाने निर्धारीत केलेला कालावधी समाप्त होऊनही शिक्षण विभागाने बीएडधारक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी न्यायालयात सादर केली नाही. हा न्यायालयाचा अपमान असून या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी याचिकाकर्त्यांनी सुरू केली आहे. (नगर प्रतिनिधी)अवमान याचिका दाखल करणारबीएडधारक शिक्षकांची १९९९ पासूनची यादी तयार करून ही यादी न्यायालयास साडेतीन महिन्यात सादर करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा परिषदेला दिले होते. मात्र साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शिक्षण विभागाचे यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले नाही व न्यायालयाला यादी सादर केली नाही. यामुळे न्यायालयाचा अपमान झाला असून या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी याचिकाकर्त्यांनी सुरू केली आहे.